द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून निवड
द्रोपदी मुर्मू यांची एकुण कारकीर्द


एनडीए च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आपले प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या मतांनी पराभव करीत विजय मिळवला. द्रौपदी मुर्मू या आता भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून कामकाज पहातील.
भारताच्या १५ व्या राष्ट्रपती निवडीसाठी १८ जुलै रोजी मतदान झाले होते. आज २९ जुलै रोजी झालेल्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांनी आपले प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांचा पराभव करीत विजय मिळवला. द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्याचे जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचे देशभरात मोठे स्वागत होत आहे. द्रोपदी मुर्मू ह्या एक संथाल आदीवासी जमातीमधील महिला आहेत. द्रोपदी मुर्मू यांचा जन्म हा १९५८ मध्ये ओरिसातील मयुरभंज ह्या जिल्हयामधील बडीपोसी नामक गावात झाला होता.(Draupadi Murmu was elected as the 15th President of India)
द्रोपदी मुर्मू यांची एकुण कारकीर्द
द्रौपदी मुर्मू या सुरूवातीला शिक्षिका होत्या. नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०००-२००९ मध्ये त्यांनी भाजपचे तिकिट प्राप्त करुन त्यावर आमदारकीचे पद देखील प्राप्त केले होते. त्याच्या आधी त्या १९९७ मध्ये रायनगरपुर नावाच्या नगर पंचायती मधुन नगरसेवक म्हणून निवडुन आल्या होत्या. द्रोपदी मुर्मू यांचे वय ६५ आहे. तर यांचे वजन ७५ आहे. द्रोपदी मुर्मू यांची उंची एकुण पाच फुट पाच इंच इतकी आहे. द्रोपदी मुर्मू ह्या संथाल नामक आदीवासी जमाती मधील आहेत. त्यांचा धर्म हिंदु आहे. द्रोपदी मुर्मू झारखंड राज्याच्या प्रथम महिला राज्यपाल होत्या.
भाजपने केली राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणुन कोणाची निवड
भाजप पक्षाने आपली राष्टपतीपदाचे उमेदवार म्हणून द्रोपदी मुर्मू यांची निवड करण्यात आली होती. २१ जुन रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. जी भाजप पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होती. या बैठकीत राष्टपतीपदाकरीता द्रोपदी मुर्मू यांच्या नावाची निवड करण्यात आली होती.
भाजप पक्षातुन पुर्वेकडील विभागातील एखादा उमेदवार राष्टपतीपदासाठी उभा करावा आणि तो उमेदवार महिला गटातील असावा. असा विचार आमच्याकडुन करण्यात आला होता. असे भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले होते.
आजपर्यत आदीवासी जमातीमधील राष्टपती उमेदवाराला भारतात पाहिले गेले नाही. याचकरीता तब्बल वीस ते पंचवीस नावांचा विचार करून झाल्यानंतर आदीवासी जमातीमधील महिला उमेदवार म्हणून भाजपाने द्रोपदी मुर्मू यांची निवड केली होती.