पुलाची उंची वाढवा, नुकसानीचे पंचनामे करा, अतिवृष्टीची आमदार धिरज देशमुख यांनी घेतली तत्काळ दखल;
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी


औसा तालुक्यातील अंदोरा आणि भेटा या परिसरात झालेल्या अतिवृष्टीची आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी तत्काळ दखल घेत येथील भारत विद्यालयाजवळील दोन्ही पुलांची उंची तातडीने वाढवावी, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, अशा सूचना प्रशासनाला केल्या. दरम्यान, पावसामुळे शाळेत रात्री उशिरापर्यंत अडकून राहिलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना आमदार श्री. धिरज देशमुख यांनी धीर दिला.
अंदोरा आणि भेटा परिसरात गुरुवारी (ता. ४) दुपारपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे या दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या भारत विद्यालयातील शेकडो विद्यार्थी शाळेत अडकले. शाळेपासून अंदोरा आणि भेटा गावाकडे जाणारे दोन्ही पुल पाण्याखाली गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत घराकडे परतता आले नाही. या घटनेची तत्काळ दखल घेऊन आमदार श्री. धिरज देशमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्यासह सरपंच असगर पटेल (अंदोरा), सरपंच श्याम शेळके (भेटा) आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे पुलावरील पाणी ओसरल्यानंतर दोरीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोचवण्यात आले.
एकाच आठवड्यात या भागात दोनवेळा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते उखडले आहेत. शाळेकडे जाणाऱ्या दोन्ही पुलांची व रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. याकडे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. रस्त्याबरोबरच पुलाची उंची वाढवण्याचे काम तातडीने व्हावे, या भागात पुन्हा अतिवृष्टी झाली तर तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, असे त्यांनी प्रशासनाला सूचित केले.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
यांच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून महागाई विरोधात आंदोलन, केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल, डीझेल, घरगूती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जी.एस.टी मुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्रसरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईत चालू केलेल्या भारतीय सैन्यदलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. या सर्व बाबींचा व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख व मा. आमदार. धिरज विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी लातूर शहरातील काँग्रेस भवन समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध म्हणून चुलीवर स्वयंपाक करुन महिला काँगेस या आंदोलनात सहभागी झाली.