खाजगी कोचिंग क्लासेस साठी केंद्र सरकारची नवी नियमावली !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240119_1109334684885808535316464-1024x597.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240119_1109334684885808535316464-1024x597.jpg)
नियमावली न पाळल्यास २५ हजारांचा दंड
खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
16 वर्षांखालील विद्दार्थ्यांना प्रवेश नाही
त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेस ना बंधनकारक असणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240119_1109155734401429298382312-1024x639.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240119_1109155734401429298382312-1024x639.jpg)
अव्वाचे सव्वा फी लावण्यास बंधन!
केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार कुणालाही खासगी कोचिंग सेंटर उघडता येणार नाही. त्यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागेल. त्याशिवाय 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. त्याशिवाय कोचिंग सेंटर चालवणारे विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.
सुरक्षे संदर्भातील एनओसी आवश्यक
NEET अथवा JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासमध्ये मनमानी फी आकारली जाते. त्यामुळे या सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, आयआयटी जेईई, एमबीबीएस, नीट यासारख्या प्रोफेशनल कोर्साठी कोचिंग सेंटरमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय सुरक्षासंदर्भात एनओसी असणंही बंधनकारक करण्यात आली आहे.
मानसिक आरोग्य संबंधित धडे देणे बंधनकारक
परीक्षा आणि त्याच्या निकालाच्या दबावाशी संबंधित समस्यांवर
प्रतिबिंध करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आणि आरोग्याशीसंबंधित धडे आणि पाठबळ द्यावे, असेही नियमांत म्हटलेय.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240119_1108564401206433567246482-1024x450.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/01/img_20240119_1108564401206433567246482-1024x450.jpg)
नव्या नियमानुसार क्लासची नोंदणी करणे आवश्यक
कोचिंग सेंटर्सने केंद्र सरकारच्या नियमांनुसार नोंदणी करणं अनिवार्य आहे. त्याशिवाय सर्व नियमांचं पालनही करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. कोचिंग क्लासेसने नियम मोडल्यास आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे. कोचिंग सेंटरकडून नियमांचे एकदा उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. जर पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतरही नियम पाळले गेले नाहीत तर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.
अर्धवट क्लास सोडलेल्या विद्दार्थ्यांना उर्वरीत फी परत करणे बंधनकारक!
नव्या नियमांनुसार, एखाद्या कोर्सदरम्यान कोचिंग सेंटरला फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला, तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. हॉस्टल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल. दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम माघारी करावी लागेल.