महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील खटवळ लिमगाव येथे अंतराळातुन पडलेले ते दगड उल्कापिंड!

बीड जिल्ह्यातील खटवळ निमगाव येथे पडलेले ते दगड उल्कापिंड असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

खटवळ लिमगाव येथे अंतराळातुन दोन दगड पडल्याची बातमी काही तासांतच जगभर पसरली. छत्रपती संभाजी नगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ संशोधन केंद्र येथील तज्ञांनी या गावाला भेट देवून अभ्यासासाठी ही दोन ही दगडे छत्रपती संभाजी नगर येथील अंतराळ संशोधन केंद्रात नेली होती. या अभ्यासाकांनी दगडाची पाहणी केल्यानंतर 80 सेंटीमीटर आकाराचे हे दगड उल्कापिंड असल्याचं सांगितलं. हा सगळा आशनीपाताचा प्रकार असावा असं जाणवत असल्याचं खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलं.

या उल्कापिंडाला म्हणजे या दोन्ही दगडांना आता जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ ताब्यात घेणार आहेत. या संदर्भात अधिक संशोधन केल्यानंतर याची उर्वरित माहिती समजणार आहे.

काय आहे उल्कापिंड?

उल्का पिंड हे धुमकेतू वा क्षुद्रग्रहाचे बारीक कण असतात. पृथ्वीवर हे कण पडण्यापुर्वी पृथ्वीच्या भोवती अवकाशात वायुमंडलासोबत फीरत असतात. पृथ्वीवर पडण्यापुर्वी ते प्रचंड प्रकाशमान होत खाली पडतात.पृथ्वीवर पडलेल्या या दगडांच्या तुकड्यांना उल्का पिंड म्हणतात.

उल्का हा एक खडक आहे जो बाह्य अवकाशात उद्भवला आहे आणि ग्रह किंवा चंद्राच्या पृष्ठभागावर पडला आहे. जेव्हा मूळ वस्तू वातावरणात प्रवेश करते तेव्हा विविध घटक जसे की घर्षण, दाब आणि वातावरणातील वायूंशी रासायनिक परस्परसंवादामुळे ते गरम होते आणि ऊर्जा उत्सर्जित होते. अशा वेळी या खडकांचे तुकडे पृथ्वी वर पडतात. त्यांना उल्कापिंड म्हणतात.

साधारणपणे वर्षातुन १७ हजार उल्कापिंड पृथ्वी वर पडतात!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker