नऊ कोटी असेलला जॉबनाकारुन २२ व्या वर्षी घेतली दिक्षा
जळगावच्या उच्च शिक्षित दिक्षाचे प्रोफाईल बघून चाट पडाल


उच्च शिक्षित, श्रीमंत, सर्व सुखसुविधा असूनही तरूण वयात संन्यास घेतला. जळगावच्या (Jalgaon) दिक्षा बोरा (Diksha Bora) आणि आताच्या संयमश्रीजी महाराज असे या दिक्षा घेतलेल्या मुलीचे नाव आहे. शिक्षण घेत असताना त्यांनी २०१३ ला जैन धर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तेथून त्यांनी निश्चय केला की, आपल्यालाही दिक्षा घ्यायची आहे. परंतु यासाठी घरच्यांची परवानगी हवी होती आणि घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. दिक्षा बोरा यांनी घराच्यांच्या संमतीने अखेरीस ९ डिसेंबर २०१९ रोजी धर्मप्रचारासाठी वयाच्या २२ व्या वर्षी संन्यास घेऊन स्वतःला झोकून दिले.
दिक्षा बोरा यांचे आताचे संयमश्रीजी महाराज त्यांनी पुणे येथून बीबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. दिक्षा बोरा या राष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू आहेत. तसेच शिक्षण घेत असताना क्रीडा, वादविवाद, कला, गायन, संभाषण आधी प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
संयमश्रीजी महाराज म्हणजेच पुर्वाश्रमीच्या दिक्षा बोरा यांचा दिक्षाघेण्या अगोदरचा जीवन प्रवासही रंजक आहे. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. तसेच त्या सुखवस्तु व श्रीमंत परिवारातून असून कॅलिफोर्निया येथील कंपनीने त्यांना व्यक्तिमत्व विकासाचा जॉब ऑफर करताना तब्बल ९ कोटींचे पॅकेज देण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर न स्वीकारता त्यांनी दिक्षा घेणंच पसंत केले.
जीवनात पैसाच सर्व काही नसतो आपल्या मनाचा आनंद कशात आहे हे देखील महत्वाचे असते. आणि आनंद गुरूच्या चरणी मिळतो म्हणुन मी माझ्या गुरूच्या चरणी जायचं ठरवलं असं संयमश्री महाराज सांगतात. ९ कोटींचा आकडा ऐकल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटते परंतु मला अजूनही वाटत नाही की, मी ९ कोटी रुपये सोडून आले. पैशा मागे धावण्यापेक्षा आपण कमावलेल्या पैशात सुखी आहोत का? आपल्या जीवनात आपण सुखी आहोत का? याचा शोध आपण घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया संयमश्रीजी महाराज त्यांनी व्यक्त केली.
‘जीवनाचे सार समृद्धीमध्ये नाही तर शांती आणि समाधानात आहे’
आयुष्यात पैसाच सर्वस्व नाही. आपले मन किती शांत आणि आनंदी आहे, हे महत्त्वाचे आहे. आनंद गुरूंच्या चरणी भेटतो. ही दीक्षेची श्रद्धा आहे. नऊ कोटींच्या पॅकेजबद्दल ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आहेत पण दीक्षाला तिच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही. दीक्षा सांगते की, आपण किती पैसे कमावले हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेवढे पैसे कमावले ते आपल्याला आनंद देऊ शकले आहेत.
आपण आपल्या जीवनात समृद्ध आहोत की नाही, आपण आपल्या जीवनात आनंदी आहोत की नाही हे महत्त्वाचे आहे. 9 कोटींच्या पॅकेजने अहंकार तृप्त होतो, पण पैशाने आनंद विकत घेता येत नाही. पैशाने संसाधने नक्कीच विकत घेता येतात, आनंद विकत घेता येत नाही. दीक्षा बोरा जी आता संयम श्रीजी महाराज म्हणून ओळखली जाते, तिच्या श्रोत्यांसमोर अशाच काही गोष्टी पुन्हा सांगतात.
प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्याने स्वत:च्या मुलांना पाहून घेतला संन्यास. लाखोंची कमाई, सुखी संसार सगळ्याचाच केला त्याग.
सर्व सुखांचा त्याग करत सन्यास घेणाऱ्या अहमदाबादच्या एका जोडप्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. १३ वर्षांपूर्वी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी आता संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलांचं अनुकरण करुन वैराग्याचा मार्ग स्वीकारला आहे.
प्रियांक वोहरा हे अहमदाबादचे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा भव्यता वोहरा यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. बिझनेसमध्ये ते सेटल आहेत. त्यांचा संसारही सुखात सुरु होता. मात्र, त्यांचा मुलगा सुर आणि मुलगी सिरी यांनी दिक्षा घेतली आहे. वोहरा यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी संन्यासत्व स्वीकारले आहे. यानंतर ७० लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेला त्यांचा ऑटो पार्ट्सचा व्यवसाय वोहरा यांची अवघ्या चार दिवसांत बंद करुन मुलांप्रमाणे दिक्षा स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे ही संयमश्री महाराज यांनी सांगितले.