भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश!


युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड च्या अहवालात समोर आली माहिती!
भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. भारतात आता चीनपेक्षा सुमारे ३० लाख जास्त लोक आहेत. या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४२ कोटी -८६ लाख आहे. दुसरीकडे चीनची लोकसंख्या केवळ १४२ कोटी ५७ लाख आहे.
भारतात लोकसंख्या वाढीचा दर १.५६ टक्के
वर्षाच्या सुरुवातीलाच तज्ज्ञांनी २०२३ मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. UNFPA च्या नव्या आकडेवारीनेही याची पुष्टी केलीआहे.
UN च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या एका वर्षात १.५६ टक्क्यांनी वाढली.
चीनच्या लोकसंख्येत सहा वर्षांपासून होतेय घट!
अहवालातील नवीन आकडेवारी ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ श्रेणीत देण्यात आली आहे. गछ १९५० पासून जगातील लोकसंख्येची आकडेवारी जाहीर करत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, गेल्या ६ दशकांत प्रथमच चीनच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे. चीनमधला जन्मदर ही कमी झाला असून तो यंदा मायनसमध्ये नोंदवला गेला आहे.


चीनमध्ये सरासरी आयुर्मान भारतापेक्षा चांगले!
चीनमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा चांगले आहे. येथे पुरुषांचे सरासरी वय ७६ वर्षे आणि महिलांचे सरासरी वय ८२ वर्षे आहे. तर भारतात पुरुषांचे सरासरी वय ७४ वर्षे आणि महिलांचे सरासरी वय फक्त ७१ वर्षे आहे. णछत्रझ- भारताच्या प्रतिनिधीने सांगितले की, आता जगाची लोकसंख्या ८ अब्जांवर पोहोचली आहे. भारताच्या १.४ अब्ज लोकांकडे आम्ही १.४ अब्ज संधी म्हणून पाहणार आहोत. ते म्हणाले की, भारत हा एक शक्तिशाली देश
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत भारत सातत्याने पुढे जात आहे. तांत्रिक बाबींमध्ये आम्ही रोज नवनवीन विक्रम करत आहोत.
भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक!
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारतातील २५% लोकांचे वय १४ वर्षांपर्यंत आहे. १०-१९ वयोगटातील १८% लोक आहेत. १०-२४ वयोगटातील लोकांची संख्या २६% आहे, त्यानंतर १५-६४ वयोगटातील सुमारे ६८% लोक आहेत. म्हणजेच भारतात तरुणांची सर्वाधिक संख्या आहे, पण चीनमध्ये तसे नाही. त्यातवृद्धांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमध्ये २० कोटी लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.


आकडेवारी जाहीर केल्यानंतर, UNFPA च्या मीडिया सल्लागार अॅना जेफरीस म्हणाले की, भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येच्या पुढे कधी गेली हे स्पष्ट नाही. दोन्ही देशांची आकडेवारी जाहीर करण्याच्या वेळेत खूप फरक आहे, त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. आपण सांगू शकतो की चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी सर्वोच्च पातळीवर होती, त्यानंतर ती ८.५ लाखांनी कमी झाली. याउलट भारतातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे.