आंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील डॉ. विवेकानंद राजमान्य यांना यंदाचा आंतरभारतीच्या स्नेहसंवर्धन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
डॉ. विवेकानंद राजमान्य मूळचे कर्नाटक राज्यातील निवर्गी, तालुका इंडी, जिल्हा विजापूर येथील रहिवासी आहेत. ते गेली सुमारे तीस-पस्तीस वर्षांपासून आंबाजोगाईत राहतात.
डॉ. विवेकानंद राजमान्य यांनी सुरुवातीला काही वर्षे एका बांधकाम कंपनीत काम केले. नंतर डॉ बी आय खडकभावी सरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. आंबाजोगाईच्या टीबी गिरवलकर अभियांत्रिकी माहाविद्यालयाच्या इमारतीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. राजमान्य हे तीन वर्षांसाठी अहिल्यानगर (अहमदनगर) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य होते.
डॉ. राजमान्य यांनी बांधकाम शास्त्रावर लिहिलेले पुस्तक सिव्हिल इंजिनियरिंग अभ्यासक्रमात मान्यता प्राप्त मानले जाते.
आंतरभारतीचा राज्यस्तरीय स्नेहमिलन सोहळा 2021 साली आंबाजोगाईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला होता, तेंव्हा या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी राजमान्य यांनी मोठी धावपळ केली होती. 2022 साली 10 वे आंबाजोगाई साहित्य संमेलन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात झाले होते. खडकभावी सर स्वागताध्यक्ष होते. या वेळीही राजमान्य सरांनी मोठे योगदान दिले होते.
आंबाजोगाई गावाशी एकरूप झालेल्या पैकी डॉ. विवेकानंद राजमान्य आहेत. म्हणून त्यांना स्नेहसंवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, असे आंतरभारतीच्या वतीने सांगण्यात आले. या पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे.
15 ऑगस्टला होणार पुरस्कार वितरण
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही 15 ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येईल अशी माहिती आंतरभारतीचे मार्गदर्शक अमर हबीब, अध्यक्ष प्रा डॉ शैलजा बरुरे, या कार्यक्रमाचे संयोजक एड. प्रवीण बजाज यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.