ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवीदिल्ली तुन ठाकरेंना धक्का

१२ खासदारांना सोबत घेऊन केले शक्ती प्रदर्शन

नवी दिल्ली / राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्यासोबत सेनेचे बारा खासदार असल्याचं दाखवून देत उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला. अडीच वर्षांपूर्वी जे व्हायला हवं होतं ते आपण महिनाभर पूर्वी केलं अस सांगत त्यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणल्यानंतर दिल्लीत जाऊन शिवसेनेच्या तब्बल बारा खासदारांना सोबत घेत आपण योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले. दिवसभर खासदारांसोबत बैठक घेत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.

या पत्रकार परिषदेला गटनेते खा राहुल शेवाळे, प्रतोद खा भावना गवळी, खा हेमंत पाटील, खा, हेमंत गोडसे, खा कृपाल तुमाने, खा धैर्यशील माने, खा सदाशिव लोखंडे, खा मंडलिक आदि हजर होते. आपलाच गट अधिकृत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

कोणते प्रमुख नेते शिंदे गटात?

कारण नवी मुंबईतील गटनेते विजय नहाटा व शिवसेनेचे मोठे नेते विजय चौगुले यांनी शिंदे गटाला पहिल्यापासूनच समर्थन दिल आहे. शिवसेना नेते विजय चौगुले यांना मानणारा वर्ग नवी मुंबई मोठ्या प्रमाणात आहे व विजय चौगुले 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकटावरून विधानसभा लढवली होती. ठेव्हा त्यांचा पराभव हा तेव्हा राष्ट्रवादीत असलेले संदीप नाईक यांनी केला होता. मात्र 2019 ला शिवसेना-भाजप युती असल्यामुळे ऐरोली विधानसभेत भाजप विद्यमान आमदार गणेश नाईक हे निवडून आले होते.

माजी नगरसेवकही जाणार?

नवी मुंबईतील विविध कार्यक्रममध्ये देखील विजय चौगुले हे सध्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवत होते. त्यामुळे ते शिंदे गटात गेल्याने त्यांच्यासोबत असणारे माजी 20 नगरसेवक देखील शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. बेलापूर विधानसभेमधून शिवसेनेच्या तिकटावर विजय नाहाटा लढले होते. त्यामुळे ते देखील एकनाथ शिंदे यांना मानणारे आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिक हे शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा आहेत.

कल्याण-डोंबिवलीत धक्का बसणार?

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुबंई या परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दबदबा आहे. त्यामुळे या परिसरात ठाकरेंची साथ अनेक नेते सोडून शिंदे गटात दाखल होत आहेत. हे फक्त ठाण्यावर आणि नवी मुंबईवर थांबण्यासारखं चित्र सध्या तरी नाही. कारण कल्याण-डोंबिवलीतही अशाच फुटीचा सामना हा ठाकरेंना करावा लागू शकतो, असा अंदाज हे राजकीय पंडित वर्तवत आहेत.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker