Uncategorized

महाराष्ट्र बारव संवर्धन समितीत नॉन टेक्निकल व्यक्तींचा समावेश !

बारव मोहीम समितीची वेगळी चुल; स्वतंत्ररीत्या काम सुरु ठेवण्याचा केला निर्धार !

राज्यातील बारावांना पुर्नजिवीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने अलिकडेच जाहीर केलेल्या महाराष्ट्र बारव मोहीम समितीत राज्य शासनाने गेली अनेक वर्षांपासून कसलाही अपेक्षा न करता बारव संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र बारव मोहीम समितीच्या एकाही टेक्निकल सदस्यांची नियुक्ती न केल्यामुळे या समितीने सुरु केलेले काम स्वतंत्र रीत्या सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणामुळे नवी पिढी इतिहास आणि संस्कृतीपासून तुटत असल्याची ओरड सुरू असताना दुसरीकडे ट्रेकिंगच्या छंदातून गडकिल्ल्यांच्या दिशेने आणि तिथून मग इतिहासाकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढत चालली असल्याचे आपण पहातो आहोत.

ही चळवळ मुंबई येथील तरुण पर्यटक रोहण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली होती. रोहण काळे या तरुणाने महाराष्ट्रतील अनेक जुन्या बारव शोधून समाजापुढे आणल्या आणि बावसंवर्धनाची एक मोहीमच सुरू केली. राज्यभरातील अनेक तरुण या मोहिमेला जोडले गेले. रोहन काळे या तरुणाच्या पुढाकारातून राज्यातील अनेक बारवांचे संवर्धनाचे काम लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर महाराष्ट्रातील जुन्या बारवांचे हे वैभव हे वैभव रोहण काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळेच पाहता येणे शक्य झाले आहे.

१४ आर्किटेक्ट महाविद्यालयातील ४००० विद्दार्थी जोडल्या गेले!


रोहण काळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या या महाराष्ट्र बारव मोहिमेत राज्यातील १४ आर्किटेक्ट महाविद्यालयातील सुमारे ४,००० तरुण जोडल्या गेले आहेत. राज्यातील विविध गावांत असलेल्या बारवांचे संशोधन करुन त्यांचे मॅपिंग करणे, त्यांच्या डिझाईन चा, भौगोलिक, नैसर्गिक परिस्थितींचा अभ्यास करून जुन्या स्ट्रक्चरला केसालाही आघात न पोहोचु देता या बारावांना पुर्नजिवीत करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्याचे काम या “महाराष्ट्र बारव मोहीम” समितीने शासनाची कसलाही मदत न घेता सुरु केलेले आहे.
या महाराष्ट्र बारव मोहीम समितीतील मुंबई येथील आय.ई.एस. आर्किटेक्ट महाविद्यालयातील प्रा. संकेत म्हात्रे व प्रा. विनीत मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्दार्थ्यांनी नुकतीच संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील बारवेचे सर्वेक्षण पुर्ण केले होते. सर्व मोजमापे काटेकोरपणे घेतली होती. महाराष्ट्र बारव मोहिमेचे शेकडो कार्यकर्ते हे काम राज्यातील विविध गावांत जावून अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहेत.

बारव सर्वेक्षणात अंबाजोगाईचा मोठा सहभाग!

रोहण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या "महाराष्ट्र बारव मोहीम समिती" मध्ये अंबाजोगाई शहरातील तरुण आर्किटेक्ट आकाश कराड हा गेली अनेक वर्षांपासून जोडला गेला आहे. या संघटनेत आकाश कराड यांचे काम मोठे आहे. या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील जवळपास २०,००० बारव असून यापैकी अनेक बारवांचे अभ्यासपुर्ण केलेले डिटेल्स आकाश कराड यांचेकडे उपलब्ध आहेत. यामध्ये बारवांचे छायाचित्रे, तयार करण्यात आलेले नकाशे, त्यांचे केलेले टेक्निकल मॅपिंग, वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून त्याचा केलेला अभ्यास, भौगोलिक, नैसर्गिक परिस्थितीचे विश्लेषण हे सर्व त्यांच्या कडे आहे. यामुळे या महाराष्ट्र बारव मोहीम समितीत अंबाजोगाईचा मोठा वाटा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १०६ तर अंबाजोगाईं १२ बारव!

महाराष्ट्र बारव मोहीम समिती कडे राज्यातील सर्व जिल्ह्यातील बारवांचा तौलनिक अभ्यास केलेला डाटा उपलब्ध आहे. या उपलब्ध डाट्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक बारव (१०६) या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. अंबाजोगाई शहरात १२ बारव आहेत. अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक धार्मिक महत्त्व आहे. आणि या सर्व बारावांशी ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ जोडल्या गेले आहेत. आकाश कराड यांनी स्वतः अंबाजोगाई शहरातील १२ बारावांची सर्व माहिती कलेक्ट केली आहे. यामध्ये टेक्निकल मॅपिंग सह इतर सर्व अभ्यासपूर्ण गोष्टींचा समावेश आहे.

महाराष्ट्र बारव मोहीम समिती चे काम एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने सुरु असतानाच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने “बारव संवर्धन समिती” जाहीर केली. या समितीत रोहण काळे यांच्या व्यतिरिक्त एकही सदस्य या समितीत नाही. महाराष्ट्र शासनाच्या बारव संवर्धन समितीत टेक्निकल सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही, म्हणून या नॉन टेक्निकल लोकांच्या समितीसोबत काम करणे आपल्याला जमणार नाही असे सांगत रोहण काळे यांनी या समितीला कळवून टाकले आहे.

स्वतंत्र काम करणार; रोहण काळे !

महाराष्ट्र शासनाच्या बारव संवर्धन समितीत टेक्निकल सदस्यांची नियुक्ती नसल्यामुळे या समिती सोबत काम करत येणे शक्य नाही असे सांगत रोहण काळे यांनी "महाराष्ट्र बारव मोहीम समिती" मधल्या सदस्यांची यादी शनिवारी जाहीर करतोय. आमचं काम हे शासनाच्या "बारव संवर्धन समिती" पेक्षा वेगळं असणार आहे म्हणून त्यांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. त्यांना शुभेच्छा देऊन आमची समिती आता काही नकारात्मक भुमिका घेणार नाही कारण त्यात बरवांचे नुकसान होईल जे कोणालाच आवडणार नाही. आम्ही चांगले काम करू एवढे आश्वसान मी या समितीच्या वतीने देतो असे रोहण काळे यांनी जाहीर केले आहे.

राज्यात २०,००० बारव; २,००० बारवांचा सर्वे पुर्ण!

महाराष्ट्र राज्यातील एकुण ३५ जिल्ह्यातील ३५० तालुके आणि ४०, ००० गावात जाऊन महाराष्ट्र बारव मोहीम समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील एकूण बारवांची माहिती एकत्रित केली आहे. या समितीने एकत्रित केलेल्या माहितीनुसार राज्यात २०,००० बारव असल्याचे म्हटले आहे. या २०,००० बारवा पैकी सुमारे २,००० बारवांचे टेक्निकल मॅपिंगसह सर्व डिटेल्स या समितीकडे उपलब्ध आहेत. याशिवाय राज्यातील २०,००० बारवांचे ऐतिहासिक संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र बारव मोहीम समिती एक मोठा संघ स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

शासनाने केली मोठी चुक!

पर्यटनाच्या माध्यमाकडे वाळलेल्या तरुणांना एकत्र करुन रोहण काळे यांनी दहा वर्षापुर्वी सुरु केलेल्या "बारव मोहीम समिती" च्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या " बारव संवर्धन समिती" मुळे महाराष्ट्र बारव मोहीम समितीने सुरु केलेले काम थांबेल की काय असे वाटत असतांनाच शासनाच्या कोणत्याही भानगडीत न अडकता आपल्या वैयक्तिक पातळीवर पुन्हा नव्या उत्साहाने रोहण काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची "महाराष्ट्र बारव मोहीम समिती" ही काम करणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे अनेकांनी निःश्वास सोडला आहे. रोहण काळे आणि त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker