पेरणीपूर्वीच सुरु झाला गोयलगायींचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांत भिंतीचे वातावरण


अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव जी. पण. मतदार संघातील अनेक गावांत झालेल्या दमदार पावसानंतर पेरणीपुर्वीच या विभागातील शेतात गोगलगायींनी मोठ्या प्रमाणावर आपले डोके वर काढले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पट्टीवडगाव व परिसरातील गावांमध्ये गोगलगायींची दहशत
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव, मूर्ती, धर्मापूरी, खापरटोन, उजनी हातोला, तळेगाव या परिसरातील अनेक गावांमध्ये ३ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान रोहिण्या बरसल्याने दमदार पाऊस झाला होता त्यानंतर १० जून रोजी शनिवारी मध्यरात्री मृगनक्षत्राच्या सुरुवातीला दमदार पावसाची नोंद झाली जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले बांध फुटून जमिनी खचून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते.
सकाळ होताच दिसतो गोगलगायींचा खच!
शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केल्यामुळे जमिनी भुसभुशित झाल्या आहेत दमदार पावसामुळे जमिनित ओल भरपुर झाली असुन सुप्त अवस्थेत असेलेल्या गोगलगाय जमिनिवर सकाळी सकाळी पसरलेल्या दिसत आहेत पेरणीपूर्वीच गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत असल्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरआणि मादी दोघेही अंडी घालतात त्यामूळे शंखी गोगलगायीच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे गतवर्षी शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीनची दुबार तिबार पेरणी करावी लागली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता त्यामूळे वेळीच उपाययोजना करून गतवर्षीची पूनरावृत्ती होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.


गतवर्षी झाले होते मोठे नुकसान
गोगलगायींचा प्रादुर्भाव गतवर्षी ही मोठ्या प्रमाणावर झाला होता. अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरणी झाल्यानंतर शेतीत पीक उगवत असतांनाच शंखई गोगलगायींनी शेतकऱ्यांच्या शेतातील कोवळ्या रोपांवर डंका मारुन संपुर्ण पीके नष्ट केली होती. आता यावर्षी पेरणीपुर्वी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा गोगलगायींनी आपले तोंड वर काढले आहे, म्हणून या विभागातील शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.