बीड

बीड जिल्ह्यात पावसाची उघडीप; पिके करपली

बीडची पिके जळाली आहेत, शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत आणि उष्णतेची लाट सर्वाधिक आहे

Namita Mundada

आ. नमिता मुंदडा यांची विमा कंपनीकडे पंचनामे करण्याची मागणीगेल्या महिनाभरापासुन पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, मुग, उडीद, कापूस यासह इतर पिके फुलोऱ्यात आले असतानाही फुलांना गळती लागली त्यामुळे पिकांना शेंगा लागल्या नाहीत. तसेच हलक्या जमीनीवरील खरीपाची पिके करपून गेली. विमा कंपनीने याचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी केज मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, पिके मोठ्या प्रमाणात घेतली व ती पिके जोमात आली. परंतु मागील 20 ते 25 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, मुग, उडीद, कापूस यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील अत्यंत कमी प्रमाण पाऊस पडला. तर काही भागात पाऊस झालाच नाही. त्यामुळे सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, पिकांचे फुले, पाने गळती होऊन नुकसान झाले. तर डोंगराळ व हलक्या जमिनीवरील पिके करपून गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिलएकंदरीत पिकांच्या वाढीवर वातावरणातील विविध घटकांचा परिणाम होत असतो यामध्ये प्रामुख्याने एकूण पाऊस, पावसाचे दिवस, पडलेल्या पावसाची सरासरी किमान व कमाल तापमान, आद्रता, सूर्यप्रकाशाचे तास, वाऱ्याचा वेग, जमिनीचा प्रकार, जमिनीची जलधारण क्षमता, पिकांच्या वाढीची अवस्था, इत्यादी घटकांचा समावेश होतो. शेंगा भरण्याच्या काळात सोयाबीन, मुग, उडीद या पिकांना पावसाच्या पाण्याची आवश्यकता असते. परंतु पावसाचा पडलेला खंड सोबतच वातावरणातील इतर घटकांची परिस्थिती देखील उत्पादन व उत्पादकता निश्चीत करण्यासाठी कारणीभूत ठरते. सध्या पावसाच्या खंडामुळे होणारे नुकसान तपासण्यासाठी हवामान शास्त्र विभागात अभ्यास चालू आहे. पावसाचा 20 ते 25 दिवसाचा खंड पडल्यास 50% उत्पादनात घट होते त्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वरील सर्व बाबींचा विचार करून तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केज मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker