महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीतुन मनोज जरांगे पाटील यांची माघार

निवडणुक प्रक्रियेतुन मनोज जरांगे यांची माघार घेत असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुक एकाच जातीवर कधीही लढवली जावू शकत नाही असे मत मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेतला होता. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन पक्ष त्यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी माणून या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे विरोधात त्या उमेदवार देण्याची घोषणा काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांचे करारपत्र आणि व्हिडिओग्राफी ही मागवून घेतली होती.

मात्र आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी माध्यमांसमोर बोलताना आपण निवडणूक प्रक्रियेतुन माघार घेत असल्याचे सांगितले. काल रात्री आपण समाजातील प्रतिनिधींसोबत पहाटे तीन वाजेपर्यंत चर्चा करुन आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
काल मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या उमेदवारांविरुध्द आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर ते समाजमाध्यांवर खुप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. विशेषतः अनेक मराठा उमेदवारांविरोधात ही त्यांनी आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर मराठा समाजामधील अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विरोधात आपली स्पष्ट भूमिका करुन विरोध केला होता. यासर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडुन करण्यात येत आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker