मनीपुर येथील महिला हिंसाचाराच्या विरोधात मुक मोर्चा; पाच दिवसीय धरणे आंदोलनास सुरुवात


मनीपुर येथे घडलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मुक मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी या मुक मोर्चा काढण्यात आला असून महिलांव हिंसाचार करणा-या व्यक्ती, कायद्याची पायमल्ली करणारे अधिकारी, शासननकर्ती जमात या सर्वांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुं यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


मनीपुर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सजग अंबाजोगाई करांच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन मुक मोर्चा काढण्यात आला. शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक, राजमाता अहिल्यादेवी चौक, बस स्थानक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मुकमोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मुक मोर्चात शहरातील विविध सामाजिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण, व्यापारी, वकील, विविध पत्रकार संघाचे सदस्य महिला -पुरुषा़चा मोठा सहभाग होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मुक मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आल्यानंतर सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुं यांना उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत एक निवेदन देण्यात आले.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुं यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये महिलांवर होणारे हल्ले अत्याचार यांनी कळस गाठलेला आहे. मणिपूर राज्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून भीषण हिंसाचार होत आहे. यामध्ये महिलांना लक्ष्य केले जात आहे. हे दाखवणारे व्हिडीओ वृत्त माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर प्रगट झाले आहेत.


अत्यंत खेदजनक व संतापजनक अशी ही घटना मे महिन्यामध्ये मणिपूरमध्ये घडली. महिलांना विवस्त्र करून अत्यंत लांछनास्पद पद्धतीने त्यांच्यासोबत व्यवहार करीत त्यांची धिंड काढली गेली आणि यात अनेक बचे पुरुष व तरून हा व्हिडिओ तीन महिन्यानंतर माध्यमांपर्यंत आला, याचा अर्थ या घटनेच्या आणि नंतरही मणिपूर येथे होत असलेल्या हिंसाचारामध्ये महिला क्रूर अत्याचाराच्या बळी पडत आहेत. मणिपूर हा आपला देशाचा भाग आहे. आणि देशातील कोणत्याही स्त्रियांवर अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर सरकारने तातडीने कार्यवाही करायला हवी. पण राज्य व केंद्र सरकारने कार्यवाही न करता, गुन्हेगारांना अभय दिले. या सरकारच्या मानवी संवेदना शिल्लक राहिल्या आहेत का ? असा प्रश्न पडतो.


महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात आम्ही आमचा निषेध व्यक्त करीत आहोत. महिलांवर हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती कायद्याची पायमल्ली करणारे अधिकारी आणि शासन या सर्वांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आम्ही सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने करीत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मुक मोर्चा मध्ये सहभाग घेतलेला मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


पाच दिवस धरणार धरणे
मनीपुर येथील महिला हिंसाचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच दिवस दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. आज शहरातील विविध महिला संघटनांच्या वतीने धरणे धरुन धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.