ठळक बातम्या

वृक्ष हेच मानवाचे खरे मित्र; कृषि महाविद्यालय लातूर येथे स्वराज्य महोत्सवाचा शुभारंभ

आ. विक्रम काळे

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी व युवकांमध्ये सजग समाजभान, लोकशाही मूल्य, जीवनमूल्य, देश भावना तसेच जाज्वल्य देशभक्ती सचेतन व वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कृषि महाविद्यालय लातूर येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांच्या संकल्पनेनुसार व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार व कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या पुढाकारातून स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित करून स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे. दि. ०१ऑगस्ट २०२२ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन आ.विक्रम काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. आ.विक्रम काळे आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची असून कृषि महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धन होत आहे ही अत्यंत सकारात्मक व आनंदाची बाब आहे. मानवी जीवनामध्ये वृक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे. वृक्ष हे मानवास सावली, फळे व ऑक्सिजन देतात त्यामुळे वृक्ष हेच खरे मानवाचे मित्र होत.


कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे आपल्या भाषणात म्हणाले की, देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड व संवर्धन करणे काळाची गरज असून या महाविद्यालयात याबाबत सर्वांच्या सहकार्याने हे कार्य होत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. हेमंत पाटील, गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. महारुद्र घोडके, कृषि विस्तार विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे व कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पद्माकर वाडीकर हे उपस्थित होते.

झाडे हे माणसाचे चांगले मित्र आहेत

झाडे हे आपले चांगले मित्र आहेत. ते आम्हाला ऑक्सिजन प्रदान करण्यात, कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्यात, सांत्वन प्रदान करण्यात आणि संपूर्ण जगाला असंख्य फायदे प्रदान करण्यात मदत करतात. झाडे आपल्या आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. प्रदूषण, जंगलतोड आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे झाडे दररोज मरत असल्याने त्यांना आमच्या मदतीची गरज आहे.

मानवांसाठी उपयुक्त असण्याव्यतिरिक्त, झाडे अनेक पक्षी आणि प्राण्यांचे घर देखील आहेत. ते त्यांना आश्रय देतात ज्यामुळे शेवटी मानवांनाही फायदा होतो. दुस-या शब्दात सांगायचे तर, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता झाडे एका चांगल्या मित्राची भूमिका पार पाडतात.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker