संपादकीय

काय आहे विनोद कांबळी यांचा नेमका प्रॉब्लेम?

क्रिकेट या लोकप्रिय खेळातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत माजी खेळाडू वादग्रस्त विनोद कांबळी यांचा आर्थिक अडचणीत असल्याचा व्हिडिओ अलिकडे खुप व्हायरल होतोय. विनोद कांबळी यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण येथे करणार आहोत. विनोद कांबळी हे अतिशय सर्वसामान्य घरातुन आलेले आहेत. १९८८ मध्ये विनोद कांबळी आणि सचीन तेंडुलकर ६६४ धावांची भागीदारी करून विश्वविक्रम केला आणि विनोद कांबळी क्रिकेट जगतात एकदम प्रकाश झोतात आला. यावेळी विनोद ने ३४९ तर सचीन ने ३२६ धावांची भागीदारी केली होती. विनोदाचे वय यावेळी फक्त १६ तर सचीनचे वय फक्त १४ वर्षाचे होते.


अगदी कमी वयात जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळवलेला विनोद कांबळी याला १९९३ मध्ये जागतिक पातळीवरील क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यावेळी विनोद ने सलग दोन व्दिशतके झळकावून आपल्या दमदार आगमनाची ग्वाही ही दिली. १९९३ साली पुर्ण फॉर्म मध्ये असलेल्या विनोद आपला उत्तम परफॉर्मन्स फक्त तीन वर्षे १९९६ पर्यंत टिकवू शकला. १९९६ पासून मृतांचा खेळातील परफॉर्मन्स कमी होत गेला आणि २००० वर्षी श्रीलंके विरुद्ध खेळलेला एक दिवसीय सामना त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला. अखेर २००० ते २०११ पर्यंत त्याने पुर्व आगमनाची वाट पाहिली व २०११ मध्ये त्याने प्रथमश्रेणी क्रिकेट मधुन आपली निवृत्ती जाहीर केली.


यासर्व कालावधीत विनोद जगत असलेले आपले लक्झरी आयुष्य आणि त्याच्या खाजगी आयुष्यात घडलेल्या आणि सार्वजनिक चर्चेत आलेल्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणे गरजे आहे. साधारणपणे सर्व सामान्य परिस्थितीमधुन आलेल्या माणसांकडे अचानक अपेक्षेपेक्षा जास्त पैसा,ऐश्वर्य उपभोगायला मिळाले की त्यापैकी बहुतेक माणसं अवाजवी खर्च करून आर्थिक अडचणीत आल्याचे आपण नेहमी पहातो, त्याच प्रमाणे विनोद कांबळी यांचे काहीसे झाले आहे असे दिसते. विनोद कांबळी यांच्या म्हणण्यानुसार आज त्यांच्या कुटुंबीयांची गुजरात फक्त बीबीसीआय कडुन मिळणा-या ३० हजार रुपयांच्या निवृत्ती वेतनावर होत असल्याची भावनिक पोस्ट करुन आपली आर्थिक अडचण सोडवण्यासाठी आपल्याला नौकरी ची गरज आहे असे भावनिक आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत एका मराठी उद्दोगपतीने विनोद कांबळी यांना १ लाख रुपयांची नौकरी देवू केली आहे. मात्र सतत वादग्रस्त ठरत असलेले विनोद कांबळी ही नौकरी किती काळ टिकवून ठेवू शकतील हे पहावे लागेल.


विनोद कांबळी यांना यापुर्वी अनेकांनी मदत केली आहे. विनोद सोबत आपली कारकीर्द सुरु केलेला सचीन तेंडुलकर यांनी यापुर्वी विनोदला अनेकवेळा आर्थिक मदत केली आहे. याशिवाय सचीन यांच्या सांगण्यावरून विनोद यास नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी मध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती ‌ मात्र कोविड नंतर हे काम ही बंद असल्याचे विनोद सांगतो‌.

काय आहे विनोद ची अपेक्षा?

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्याला मार्गदर्शनाची जबाबदारी द्यावी, जेणेकरून अर्थार्जन होऊ शकेल, अशी अपेक्षा विनोदने व्यक्त केली आहे. सचिनला सर्व काही ठाऊक आहे. परंतु माझी त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. माझ्या पाठीशी तो सदैव खंबीरपणे उभा असतो. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीत त्याच्यामुळेच काही वर्षांपूर्वी मी प्रशिक्षक होतो, असे विनोदने स्पष्ट केले आहे.

१९८८मध्ये विनोद आणि सचिनने ६६४ धावांची ऐतिहासिक आणि विश्वविक्रमी भागीदारी करीत क्रिकेट जगताचे लक्ष वेधले होते. क्रिकेटमधील कोणत्याही गड्यासाठी (विकेटसाठी) ती सर्वोच्च भागीदारी ठरली. दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेकडून सेंट झेवियर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी हा पराक्रम दाखवला. १६ वर्षीय विनोदने नाबाद ३४९ धावा केल्या होत्या, तर १४ वर्षीय सचिनने नाबाद ३२६ धावा केल्या होत्या. त्यामुळे शारदाश्रम शाळेने २ बाद ७४८ धावांचा डोंगर उभारला.

फेब्रुवारी – मार्च १९९३ मध्ये कांबळीने सलग दोन द्विशतके झळकावून क्रिकेटविश्वात आपल्या आगमनाची ग्वाही दिली. यापैकी पहिले द्विशतक (२२४) इंग्लंडविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झळकावले, तर दुसरे द्विशतक ( २२७ ) झिम्बाब्वेविरुद्ध दिल्लीच्या फिरोझशहा कोटलास्टेडियमवर साकारले. हे विनोदच्या कारकीर्दीतील अनुक्रमे तिसरे आणि चौथे कसोटी सामने होते. यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतही (१२५, १२०) विनोदने शतके नोंदवली होती. त्यामुळे तीन विविध प्रतिस्पध्र्थ्यांविरुद्ध सलग तीन शतके झळकावण्याचा विक्रम त्याने नावावर केला. मग फक्त १४ कसोटी डावांमध्ये विनोदने एक हजार धावांचा टप्पा गाठला. परंतु १७ कसोटी सामन्यांत १,०८४ धावा करणाऱ्या विनोदची कारकीर्द तो २४ वर्षांचा होण्याआतच १९९५ मध्ये संपुष्टात आली.

विनोदची कसोटी क्रिकेटमधील ५४.२० ही धावसरासरी ही सचिन, सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यापेक्षाही सरस आहे. परंतु विनोद दुसऱ्या डावात धावांसाठी झगडतो, हे त्याची आकडेवारीच स्पष्ट करते. त्याच्या पहिल्या डावातील धावांची सरासरी ही ६९.१३ अशी आहे. तर दुसऱ्या डावातील ९.४० धावा अशी आहे. विनोदने १९९१मध्ये विल्स शारजा करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १०४ एकदिवसीय सामन्यांत ३२.५९च्या सरासरीने २,४७७ धावा केल्या. यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. यापैकी पहिले शतक त्याने १९९३मध्ये जयपूर येथे इंग्लंडविरुद्ध झळकावले. वाढदिवसाच्या दिवशी शतक नोंदवणारा तो एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला. 

त्याने १९९२ आणि १९९६ अशा दोन विश्वचषकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. १९९६च्या विश्वचषकातील उपांत्य सामना भारत गमावण्याची चिन्हे दिसत असताना प्रेक्षकांनी धुडगूस, जाळपोळ करीत सामना स्थगित करण्याचीपरिस्थिती आणली, त्यावेळी विनोद मैदानावर होता. अखेरीस हा सामना श्रीलंकेला बहाल केल्यामुळे विनोदने रडत-रडतच मैदान सोडले होते. त्यानंतर विनोदच्या एकदिवसीय कारकीर्दीला ग्रहण लागले. मार्च १९९६ ते ऑक्टोबर २००० पर्यंतच्या ३५ एकदिवसीय सामन्यांत विनोदची धावसरासरी १९.३१ इतकी खालावली. त्याने एकदिवसीय संघात नऊ वेळा पुनरागमन केले. ऑक्टोबर २०००मधील श्रीलंकेविरुद्धचा सामना त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. 

अखेरीस २०११मध्ये त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सामना निश्चितीमुळे भारताने १९९६च्या विश्वचषकातील उपांत्य सामना गमावला. संघातील अन्य फलंदाजांसह, व्यवस्थापक आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी तो सामना निश्चित केला, असा आरोप विनोदने केला होता. २०१५ मध्ये विनोद आणि त्याची पत्नी आंद्रीआ यांनी मारहाण आणि तीन दिवस खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप मोलकरणीने केला होता. त्यामुळे विनोदला तुरुंगात जावे लागले होते. यानंतर एका मॉलमध्ये गायक अंकित तिवारीच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी कांबळी दाम्पत्य वादाच्या भोवऱ्यात सापडले. माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू आणि रमीझ राजा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी विनोदने ‘द्विटर वर केली. परंतु नंतर दिलगिरी व्यक्त करीत आपली पोस्ट हटवली होती. याशिवाय वांद्रे येथील आपल्या सोसायटीत चार वर्षांहून अधिक कालावधीची १० लाख रुपयांहून अधिक थकबाकी केल्यामुळे तो अडचणीत सापडला होता. परदेशी शेजाऱ्याविरोधातही विनोदने पोलीस तक्रार केली होती. त्याने आपल्याला उद्देशून ‘काळा भारतीय’ असा उल्लेख केल्याचे त्याने तक्रारीत म्हटले होते. याचप्रमाणे गृहकर्ज आणि गाडीसाठीच्या कर्जाचे हफ्ते न फेडल्याप्रकरणी एका बँकेने त्याच्यावर ठपका ठेवला होता.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker