खा.रजनीताई पाटील यांची संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार पदी नियुक्ती


अंबाजोगाई / बीड जिल्ह्याच्या भुमी पुत्र तथा राज्य सभेच्या सदस्या खा. सौ. रजनीताई पाटील यांची केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वतीने ११ जुलै २०२२ रोजी सदरील नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र खा. सौ. रजनीताई पाटील यांना देण्यात आले आहे. सदरील पत्रात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार पदी आपली नियुक्ती करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या पत्रावर भारत सरकारचे अतिरिक्त सतीश डॉ. सत्या प्रकाश यांची स्वाक्षरी आहे.
सांगली जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या रजनीताई या तत्कालीन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आत्माराम पाटील यांच्या कन्या आहेत. आत्माराम पाटील यांचा त्या काळात सांगली जिल्ह्यात राजकीय दबदबा असल्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील व इतर तत्सम नेते आत्माराम पाटील यांना आपले राजकीय गुरू मानत. सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व नेते
आत्माराम पाटील यांचा सन्मान करीत असत. आपल्या वडिलांच्या घरात सतत राजकीय पुढाऱ्यांची वर्दळ असल्यामुळे रजनीताई पाटील यांच्या मनावर नकळत कॉंग्रेस पक्षाचे संस्कार घडत गेले. याचमुळे महाविद्यालयीन शिक्षणासोबतच रजनीताई पाटील राजकारणात सक्रिय होवू लागल्या.
पुढे केज येथील कॉंग्रेस पक्षाचे
कार्यकर्ते अशोक पाटील यांच्या शी त्या विवाहबद्ध झाल्या आणि केजच्या रजनीताई पाटील अशी नवी ओळख त्यांनी निर्माण केली. उच्च वाद्दाविभुषण, संभाषण चातुर्य आणि उत्तम वर्क्तत्व कला या वैयक्तिक विकसित केलेल्या नेतृत्वगुण आणि पती अशोकराव पाटील यांची निस्सीम साथ या सर्वांवर त्यांनी कॉंग्रेस पक्षात अढळ स्थान निर्माण करीत गांधी घराण्यात आपली जागा निश्चित केली. याच सदिच्छेवर रजनीताई पाटील यांना सलग दोन वेळेस राज्यसभेचे सदस्यत्व बहाल केले. एवढेच नव्हे तर जम्मु काश्मीर राज्याच्या प्रभारी म्हणून, केंद्रीय खाली ग्रामोद्दोग मंडळाच्या अध्यक्षा म्हणून व इतर अनेक महत्त्वपुर्ण पदावर त्यांना काम करण्याची संधी दिली होती.
असे असले तरी का. रजनीताई पाटील यांनी तत्कालीन खा. सौ. केशरकाकु क्षीरसागर यांच्या राजकीय घराणेशाहीला शह देण्यासाठी जिल्ह्यातील सौ. क्षीरसागर विरोध गटाच्या उमेदवार म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवून विद्यमान खा. सौ केशरकाकु क्षीरसागर यांचा बीड लोकसभा मतदारसंघातुन पराभव करीत त्यांनी भाजपाच्या खासदार म्हणून पाच वर्षे लोकसभेत काम केले आहे.
खा. सौ. रजनीताई पाटील या सध्या राज्येसभेत कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत असतांनाच लोकसभेच्या सांसदीय कामकाज मंत्रालयाने त्यांची नियुक्ती भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. खा. सौ. रजनीताई पाटील यांची ही नियुक्ती बीड जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची समजली जात असली तरी कॉंग्रेस पक्षातील सध्या होवू घातलेल्या नवीन राजकीय समिकरणाचा या नियुक्ती शी काही संबंध आहे का हे ही तपासण्याची आवश्यकता आहे.