ठळक बातम्या

प्रा.दासू वैद्य यांची कविता सामान्य माणसाच्या जगण्याचा वास्तव सांगणारी

प्रख्यात साहित्यिक बालाजी सुतार यांचे मत


दासु वैद्य यांची कविता जगण्याचं वास्तव सांगणारी, समाजाचं भाग जागविणारी कविता आहे असे मत प्रख्यात साहित्यिक बालाजी सुतार यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या “संमेलन अध्यक्षा़चे साहित्य” या परीसंवादात अध्यक्ष म्हणून बालाजी सुतार बोलत होते. या परीसंवादात डॉ. दिपक गरुड आणि गोपाळ तिवारी यांनी आपला सहभाग नोंदवला. आपल्या विस्तारीत मनोगतात बोलताना बालाजी सुतार पुढे म्हणाले की, दासु वैद्य यांची कविता ही कोणत्याही चौकटीत न बसू शकणारी स्वतंत्र ,सर्वांना सामावून घेणारी, स्विकारशील, सामाजिक, राजकीय कविता आहे. त्यांची कविता ही साध्या माणसांची कविता बहुसंख्य माणसांच्या जगण्याबध्दलचे वास्तव सांगणारी,जगण्यातील समरसता सांगणारी, तत्वज्ञान, भाषा बद्दल बोलत यांच्या काहीही भाष्य न करणारी आणि तेवढीच तटस्थ आहे. त्यांच्या कवितेत ऊब असते, ओलावा असतो. तर कुठल्याही वादाला स्थान नसणारी, अदखलपात्र माणसांवर लिहिलेल्या दासु वैद्य यांच्या कवितेत दिसतात.


दासु वैद्य यांनी लिहिलेल्या तुर्तास आणि तत्पुर्वी या दोन कविता संग्रहाची तुलना करतांना “तुर्तास” कविता संग्रहातील कविता ही उत्कटता स्वरुपाची आणि “तत्पुर्वी” संग्रहातील कविता ही घराच्या बाहेर आलेली कविता दिसते. त्यांच्या कवितेत माजघर, अंगण, आणि संबंध भोवतालच जे अंग आहे त्याच्या बाजारीकरणाचे चित्रिकरण व्यतीत करणारी कविता आहे. जगण्याची सम साधणारी कविता आहे. दृश्यात्मक शैली हा अंग त्यांच्या कवितेत आहे. सांस्कृतिक घटनांचा संदर्भ, निजामाचा प्रभाव असणारी, खुप सा-या माणसांचा सहभाग असणारी, आई, वडील आणि मुलगी या तीन विषयांवरच्या कविता. “आई गेल्यानंतर चे वडील” ही कविता अत्यंत मोलाची वाटते. तर आई संदर्भात लिहिलेली कविता ही आपले जैविक नातं सांगणारी कविता आहे.


९० टक्के सामान्य लोकांच्या जगण्यावर तर ५ टक्के लोकांच्या जगण्याचं वास्तव सांगणारी कविता आहे असे बालाजी सुतार यांनी सांगितले. या परिसंवादात डॉ. दिपक गरुड यांनी प्रा. दासू वैद्य यांचे “दृकश्राव्य साहित्य” या विषयावर गोपाळ तिवारी यांनी प्रा. दासू वैद्य यांची ” गद्द लेखन” या विषयावर आपली मनोगते नोंदवली. या परीसंवादाचे संयोजन प्रा.डॉ. देविदास खोडेवाड यांनी केले तर आभार संतोष मोहीते यांनी मानले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker