राष्ट्रीय

कोरोना नंतर तरुणांमध्ये वाढला -हदयविकाराचा धोका!


करोना संसर्गानंतर ज्या व्याधी वा शारीरिक त्रास निर्माण झाले आहेत त्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे. तरुणांमधील हृदयविकार आणि अस्थिव्यंगाच्या तक्रारींमागे नेमकी कोणती कारणे आहेत याचा अभ्यास करण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. ‘मुंबई फाइट्स बॅक’ या पुस्तकाच्या निमित्ताने करोना संसर्गाशी दोन हात करताना पालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेने कोणत्या स्वरूपाचे नियोजन केले याचा यात संपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा सुविधांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनेदेखील हे पुस्तक दिशादर्शक आहे, असा विश्वास महाराष्ट्र राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी गुरुवारी केले. करोनाचा धोका संपला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले नसल्यामुळे जागृत राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

कोवीड टास्क फोर्सच्या तज्ञांची माहिती


याप्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि ‘कोविड टास्क फोर्स’ चे सदस्य डॉ. राहुल पंडित; ‘मुंबई फाइट्स बॅक’ या पुस्तकाचे लेखक महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि पुस्तकाच्या सहलेखिका पत्रकार सुमित्रा देबरॉय उपस्थित होत्या. महानगरपालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईसारख्या लोकसंख्या अधिक असलेल्या व अनेक भागात दाटीवाटीची वस्ती असलेल्या मुंबईमध्ये करोनाशी मुकाबला करणे, हे अत्यंत मोठे आव्हान होते. मात्र महानगरपालिकेने आरोग्य व वैद्यकीय यंत्रणेने दिवसरात्र एक करून हे आव्हान पेलले. तसेच खासगी क्षेत्रातील वैद्यकीय यंत्रणेलाही सोबत घेतले. त्यामुळे मुंबईतील करोनाविरोधातील हा लढा यशस्वी होऊ शकल्याचा विश्वास डॉ. पंडित यांनी यावेळी व्यक्त केला. ज्यांना कोविड होऊन गेला आहे. त्या रुग्णांमध्ये करोनापश्चात गुंतागुंतीचा सविस्तर अभ्यास होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

काकाणी यांनी यावेळी वैद्यकीय सेवा सुविधांच्या अंमलबजावणी करताना आलेल्या प्रशासकीय व्यवस्थापनाची माहिती उपस्थितांना दिली. प्राथमिकस्तरीय, द्वितीयस्तरीय आणि तृतीयस्तरीय वैद्यकीय सेवासुविधांबाबत सातत्याने अधिकाधिक समन्वय साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अभ्यासकांसाठी उपयुक्त

“मुंबई बाइक्स बॅक” या पुस्तकाचे अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रकाशन

या रोगाविरोधातील लढाईची साध्या-सोप्या व ओघवत्या भाषेत घेण्यात आलेली नोंद ‘मुंबई फाइट्स बॅक’ पुस्तकात आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आल्याची माहिती काकाणी यांनी दिली. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन या पुस्तकाच्या सहलेखिका व ज्येष्ठ पत्रकार सुमित्रा देबरॉय यांनी केले. कोविड विरोधातील मुंबईचा लढा देत असताना पालिकेला आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची केवळ प्रशासकीय- वैद्यकीय नव्हे तर विविध अंगांची नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे, असे पत्रकार सुमित्रा यांनी चर्चासत्राच्या अखेरीस नमूद केले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker