महाराष्ट्रठळक बातम्या

दहावी, बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलणार?

राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील अभ्यासक्रमातमोठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा याबाबत नवा कृतीशील आराखडा बनवण्यात व्यस्त असल्याचे सांगितले जाते.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षांसह १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांकडून मत मागवले आहे. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत किरकोळ बदल करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नांची उत्तरे सर्व्हेक्षणादरम्यान लोकांना विचारण्यात आली आहेत.

नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy, NEP) अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला जात आहे. शालेय शिक्षण अधिक समर्पक आणि अर्थपूर्ण बनविण्यावर सरकारचा भर आहे. दरम्यान सरकारने विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांचे मत मागितले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षांसह १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांकडून मत मागवले आहे. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत किरकोळ बदल करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नांची उत्तरे सर्व्हेक्षणादरम्यान लोकांना विचारण्यात आली आहेतशालेय परीक्षा, बोर्ड परीक्षा, गृहपाठ आणि शाळेत जाणे अशापैकी कोणत्या कारणांमुळे विद्यार्थ्यांना जास्त ताण येतो असा प्रश्न देखील सर्व्हेक्षणात विचारण्यात आला आहे.
इतर महत्वाचे प्रश्न

या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत. नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्कमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनवण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे का? त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घालायची का, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याबाबत प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत.

करोना प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षणाचे बरेच नुकसान झाले. . यावर आता उपाय कसा करता येईल? शालेय शिक्षणाचा आणखी कोणता विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो?शिक्षण प्रक्रियेत पालकांना मुलांसोबत कसे जोडायचे? शिक्षण मजा करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात? समुदाय आणि शाळांशी जोडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल? अशा प्रश्नांचा सर्व्हेक्षणामध्ये समावेश आहे

इतर महत्वाचे प्रश्न

या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत. नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्कमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनवण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे का? त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घालायची का, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याबाबत प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker