ऐतिहासिक संकलेश्वर मंदीराला पावसाच्या पाण्यामुळे धोका..? दर वर्षी वाढत आहे
पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज ! अनेकदा सूचना देऊनही करतात दुर्लक्ष


अंबाजोगाई शहरालगत ११व्या शतकातील संकलेश्वर (बाराखांबी) मंदीर परीसराची स्वच्छतेच्या नावाखाली करण्यात आलेल्या बेकायदेशीर खोदकामात चर्चेत आलेले ऐतिहासिक संकलेश्वर मंदीर आता पावसाच्या पाण्यामुळे धोक्यात आले असून एक बाजू खचलेल्या या ऐतिहासिक मंदीराकडे पुरातत्त्व विभागाने अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान या संपुर्ण प्रकरणाकडे अत्यंत सहजतेने पाहणा-या पुरातत्व विभागावर इतिहास प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
११ व्या शतकातील चालुक्य कालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील (संकलेश्वर) बाराखांबी मंदीराच्या सभोवतालील परीसराचे खोदकाम गतवर्षी येथील कांही शिवप्रेमी मंडळींनी केले होते. सदरील खोदकामात
सापडत चाललेल्या मुर्त्यां आणि मंदीराच्या ओघामुळे हे खोदकाम संकलेश्वर मंदिराच्या पायापर्यंत नेण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला होता. परीणामी या ऐतिहासिक मंदीराच्या चोहोबाजूंनी जवळपास पाच एक फुटुचा खड्डा निर्माण झाला होता तर पुरातत्व विभागाच्या पहाणीत या मंदीराची डावी बाजू किंचीतशी झुकली असल्याचे ही निदर्शनास आले होते.
गतवर्षी या अनाधिकृत खोदकामाच्या बातम्या वृत्तपत्र व सोशल मेडीयावरुन दळकुलागल्या नंतर पुरातत्व विभागाच्या एका टीमने या मंदीराची पहाणी करुन या बाबतचा अहवाल शासनाकडे दिला होता. व या मंदीर परीसरितील खोदकामात सापडलेल्या मुर्त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणार आसल्याचे सांगितले होते.
पुरातत्व विभागाच्या पथकाने २६ जानेवारी रोजी केलेल्या पहाणीत पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक अजीत खंदारे यांच्या नेत्रत्वाखालील सहा जणांच्या पथकाने संकलेश्वर मंदीराच्या परीसराची पुरातत्व विभागाच्या निकषानुसार मंदीर परीसरात केलेल्या खोदकामाची, खोदकामात सापडलेल्या अर्धवट तुटलेल्या अवस्थेत सापडलेल्या मुर्त्यांची आणि संकलेश्वर मंदीराची पहाणी केली होती, मात्र या मुर्त्या़च्या संरक्षणाची कसलीही व्यवस्था न करता हे फथक निघुन गेले होते.
आता पावसामुळे या ऐतिहासिक मंदीराच्या चोहोबाजूंनी पाणी साचल्यामुळे हे मंदीर पुन्हा चर्चेत आले असून मंदीर संरक्षणासाठी पुरातत्व विभागाने तखतडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे.
पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही वास्तुची, मंदीराची परवानगी न घेता केलेले खोदकाम हे बेकायदेशीर असून हे खोदकाम करणा-या इसमांवर भारतीय निखात निधी १८७८ आणि मुंबई अखात निधी अधिनियम १९५८ च्या नियमानुसार गुन्हे दाखल करता येतात. मात्र पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी मंदीर परीसरात खोदकाम करणा-यांना अद्दाप साधी नोटीसही बजावण्याची तसदी घेतली नाही.
पुरातत्व विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा
११ शतकातील संकलेश्वर मंदीर हा या विभागातील अत्यंत मौलीक आणि ऐतिहासिक ठेवा असून हा ठेवा जतन करण्याची जबाबदारी ही पुर्णपणे पुरातत्व विभागाची आहे. त्यामुळे या ऐतिहासिक मंदीरास पावसाच्या पाण्यामुळे कसल्याही प्रकारचा धोका होवू नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामंदीर परीसरात करण्यात आलेल्या खोदकामात सापडलेल्या अनेक मुर्ती आज पावसाने साचलेल्या पाण्यात तील गाळात अडकल्या असून या मुर्त्या सुरक्षीत ठिकाणी ठेवणे गरजेचे झाले आहे.