मांजरा तील पाण्याला मृतसाठ्याची ओढ; फक्त ७ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक!


तीन महिने करावा लागणार पाणी टंचाईचा सामना
बीड-लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात आज २८ मार्च अखेर पर्यंत फक्त ७ टक्केच जिवंत पाणी साठा शिल्लक असून येत्या काही दिवसांत हा जिवंत पाणीसाठा संपून मृत भांड्यातील पाण्यावर या शेकडो गावातील लोकांना अवलंबून रहावे लागणार आहे.
बीड जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात यावर्षी अल्प पावूस झाला असल्यामुळे मराठवाडा विभागातील अनेक मोठी धरणे यावर्षी भरली नव्हती. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार हे गृहीत ठरलेलेच होते.
यावर्षी बीड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पावसाळा संपण्यापूर्वी जेमतेम पाणी साठा जमा झाला होता. धरणातील पाण्याचा सततचा मोठ्या प्रमाणावर होणा-या उपसा मुळे बघता बघता धरण मृत साठ्याच्या पाणी पातळीपर्यंत येवून पोहंचला आहे.


आज २८ मार्च अखेर धरणात फक्त ७. ९४ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची अधिकृत माहिती आहे. मांजरा धरणाच्या पाणीपातळी कडे दररोज लक्ष ठेवून असलेल्या लातुर पाटबंधारे उपविभाग क्रमांक १ कार्यालयातील शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार २२४.०९३ mcum पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणात फक्त ६१.१७४ mcum एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा धरणात फक्त १४.०४४ mucm एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा धरण क्षेत्रात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण ही वाढले आहे. सध्या हे प्रमाण ७.२ mm एवढे आहे.
तीन महिने करावा लागणार पाणी टंचाईचा सामना


मांजरा धरणातील आजचा पाणीसाठा लक्षात घेता येत्या काही दिवसांत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मांजरा धरणातील पाण्याची पातळी ही शुन्य साठ्या पर्यंत जाईल. म्हणजे एप्रिल महिना, मे आणि जून महिना पूर्ण अशी तीन महिने या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
प्रशासन निवडणुकीच्या तयारीत मग्न!
मांजरा धरणातील पाणी शुन्य पातळी कडे पोहोचत असलेतरी पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत जाणवणा-या संभाव्य पाणी टंचाई चार मुकाबला कसा करावा यासाठी प्रशासनाने अद्दाप काही हालचाली सुरु केल्या असल्याचे दिसून येत नाही. सध्या संपूर्ण प्रशासन हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्ण वेळ कार्यरत असल्याचे दिसून येते आहे.