बीड आणि लातूरमध्ये जिल्ह्यात आठ दिवसांपासून नुसतीच भुरभुर..!
दमदार पाऊस नसल्यामुळे अजुनही १४४ तलाव कोरडेच


बीड जिल्ह्यात गेली आठवडाभरापासून पावसाची नुसतीच, भुरभुर सुरु असून अजुनही मोठ्या दमदार पावसाची गरज आहे. आठ दिवस सुरु असलेल्या या भुरभुर पावसामुळे शहरातील सिमेंट च्या जंगलात मोठा पाऊस झाल्यासारखे वाटत असले तरी जिल्ह्यातील १४४ तलाव अजुनही कोरडेच आहेत. हे सर्व तलाव भरण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या दमदार पावसाची आवश्यकता आहे.
यावर्षी पावसाळा खुप उशीरा सुरु झाला. पावसाळा सुरु होवून दिड महिना उलटला असला तरी देखील बीड जिल्ह्यात अजूनही म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. दिवसभर आभाळ भरून येत मात्र भुरभुर पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील तब्बल १४४ तलाव अद्यापही कोरडेच आहेत. या भुरभुर पावसामुळे पिकाचा प्रश्न मिटला असला तरी पिण्याच्या पाण्याची मात्र अद्याप सोय झालेली नाही हे निश्चित.
बीड जिल्ह्यामध्ये एकूण १४४ लहान-मोठे प्रकल्प आहेत. मात्र, प्रत्येक प्रकल्पातील पाणीताळीत फरक राहिलेला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच समप्रमाणात पाऊस झाला असे नाही तर अंबाजोगाई, परळी, केज या तालुक्यांवर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र, रिमझिम असेच स्वरुप राहिलेले आहे. त्यामुळे केवळ खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठे असे १४४ प्रकल्प असून त्यातील ७५ प्रकल्प आजही जोत्याखाली आहेत. पावसाने अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील सहा प्रकल्प १०० टक्के पुर्ण क्षमतेने भरले आहेत.
बीड शहरालगत असलेल्या बिंदुसरा धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शिवाय या धरणातील पाणीपातळी खालावली तर माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. गतवर्षी तुडूंब भरुन वाहणाऱ्या बिंदूसरा धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेलाच नाही. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नसून भविष्यात अपेक्षित पाऊस झाला तरच पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. अन्यथा नागरिकांना पुन्हा एकदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान मराठवाड्यात काही जिल्ह्यात जास्तीचा पाऊस झाल्याने सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, ३ लाख ३० हजार ३५७ शेतकऱ्यांचे अंदाजे ३ लाख २० हजार ८७९ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर २६१ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. हिंगोली जिल्ह्यात १९ हजार १९७ शेतकऱ्यांचे १५ हजार ९४४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात १५०० शेतकऱ्यांचे १२०० हेक्टर नुकसान झाले. जालना जिल्ह्यात ३७७ शेतकऱ्यांचे ५० हेक्टरचे नुकसान झाले असून, २०५ हेक्टर जमीन खरडून गेली आहे.
75 प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखालीच
बीड जिल्ह्यामध्ये एकूण 144 लहान-मोठे प्रकल्प आहेत. मात्र, प्रत्येक प्रकल्पातील पाणीताळीत फरक राहिलेला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच समप्रमाणात पाऊस झाला असे नाही तर अंबाजोगाई, परळी, केज या तालुक्यांवर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र, रिमझिम असेच स्वरुप राहिलेले आहे. त्यामुळे केवळ खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठे असे 144 प्रकल्प असून त्यातील 75 प्रकल्प आजही जोत्याखाली आहेत. पावसाने अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील सहा प्रकल्प 100% क्षमतेने भरले आहे.
बिंदुसरा धरणात 37 टक्के पाणीसाठा
बीड शहरालगत असलेल्या बिंदुसरा धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शिवाय या धरणातील पाणीपातळी खालावली तर माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. गतवर्षी तुडूंब भरुन वाहणाऱ्या बिंदूसरा धरणात केवळ 37 टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेलाच नाही. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नसून भविष्यात अपेक्षित पाऊस झाला तरच पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. अन्यथा नागरिकांना पुन्हा एकदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.