मांजरा धरणात फक्त २३ टक्केच पाणी!


२२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेच्या मांजरा धरणात फक्त ८८.४६७ दलघमी पाणी साठा
यावर्षी मृग नक्षत्रानंतर अधुनमधून आलेल्या पावसाने अत्यंत कमी हजेरी लावली असल्यामुळे गेल्या तीन चार वर्षात पडला नाही एवढा कमी पावूस यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत झाला आहे.
यावर्षी जूलै महिन्याच्या सुरुवातीस पडलेल्या पावसामुळे या विभागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र नंतर ऑगस्ट महिना संपेपर्यंत पावसाने सतत हुलकावणी दिली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत अधुनमधून येणाऱ्या पावसांच्या सरींमुळे पीके कशी तरी ती धरुन उभी होती. मात्र ऑगस्ट महिन्यात एकदा ही पावूस झाला नसल्यामुळे पीके आता हातातुन गेली आहेत.


यावर्षी अत्यंत असमाधानकारक झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्याऐवजी ती सतत खालीखालीच गेलेली आढळते. बीड जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात यावर्षी झालेल्या अत्यंत अपु-या पावसामुळे सवच सिंचन धरणातील पाणी साठा जवळपास २५ टक्क्यांपेक्षा खाली गेलेला आहे. अत्यंत अपु-या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा आणि सामान्य माणसाचा जीव आता भांड्यात पडला असून हाता-तोंडाला आलेली पीके गेलीच आहेत आता पिण्याच्या पाण्याचे संकट ओढआवतए की काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.
यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अत्यंत अपु-या पावसामुळे मांजरा धरणात आज २ सप्टेंबर रोजी सकाळी ७: ०० वाजे पर्यंत फक्त २३. ३६ टक्केच पाणी साठा उपलब्ध आहे. २२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणात फक्त फक्त ८८.४६७ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे.
बीड-लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी १९७१ साली मंजुर करण्यात आलेल्या या मांजरा धरणात आज २ सप्टेंबर रोजी तो फक्त ८८.४६७ दलघमी एवढा आहे.


गेली दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्यामुळे मांजरा धरण यावर्षी भरेल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
मांजरा धरण पुर्णपणे भरण्यासाठी ६४२.३७ मी पाणी पातळी आवश्यक आहे. सध्या मांजरा धरणात ६३७.९७ मी. पाणी पातळी पर्यंतच पाणी साठा उपलब्ध झाला आहे. मांजरा धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. सध्या धरणात फक्त ८८.४६७ दलघमी पाणी साठा जमा आहे. मांजरा धरणाचा जीवंत पाणी साठा १७६.९६३ दलघमी एवढा आहे, आज मांजरा धरणात फक्त ४१.३३७ दलघमी एवढाच जीवंत पाणी साठा उपलब्ध आहे. या जीवंत पाणी साठ्याचे प्रमाण फक्त २३.३६% दलघमी एवढेच आहे.


मांजरा धरण क्षेत्रात यावर्षी आजपर्यंत एकही मोठा पावूस झाला नसल्यामुळे धरणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गेली दीड महिन्यापासून पावसाने अचानक दडी मारल्यामुळे सोयाबीन, मुग आणि उडीद, ही पीके हातची गेली आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जर पाऊस झालाच नाही तर पिण्याच्या पाण्याचेही संकट ओढावण्याची शक्यता आहे.