महाराष्ट्र

अंबाजोगाईत अन्नत्याग आंदोलनाची तयारी सुरु!

यावर्षी पासुन सुरु करणार व्याख्यानमाला व सामुहिक समारोप

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी १९ मार्च रोजी होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाची तयारी अंबाजोगाईत सुरु झाली असून या निमित्ताने यावर्षी पासुन व्याख्यानमाला व सामुहिक समारोपाचे दोन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी दिली.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सुदर्शन रापतवार यांनी पुढे असे म्हटले आहे की, अन्नत्याग आंदोलनाचं हे सातवं वर्ष असून आपण सर्वच जण गेल्या सहा वर्षांपासून १९ मार्चच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत आलो आहात, याची मला जाणीव आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आपण हे अन्नत्याग आंदोलन करतो, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही!

व्याख्यानमाला व सामुहिक समारोप


यावर्षीची अन्नत्याग आंदोलनाची तारीख आता जवळ येवू लागली आहे. यावर्षी अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये दोन मोठे बदल करण्याचा निर्णय स्थानिक संयोजक म्हणून मी घेतला आहे.
पहिला बदल आहे तो या वर्षापासून प्रतिवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रति सहवेदना व्यक्त करणारी व्याख्यानमाला सुरु करण्याचा आणि दुसरा निर्णय आहे अन्नत्याग आंदोलनाचा समारोप एकत्रित करण्यासाठी छोटेखानी सामुहिक अल्पोपहार आणि चहापाणाची व्यवस्था करण्याचा!
यावर्षी अन्नत्याग आंदोलनानिमित्त सुरु करण्यात येणारे हे दोनही उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर असल्यामुळे ते अत्यंत साधेपणाने करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणारा एक मान्यवर वक्ता बोलावण्याचा आणि व्याख्यान झाले की लगेच समारोपाच्या कार्यक्रमात छोटेखानी अल्पोपहार आणि चहापाण करण्याचा मानस आहे. हे दोन्ही उपक्रम अत्यंत साधेपणाने आणि तितक्याच नेटकेपणाने घेण्याचा विचार आहे.
आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी ज्या लोकांना अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला आहे अशा साधारणपणे २०० लोकांना खुर्चीवर बसून व्याख्यान स्पष्टपणे ऐकता यावे आणि त्यानंतर लगेच छोटेखानी अल्पोपहार व चहापाणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होणा-या किसान पुत्रांनी व कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या किसान पुत्रांनी मात्र यांची पुर्व कल्पना संयोजकांना ९४२२२ ४००१७ या वॉटसऍप मोबाईल क्रमांकावर लेखी स्वरूपात मेसेज करुन द्यावयाची आहे.

सक्रिय सहभाग घ्या!


अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने घेण्यात येणारे हे दोन्ही उपक्रम लोकसहभागातून घेण्यात येणार आहेत. यासाठी नाष्टा, चहापान, ध्वनी व्यवस्था आणि आसन व्यवस्थेसाठी स्वतंत्र प्रायोजक मिळवून हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचा मानस आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी सुरु करण्यात येणारा अन्नत्याग आंदोलन हा उपक्रम आपल्या सर्वांचा, गावा-गावाचा व्हावा हा प्रयत्न यावर्षी जाणीवपुर्वक करण्यात येणार आहे. आपण सर्वजण गेल्या सहा वर्षांपासून या उपक्रमात सहभागी होत आला आहात. हा उपक्रम आता प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करु यात व अन्नत्याग आंदोलनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker