तहसीलदार विलास तरंगे यांनी दिले पंचनामाकरुन अहवाल पाठविण्याचे आदेश
अंबाजोगाई तालुक्यात आज पुन्हा एकदा वादळी वारा आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. यामध्ये सायगाव येथे एका शेतमजूराच्या तर सुगाव येथे एका म्हशीचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. यासंदर्भात तहसील विलास तरंगे यांनी संबंधित तलाठी, मंडळ निरीक्षक यांना सुचेना देवून पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रविवार ११ जुन रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांचा प्रचंड कडकडाटासह पाऊस झाला आहे.
या वादळीवाऱ्याच्या पावसात सायगाव येथील शेतमजुर सायगाव भारज रस्त्यावरच्या शेतात काम करत आसाताना आचानक पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाच्या आश्रयाला आले. यावेळी अचानक वीज कोसळली. यात शेतमजुर दिगंबर शंकर गायकवाड ( वय – ६०) यांच्या अंगावर विज कोसळून ठार झाले आहेत.
तालुक्यातील सुगाव येथील शेतकरी सत्तार अंबीरखाँ. पटेल यांच्या शेतात झाडावर वीज कोसळून म्हैस दगावल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे ८o हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. सुगावच्या शेतकऱ्याची म्हैस तर सायगाव शिवारात विजेने शेतमजुराचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वीज पडून ठार झालेल्या शेतमजुर व म्हैसीचा महसुल विभागाने घटनास्थळी पंचनामा करुन आर्थीक मदत करण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.