Uncategorized

जयवंती नदीची परीक्रमणा करुन पात्र निश्चितीनंतर दोन्ही बाजूला घनवृक्ष लागवड करा; सुदर्शन रापतवार

जयवंती नदीची परिक्रमा करुन पात्र निश्चितीसाठी शासकीय यंत्रणेकडे आग्रह धरा

अंबाजोगाई शहरातुन वाहणाऱ्या जयवंती नदीचे पात्र निश्चित करण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना सोबत घेऊन परिक्रमणा करण्यात येवून नदीपात्राच्या दोन्ही काठावर घनवृक्ष लागवड करण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी केली आहे.
अंबाजोगाई शहरातुन वाहणाऱ्या जयवंती नदीच्या संवर्धनासाठी स्थानिक डिजीटल मेडियाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत शहरातील मान्यवरांचे या संदर्भात म्हणणे ऐकून घेतले जात आहे आणि त्यांच्या म्हणण्याला प्रसिद्धीही देण्यात येत आहे.

अतिक्रमण आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार शासकीय यंत्रणेला

या संदर्भात डिजीटल मेडियासमोर बोलतांना ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी जयवंती नदी संदर्भात आपली रोख ठोक भुमिका मांडली. जयवंती नदी ही नदी आहे का नाला आहे, जयवंती नदीच्या पात्रात अतिक्रमणे झाली आहेत की नाही, जयवंती नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलला की नाही, जयवंती नदीच्या पात्रात करण्यात येणारे बांधकाम कायदेशीर आहे की नाही हे सर्व ठरवण्याचा अधिकार शासनाच्या संबंधित विविध विभागाच्या प्रमुखांना आहे यासंदर्भातील निर्णय ते घेतील. असे सांगत त्यांनी वरील प्रश्नांना उत्तरे देण्याची टाळली.

तरच सर्व प्रश्नांची निश्चित उत्तरे मिळतील…!

जयवंती नदीच्या संवर्धनासाठी किंवा वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी शहरातील प्रमुख नागरीक, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी, महसुल विभागाचे तलाठी, मंडळनिरीक्षक, नायब तहसीलदार, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर परीषदेचे कनिष्ठ अभियंता, नगर रचनाकार, मुख्याधिकारी, विविध सामाजिक -राजकीय संघटनांचे प्रतिनिधी यांनी जयवंती नदीचा उगम असलेल्या भिमकुंडापासुन भुमी अभिलेख विभागाकडे उपलब्ध असलेल्या नदीमार्गाची परीक्रमणा केली तर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व याबाबतची पुढील निश्चित दिशा ठरवण्यास मदत होईल असे मत ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी व्यक्त केली.

नदी पात्र निश्चिती नंतर दोन्ही बाजूंनी घनवृक्ष लागवड करण्यात यावी

या परीक्रमणा यात्रेनंतर जयवंती नदीचे पात्र निश्चित करण्यात आले तर या निश्चित करण्यात आलेल्या नदीपात्राच्या डाव्या आणि उजव्या बाजूंनी मोठ्या प्रमाणावर घनवृक्ष लागवड करण्यात यावी व या घनवृक्ष लागवडीच्या संवर्धन आणि संगोपनाची जबाबदारी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांचेवर निश्चित करण्यात यावी असे मत सुदर्शन रापतवार यांनी व्यक्त केले.

नागरीकांच्या बैठकीला प्रतिसाद

जयवंती नदीच्या संवर्धनासाठी २६ मार्च रोजी शासकीय विश्रामगृहावर एका व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड, महादेव आदमाने, संतोष शिनगारे, सुनील वाघाळकर, गोविंद मस्के, शैलेष कांबळे, सुनील जगताप, राजेश वाहुळे, असिफोद्दीन खतीब, अंकुश ढोबळे, गजानन वांगीकर, पद्माकर सेलमुहकर डिजिटल मेडियाचे सर्व प्रतिनिधी यांच्या सह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत वरील सर्व मान्यवरांनी जयवंती नदी संवर्धना संदर्भात आपली स्पष्ट मते मांडली. या बैठकीचे संचालन सुनील जगताप तर आभार संतोष शिनगारे यांनी मानले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker