उज्वल भारत उज्वल भविष्य उर्जा मंत्रालयाच्या वतीने अंबाजोगाईत कार्यक्रमाचे आयोजन
खा.रजनीताई पाटील,खा.प्रितम मुंडे,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती


अंबाजोगाई/ भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत उज्वल भारत उज्वल भविष्य या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज २७ जुलै रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमास खा. डॉ. प्रितम मुंडे, खा. सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह जिल्ह्यातील सर्व आमदार, विधान परीक्षेचे सदस्य सतीष चव्हाण, विक्रम काळे, जिल्हाधिकारी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या वतीने उज्वल भारत उज्वल भविष्य या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज २७ जुलै रोजी नगर परिषदेच्या मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. डॉ. प्रितम मुंडे (लोकसभा सदस्य) या राहणार असून प्रमुख उपस्थितीत खा. रजनीताई पाटील (राज्यसभा सदस्य) आ. धनंजय मुंडे (विधानसभा सदस्य, परळी वै.) आ. नमिताताई मुंदडा (विधानसभा सदस्य, केज) आ. प्रकाश सोळंके (विधानसभा सदस्य, माजलगाव), आ. ऍड. लक्ष्मण पवार (विधानसभा सदस्य, गेवराई), आ. बाळासाहेब आजबे (विधानसभा सदस्य, आष्टी), आ. संदीप क्षीरसागर (विधानसभा सदस्य, बीड), आ. सुरेश धस (विधान परिषद सदस्य), आ. सतिश चव्हाण (विधान परिषद सदस्य), आ. विक्रम काळे (विधान परिषद सदस्य) हे तर विशेष निमंत्रीत म्हणून राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) (जिल्हाधिकारी, बीड), अजित पवार (भा.प्र.से.) (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड), नंदकुमार ठाकूर (भा.पो.से.) (पोलीस अधिक्षक, बीड) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थिती रहावे असे आवाहन सुंदर शा. लटपटे, (मुख्य अभियंता, महावितरण, लातूर अधीक्षक अभियंता (प्रभारी) मंडळ कार्यालय) यांनी केले आहे.