राष्ट्रीय

७० फुट लांबीचा राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांच्या संकल्पनेतून आणि आई सेंटरच्या माध्यमातून आयोजित उपक्रमात मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांकडून अंबाजोगाई शहरानजीक पिंपळा धायगुडा गावा शेजारील दूरदर्शन केंद्रा नजीकच्या परीसरात समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फुट उंचीवरील डोंगरावर सर्वांत उंच ठिकाणी मोठ्या आकाराचा तब्बल ७५ फुट लांबीचा तिरंगा ध्वज फडकावून तसेच राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करून प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन दिले.

अंबाजोगाई शहरानजीक पिंपळा धायगुडा गावा शेजारील दूरदर्शन केंद्रा नजीकच्या परीसरात समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फुट उंचीवरील डोंगरावर सर्वांत उंच ठिकाणी मोठ्या आकाराचा तब्बल 75 फुट लांबीचा तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला. यावेळी ध्वजवंदन समारंभानंतर उपस्थित तरूणांना मार्गदर्शन करताना “द डायनॅमिक कम्युनिकेटर” या  अमेझॉनवरील बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक, आई सेंटरचे संचालक विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की, केंद्र सरकार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘आई सेंटर’ ने मागील सात-आठ दिवसांपासून या भव्य आकारातील तिरंगा ध्वज १५ ऑगस्टच्या काळात फडकाविण्याचे नियोजन केले होते. अंबाजोगाई, बीड जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्र आणि भारताचा नांवलौकिक  जगात व्हावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे मत या वेळेस जोंधळे यांनी व्यक्त केले. 

तसेच समाजात वावरताना सर्व जगभरात आदर्श असलेले भारताचे संविधान निर्माते ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील लोकशाहीच्या माध्यमातून भारत एक सशक्त राष्ष्ट्र निर्माण करण्यासाठी तरूणांना सक्षम बनविण्याचा विडा उचलून आपले योगदान देण्याचे आवाहन करीत ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. यावेळेस बोलताना स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे म्हणाले की, आयुष्य जगत असताना आनंदी, निरोगी व तणावमुक्त राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. 

हे स्वप्न साकार करण्यासाठी ध्येय असणा-या गुरूजनांचे व व्यक्तींची प्रेरणा घेत त्यांचे मार्गदर्शन घेणे, चांगला मित्र परिवार असणे, आदर्श दिनचर्या, सृजनशील ज्ञानार्जन व आधुनिक युगातील कौशल्य हस्तगत करणे आवश्यक असल्याचे अधिष्ठाता डॉ.खैरे यांनी सांगितले. 

या उपक्रमात आयोजक सर नागेश जोंधळे, कृषी महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, अंबाजोगाई दूरदर्शन केंद्रप्रमुख इंजि.सदाशिव चापुले, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.राहुल धाकडे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, ज्येष्ठ पत्रकार जगन सरवदे, पञकार दादासाहेब कसबे, पञकार रणजित डांगे, डॉ.इंद्रजीत भगत, डॉ.अनंत मरकाळे, प्रा.डॉ. किरण चक्रे, राजेश रेवले, राजु वाघमारे, अरूण शिंदे, विश्वास चौबे, प्रेसफोटोग्राफर अशोक कचरे, गणेश साबणे, अस्मिताताई ठोंबरे, सौ.सुनिता डांगे, अतुल ढगे, संजय शिंगणकर, राष्ट्रध्वज टेलर महादेव पुदाले या मान्यवरांसह आई सेंटरचे प्रियंका काळे, योगेश्वरी पुदाले, श्रद्धा शिंदे, कांचन बडे, तेजस्विनी डांगे, श्रद्धा गायकवाड, अंकिता पुदाले, ध्रिती भगत, श्रेया जाधव, प्रगती गडदे, अनोरा भगत, शिवेंद्र डांगे, कुणाल रोडे, रोहन डोंगरे, सिद्धांत पोटभरे, फुरखान सय्यद, आदित्य वाघमारे, अमृता पुदाले, उमा गडदे, अजय जाधव, अभय वाघमारे, प्रणित चाटे, ऋषिकेश खोडवे यांच्यासह अंबाजोगाई दूरदर्शन केंद्रातील अधिकारी एस.एम.देशमुख, संजय पटेल, अशोक सोनवणे, व्यंकट आकाते, मुरलीधर चव्हाण, श्याम माळी, मुकुंद कोरे, शिवाजी कोकरे, बाबुभाई पठाण आदींसह महाराष्ट्राच्या कोनाकोप-यातून बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद येथील वय वर्षे ४ ते ६० वयोगटातील एकूण १०० हून अधिक जणांनी सक्रिय आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांच्या संकल्पनेतून आई सेंटरच्या माध्यमातून धायगुडा पिंपळा गावाशेजारील जिथे दूरदर्शन केंद्रानजीक परीसरात समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फुट उंचीवरील डोंगरावर सर्वांत उंच ठिकाणी प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन देत आणि भारतीय संविधानाचा आदर व त्यावर श्रध्दा ठेवून अंबाजोगाई तालुक्यात तब्बल ७५ फूट लांबीचा व ६ फुट रूंदीचा असा भव्य आकार असलेला तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला आहे. या तिरंगा ध्वजाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली. अत्यंत लक्षवेधक आणि दिमाखदार अशा या सोहळ्यात ७५ फूट लांबीचा व सहा फुट रूंदी असलेला भव्य तिरंगा ध्वजाचे उपस्थित प्रत्येकाने ध्वजाची एक कडा धरून ठेवत तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. तदनंतर उपस्थित सर्वांनी एकत्र येत गजरात उंच स्वरांत राष्ट्रगीत गाऊन ध्वजवंदना संपन्न झाली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘हर घर तिरंगा, घर-घर तिरंगा’ या गगनभेदी घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमला होता. पिंपळा धायगुडा गाव आणि 

अंबाजोगाईकरांची मान उंचावणारा उपक्रम अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व ‘आई सेंटर’चे संचालक सर नागेश जोंधळे हे मागील एक दशकापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. असे असतानाच त्यांनी यापूर्वी २०२१ साली कोकणकडा येथील मोहिमेत सहभाग घेत विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट दिनी तरूणांना प्रेरित करण्यासाठी अनोख्या व ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन करून जोंधळे यांनी अंबाजोगाईकरांची मान राज्य, देश व जगात उंचावली आहे.

अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व ‘आई सेंटर’चे संचालक सर नागेश जोंधळे हे मागील एक दशकापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. असे असतानाच त्यांनी यापूर्वी २०२१ साली कोकणकडा येथील मोहिमेत सहभाग घेत विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट दिनी तरूणांना प्रेरित करण्यासाठी अनोख्या व ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन करून जोंधळे यांनी अंबाजोगाईकरांची मान राज्य, देश व जगात उंचावली आहे.

 डॉ.बाबासाहेब ठोंबरे प्राचार्य, कृषी महाविद्यालय, लातूर.

ऐतिहासिक क्षण..! 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपला  तिरंगा ध्वज अंबाजोगाई शहरानजीक पिंपळा धायगुडा गावा शेजारील दूरदर्शन केंद्रा नजीकच्या परीसरात समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फुट उंचीवरील डोंगरावर सर्वांत उंच ठिकाणी फडकताना अतिशय आनंद वाटत होता. उपस्थित प्रत्येकासाठीच हा क्षण ऐतिहासिक व अभिमानाचा होता. ही मोहीम समर्पित भावनेतून आई सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात आली याचा मोठा आनंद आहे.

नागेश जोंधळे हे (‘द डायनॅमिक कम्युनिकेटर’ या ॲमेझॉन वरील बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक  तथा आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार विजेते)

 

 

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker