महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य प्रकाशनाचे रखडलेले काम शासनाने विना अडथळा सुरु करावे

आ. धनंजय मुंडे यांची मागणी

वंचित-शोषितांच्या वेदनांना आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कालच साजरी झाली, मात्र त्यांच्या संदर्भातील साहित्य प्रकाशन मात्र नवीन सरकारच्या निर्णयामुळे रखडले असल्याचे समोर आले असून, सदर साहित्य प्रकाशनाचे काम सरकारने विना अडथळा तातडीने सुरू करण्याची मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कथा-कादंबऱ्या, वग नाट्य, शाहिरी, यांसह अण्णा भाऊंवर अन्य साहित्यिकांनी केलेल्या लिखाणाचे व साहित्याचे 7 खंड मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्यानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती स्थापन करून 7 पैकी 2 खंड प्रकाशित देखील झाले होते. तथापि नव्या सरकारने सर्व समित्या बरखास्त केल्याने प्रकाशनाचे काम अर्ध्यातच रखडले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कथा-कादंबऱ्या, वग नाट्य, शाहिरी, यांसह अण्णा भाऊंवर अन्य साहित्यिकांनी केलेल्या लिखाणाचे व साहित्याचे 7 खंड मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्यानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती स्थापन करून 7 पैकी 2 खंड प्रकाशित देखील झाले होते. तथापि नव्या सरकारने सर्व समित्या बरखास्त केल्याने प्रकाशनाचे काम अर्ध्यातच रखडले आहे.

मागील सरकारच्या काळात स्थापन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीने 31 कादंबऱ्यांना 3 खंडात प्रकाशित करण्याचा व अन्य साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सदर समिती बरखास्त झाल्याने काम अर्ध्यातच रखडले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री या समितीचे अध्यक्ष असतात, मात्र मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने कामकाज ठप्प होऊन आता हे काम पुढे कसे जाणार, साहित्यरत्नाचे साहित्य प्रकाशनावाचून अडणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

साहित्याचे पुनर्मुद्रण, संकलन, संपादन, प्रकाशन आदी किचकट बाबी असून, कामकाज सुरू असताना समित्या बरखास्त केल्याने काम तर रखडलेच शिवाय नव्या समित्या होऊन पूर्ववत काम सुरू होण्यास बराच काळ लोटणार आहे, त्यामुळे हवे तर मुख्यमंत्री या नात्याने या समितीचे तुम्ही स्वतः अध्यक्ष व्हा, मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य प्रकाशनाचे काम तात्काळ सुरू करा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे आज केली आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker