Uncategorized

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या १५० डॉक्टरांचा आंदोलनात सहभाग

रुग्णसेवा विस्कळीत; निवासी डॉक्टरांचे धरणे आंदोलन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)– निवासी डॉक्टरांच्या मागण्याकडे शासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संपाचा बडगा उगारला आहे. सोमवारी अंबाजोगाईतील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. तर निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालया समोर धरणे आंदोलन छेडले. अंबाजोगाईतील १७२ निवासी डॉक्टर संपावर आहेत.


महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय व पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे निवासी डॉक्टरांची हेळसांड होत आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांची पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी धुळखात पडला आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य अधांतरी राहिले आहे. बंदोपत्रित सेवेचे थोथांड कशाला? असा प्रश्न निवासी डॉक्टरांनी उपस्थिती केला आहे. सहयोगी प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे यामुळे निवासी डॉक्टरांचे पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण कसे होणार शासन निर्णया प्रमाणे लागु झालेल्या महागाई भत्ता शासनाने तात्काळ अदा करावा.

रुग्ण सेवा विस्कळित

सध्या महाराष्ट्रातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनाती तफावत दुर करून निवासी डॉक्टरांना समान वेतन (एल लाख रूपये) लागु करून निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा. या समस्या मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे कळवून देखील शासन या प्रश्नावर गंभीर नसल्यामुळे आम्ही सर्व राज्यातील निवासी डॉक्टर सोमवार पासुन संपावर जाणार आहोत या संपकाळात रूग्ण व्यवस्थेवर परिणाम झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल अशा इशारा अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल मुंडे, डॉ. जव्हेरीया शेख, डॉ. अनश्री केन, डॉ. अजित अरबट आदींनी दिला आहे.

आपत्कालीन सेवा सुरु राहणार

दरम्यान, संपकाळात अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, बाल अतिदक्षता विभाग यासारख्या आपत्कालीन सेवा सुरु राहणार आहेत. अत्यवस्थ रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात कुठलीही अडचण होणार नसल्याचे मार्ड संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker