अन्नत्याग आंदोलनात लिंबागणेश ग्रामपंचायत घेणार सहभाग


१९ मार्च २०२३ वार रविवार रोजी देशभरातील शेतक-यांनी केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश ग्रामपंचायत सहभागी होणार असून ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलनात लिंबागणेश ग्रामपंचायत समोर करण्यात येणार असल्याचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत दिले आहे.
शेतकरी आत्महत्यांप्रश्नी जिल्हा प्रशासन असंवेदनशील


देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांप्रति सहानुभुती व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्यांसाठी १) कमाल शेत जमीन धारणा कायदा २) भुमी अधिग्रहण कायदा ३)आवश्यक वस्तु कायदा हे जाचक ठरलेले ३ कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात गेल्या ३ वर्षापासून आम्ही १९ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सामुहिक एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.


जिल्ह्यात वर्षभरात 270शेतक-याच्या आत्महत्या
बीड जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरात २७० शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाधिक आत्महत्या ऑक्टोबर महिन्यात ३५ नोंदवल्या गेल्या, जुनमध्ये ३० ,मार्च मध्ये २९ ,फेब्रुवारी मध्ये २४ ,ऑगस्ट मध्ये २३ तर मे मध्ये २२ आत्महत्या झाल्या, जानेवारी, सप्टेंबर, नोव्हेंबर मध्ये प्रत्येकी १८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. जुलै मध्ये १७ व एप्रिल मध्ये १५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. तर चालु वर्षांत १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या ५९ दिवसात ४७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. एकूण २७० पैकी २११ शेतकरी आतमहत्या प्रकरणे सरकारी मदतीस पात्र ठरली असुन ७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. ६ प्रकरणात अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त होणे बाकी असून सन २०२३ मधील ३३ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.एकंदरीत शासन व जिल्हाप्रशासन शेतकरी आतमहत्याप्रती असंवेदनशील दिसून येत आहे. असा आरोप डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.