प्रबोधन

पद्मश्री पुरस्कार घेण्याकरता दिल्लीला जाण्यासाठीही पैसे नाहीत?, पाहा काय आहे सत्य…

पद्मश्री पुरस्काराचा इतिहास

पद्मश्री पुरस्काराचा इतिहास

के.आर. नारायणन यांच्या अध्यक्षतेदरम्यान पद्मश्री प्रमाणपत्र कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी यासह विविध क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल भारतातील नागरिकांना सन्मानित करण्यासाठी 1954 मध्ये पद्म पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. भारताचे नागरिक नसलेल्या परंतु भारतासाठी विविध प्रकारे योगदान दिलेल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.

निवडीच्या निकषांवर काही त्रैमासिकांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की विशिष्ट व्यक्तींना पसंती देण्यासाठी अनेक उच्च पात्र कलाकारांना डावलण्यात आले आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या नागरी “पद्म” पुरस्कारांसाठी नामांकनाची शिफारस करण्यासाठी भारताने आता सामान्य नागरिकांसाठी ऑनलाइन नामांकन मंच तयार केला आहे. त्याच्या समोर, “पद्म”, ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये कमळ, आणि “श्री”, संस्कृत-व्युत्पन्न सन्मानार्थी समतुल्य ‘श्री. किंवा ‘कु.’ (म्हणजे, “नोबल वन इन ब्लॉसम”), देवनागरीमध्ये कमळाच्या फुलाच्या वर आणि खाली दिसतात. दोन्ही बाजूला भौमितिक नमुना जळलेल्या कांस्य मध्ये आहे. सर्व एम्बॉसिंग पांढऱ्या सोन्यात आहे.

पद्मश्री पोस्टाने पाठवा ही हलधर नाग यांच्यावरील पोस्ट.

ओरिसातील एक गरीब कवी हलाखीचे जीवन जगताना राम शबरीवर महाकाव्ये लिहितो, ती अभ्यासक्रमाला लागतात. या अल्पशिक्षित कविवर पाच लोक पीएचडी करताहेत. त्याच्यावर अनेक लेखक लेख लिहितात, मग पद्मश्री मिळते तर पदवी घ्यायला दिल्लीला येऊ शकत नाही पदवी पोस्टाने पाठवा असे हलधर कळवतात म्हणे.

या स्टोरीमध्ये ड्रामा आहे. ॲक्शन आहे. गरीबी असल्याने टनावारी अश्रू आहेत. हरिजन वगैरे शब्द पेरून सहानुभूतीची लाट निर्माण केलेली आहे. यात ही “सत्यकथा” आहे, “प्रेरणादायी” आहे वगैरे भलावणच सांगते की ही जाहिरातस्टोरी आहे. प्रायोजित स्टोरी आहे. मोझीजी किती गरीब, योग्य नी थोर लोकांना पुरस्कार देतात हे लोकांच्या मनावर ठसविण्याचा हा उद्योग आहे.

१) सदर गृहस्थ राष्ट्रपती भवनात उपस्थित राहून प्रणव मुकर्जी यांच्याहस्ते पद्मश्री स्वीकारतात आणि तरीही पोस्टाने पाठवा, प्रवासाला पैसे नाहीत वगैरे स्टोऱ्या कशासाठी?

२) पद्म पुरस्कार विजेत्यांचा प्रवासखर्च शासन करते. पुढे आयुष्यभर त्यांना देशभर रेल्वे प्रवास मोफत असतो.

३) ज्यांच्यावर पाच लोक पीएचडी करतात त्यांच्याकडे म्हणे एकूण रक्कम ७३२ की ७७२ रुपयेच असते इ. स्टोरीज उघडच बनावट दिसतात. त्यांचे पोतराज टाईप केस आणि ड्रेस डिझाईन वगैरे बघता, नी स्वयंपाक वगैरे करतानाचे फोटो इ. बघता ही पीआरद्वारा पसरलेली फेकूकथा आहे हे खुल्ला दिसते.

५) पुस्तकं अभ्यासक्रमाला लागतात, बँकेकडून कर्ज काढून माणूस व्यवसाय करतो नी तरीही दयनीय वगैरे ह्या उघडपणे संघीय स्टोऱ्या आहेत.

६) मुळात २०१४ पासून फक्त संघवाल्यानाच पद्म पुरस्कार मिळतात,तेव्हा ही संघीय प्रचाराची टिपिकल स्टोरी आहे.

७) असेच उदात्तीकरण आंबेवाल्या भिडे गुरुजींचे केले जाते. मागे एका पद्म विजेत्यांचे केले गेलेले. सायकलवर फिरतात वगैरे. नंतर त्यांना केंद्रीय मंत्रीही केले गेले. नंतर उघड झाले की माणूस प्रज्ञा ठाकूर टाईप सराईत हिस्ट्रीसिटर आहे.

या सगळ्या स्टोऱ्या म्हणजे, एक आटपाट नगर होतं नी तिथे एक गरीब राहत होता, टाईप उदात्तीकरण कथा आहेत. तिथे आता फरक इतकाच झालाय की एक हरिजन,एक आदिवासी असे बदल केले गेलेत कारण मतदार बहुजन आहेत नी हलधर काका नी आदिवासी काकू ओरीसातले आहेत, जिथे लवकरच निवडणुका आहेत…

तेव्हा अफवा गँगच्या या फेक आणि फेकु स्टोऱ्या शेयर करणे वा फॉरवर्ड करणे बस्स झाले यार!
साभार प्रा हरी नरके

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker