Uncategorized

शेतकरी नवरा नको ही भुमिका समाजाने बदलली पाहिजे; आ. सोळुंके


मोबाईल व सोशल मिडीयाच्या जमान्यात आधुनिक जीवनशैलीचा अवलंब करून एकीकडे आजची तरूण पिढी खूप पुढे गेली आहे, असे असले तरी दुसरीकडे माञ या सुविधांचा दुरूपयोग होत आहे, यामुळे समाजरचनेलाच तडे जात आहेत. म्हणून सभोवतालच्या परस्थितीकडे डोळसपणे पहा, आज ग्रामीण भागातील गावागावात उच्च शिक्षित, शेती करणारे कर्तबगार विवाहयोग्य तरूण मुले मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. मुलींना सरकारी नोकरदार नवरा आणि मुलीच्या पालकांना ही नोकरदार जावाई हवा आहे, आज सर्वांनाच सरकारी नौकरी कशी मिळेल, अशा मानसिकतेचा व प्रवृत्तीचा परीणाम मराठा समाजातील विवाह संस्थेवर होत आहे.

त्यामुळे आता आपल्या मुलीस ‘शेतकरी नवरा नको’ ही मानसिकता मराठा समाजातील उपवर मुलींच्या पालकांनी बदलावी, याकरीता राजकीय व सामाजिक नेतृत्वाने एकञ येवून ग्रामीण भागाची परस्थिती बदलावी, परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे, शेतीला वैभव मिळवून देणे यासाठी शेतीत नवतंञज्ञानाचा वापर करून, प्रयोगशीलता आणून, उत्पादन वाढवून शेतकरी बांधवांनी आपली आर्थिक उन्नती साध्य करावी असे आवाहन माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले.

मराठा समाजातील वधु – वर पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन रविवार, दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृह, नगरपरिषद ऑफिस काॅम्लेक्स, परळी रोड, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी करण्यात आले होते. या महामेळाव्याचे उदघाटन अंबाजोगाई पीपल्स को – ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके हे होते. अंबाजोगाईतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था, संचलित रेशिमगाठी मराठा वधु – वर सुचक केंद्रामार्फत रविवारी आयोजित महामेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्विराज साठे, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे (धाराशिव), सामाजिक कार्यकर्त्या एॅड.शोभा सुनिल लोमटे, प्रा.अरूंधती पाटील (समन्वयक, मनस्विनी महिला प्रकल्प,अंबाजोगाई.), रेशिमगाठी मराठा वधू – वर सुचक केंद्राचे अध्यक्ष भरत पतंगे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. प्रास्ताविक करताना भरत पतंगे यांनी कार्यक्रम आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. महामेळाव्यास सहकार्य करणाऱ्या आणि उदंड प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे पतंगे यांनी आभार मानले.

उद्घाटक म्हणून बोलताना राजकिशोर मोदी यांनी अशा उपक्रमांची मोठी आवश्यकता असल्याचे सांगून वधू-वर परीचय मेळावे हे आजच्या समाजाची गरज असल्याचे नमूद करून शुभेच्छा दिल्या, प्रमुख अतिथी माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी रेशिमगाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून विवाह योग्य उपवर वधू-वर सुचविले जातात, त्यामुळे अनेकांचे संसार उभे राहत असल्याचे सांगितले. अनिल खोचरे यांनी मेळाव्यास शुभेच्छा व्यक्त केल्या, तर ॲड.शोभाताई लोमटे यांनी मराठा समाजाने बदल स्विकारून वाटचाल करावी, सासू – सुनात सुसंवाद असावा, विश्वासाचे नाते निर्माण करा, नवदाम्पत्याला आनंदी संसार उभा करण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन केले. प्रा.अरूंधती पाटील यांनी रेशिमगाठीचा हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे सांगून समाजाला बदलावे लागेल, विवाहानंतरचे सहजीवन व नात्यात मैञीभाव जोपासा, शेती पाहीजे तर शेतकरी नवरा का नको..?, मुलींसारखे संस्कार मुलांवर ही करावेत, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मरण ठेवून आपण वाटचाल केली पाहीजे असे प्रतिपादन प्रा.पाटील यांनी केले. प्रारंभी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छञपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. मंजुषा देशपांडे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. तर सुप्रसिद्ध गायक सुभाष शेप, आसाराम जोशी, मंजुषा देशपांडे आणि महेश गित्ते यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन रचना किशोर परदेशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सदाशिव सोनवणे यांनी मानले. या महामेळाव्यात 300 नियोजित वधु – वर यांची बायोडाटा नोंदणी करण्यात आली, तसेच विवाह इच्छुक मुला-मुलींचा परिचय, पालकांची ओळख व वधु – वर यांनी परिचय पञाचे (बायोडाटा) अदान – प्रदान व स्वतःचा परिचय करून दिला. महामेळाव्याच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले होते. तसेच मेळाव्यास सहकार्य करणाऱ्या उपस्थित मान्यवरांचा यावेळी रेशिमगाठीकडून सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय परिचय महामेळाव्यास मराठा समाजातील वधू, वर व त्यांचे पालक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, सकल मराठा समाज बांधव, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के, राजमाता मुलींचे वसतीगृहाचे संचालक अविनाश निर्मळ, रेशिमगाठी मराठा वधू – वर सुचक केंद्राचे भरत पतंगे, अरूण काळे, गणेश पतंगे, रघुनाथ जगताप, सदाशिव सोनवणे, रामकिशन बडे, दत्तात्रय कदम, रत्नमाला भरत पतंगे, अनुराधा अमित पतंगे, लता मधुकर भोसले, रेश्मा अजितराव देशमुख, अमित पतंगे, निलेश पतंगे, सचिन सोमवंशी, दत्ता माले, अजिंक्य पोतंगले, लक्ष्मण सारंगे आदींनी पुढाकार घेतला होता.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker