महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ४० शेतकऱ्यांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण

अटल अर्थसहाय्य योजनेला कर्ज व अनुदान मिळावे

अटल अर्थसाहाय्य योजनेला कर्ज व अनुदान मिळण्याची मागणी

४० शेतकऱ्यांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण
अटल अर्थसहाय्य योजनेला कर्ज व अनुदान मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ४० शेतकऱ्यांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
साखर संकुल पुणे, शिवाजीनगर समोर शेतकरी महाराष्ट्र अटल अर्थ साहाय्य बचाव समिती संघर्ष आमरण उपोषणास बसले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरकारकडून १२.५ कोट रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचा या संघटनेचा आरोप आहे.


महाराष्ट्रात अटल नाविन्यपूर्ण अर्थसाहय संस्था स्थापन करून शेतकरी मुलांना गेले ५ वर्षा पासून फसवणूक, १२.५% रक्कम खर्च करून सरकारी योजना स्थापन करून त्यात १२% एम सी डी सी ने खर्च करून शेतकरीला शेती पूरक योजना आणली होती. त्या प्रमाणे १२.५% रक्कम संस्थे साठी खर्च केली असून उर्वरित रक्कम एम सी डी सी पुणे यांच्या खात्याला जमा झालेली असून ती रक्कम वितरित झाली नाही. त्या मुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी एम सी डी सी कार्यालय पुणे येथे जोपर्यंत रक्कम खात्यात जमा होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार आहे, असे निवेदन अधिकारी मा. मिलिंद आखरे व्यवस्थापक म. रा. स. विकास महामंडळ पुणे यांना दिले. त्यात १२.५% लोन, ७५% अनुदान असे एकूण ८७.५% व १२.५% स्वखर्च रक्कम आहे.

उपोषणात सहभागी मा रामप्रभू मुंडे बीड मा. जितेंद्र कांबळे (सांगली), लहूदास मुंडे (आंबेजोगाई), दिलीप कातकडे (नाशिक), मोहन इंगळे (अमरावती), बाबाजी गोपाळे (अहमदनगर), तानाजी ढाले (कोल्हापूर), नामदेव दहुले ( चंद्रपूर), एल. आर. मुंडे (बीड), रमेश फड (बीड), अण्णासाहेब डोंगरे (नाशिक), जितेंद्र देसाई (कोल्हापूर), राजकमल बहुऊदेशी सस्था वडवणी, ज्ञानेश्वर जाधव ( वडवणी), रमेश गव्हाणे (नाशिक), भीमराव पवार(जालना), सोनू चव्हाण (बुलढाणा), सागर वानखेडे(अकोला), तुळशीराम पवार (परळी), बंडू गोसावी(लातूर), डॉ. जयश्री मुंडे(बीड), उत्तरा कलबुर्गे (लातूर), प्रणिता बिंबळे (लातूर), सुरेखा पुरी(लातूर), सुरेखा तुपे(सातारा),उमेश गोरे(धाराशिव), प्रल्हाद बुटे(लातूर) सहभागी झाले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker