मराठवाड्यातील ५६साखर कारखान्यात ७३ लाख ४७१ टन ऊसाचे गाळप !


मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आतापर्यंत ५६ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला (Sugarcane Crushing) सुरुवात केली आहे. या कारखान्यांनी १९ डिसेंबर अखेरपर्यंत ७३ लाख ४७१ टन उसाचे गाळप करून ६३ लाख ९१ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप वेगाने सुरू झाले आहे. गाळपाला सुरुवात करणाऱ्या ५६ कारखान्यांमध्ये २३ सहकारी तर ३३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. २३ सहकारी साखर कारखान्यांमध्ये उस्मानाबादमधील चार, औरंगाबादमधील दोन, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी तीन, बीड व लातूरमधील प्रत्येकी पाच व नांदेडमधील एका सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. तर ३३ खासगी साखर कारखान्यांत उस्मानाबादमधील आठ, औरंगाबादमधील तीन, जालन्यातील एक, बीडमधील दोन, परभणीतील सात, हिंगोलीतील दोन, नांदेड व लातूरमधील प्रत्येकी पाच साखर कारखान्यांचा समावेश आहे.
मराठवाड्यात तीन कोटी २२ लाख टन उसाचे गाळप
आजवरच्या ऊस गाळपात उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी ८.०२ टक्क्यांचा साखर उतारा राखला आहे. औरंगाबादमधील कारखान्यांनी ९.४२ टक्के, जालन्यातील साखर कारखान्यांनी ९.०५ टक्के, बीडमधील साखर कारखान्यांनी ७.०७ टक्के, परभणीतील साखर कारखान्यांनी ८.८६ टक्के, हिंगोलीतील कारखान्यांनी ९.३० टक्के, नांदेडमधील कारखान्यांनी ९.११ टक्के तर लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ९.२४ टक्के साखर उतारा राखला आहे.
▪️जिल्हानिहाय ऊस गाळप आणि साखर उत्पादन स्थिती
उस्मानाबाद जिल्हा:
कारखाने १२
ऊस गाळप २०१८४९१ टन
साखर उत्पादन १७४०३७० क्विंटल
औरंगाबाद जिल्हा:
कारखाने ५
ऊस गाळप ६२५२१६ टन
साखर उत्पादन ५८९००५ क्विंटल
जालना जिल्हा:
कारखाने ४
ऊस गाळप ६८२५६३ टन
साखर उत्पादन ६१७६७० क्विंटल
बीड जिल्हा :
कारखाने ७
ऊस गाळप ९२०११० टन
साखर उत्पादन ६५०२०५ क्विंटल
परभणी जिल्हा :
कारखाने ७
ऊस गाळप ७७८३२२ टन
साखर उत्पादन ६६९५२५ क्विंटल
हिंगोली जिल्हा :
किरखाने ५
ऊस गाळप ५३५८९८ टन
साखर उत्पादन ५२५०८० क्विंटल
नांदेड जिल्हा :
कारखाने ६
ऊस गाळप ६३५९५६
साखर उत्पादन ५७९२७० क्विंटल
लातूर जिल्हा :
कारखाने १०
ऊस गाळप ११०४९१५ टन
साखर उत्पादन १०२०४७० क्विंटल