महाराष्ट्र

९ ऑगस्ट क्रांतीदिन…. स्वातंत्र्याच्या क्रांतीची बीजं रोवणाऱ्या दिवस !

 ९ आँगस्ट. स्वातंत्र्याच्या क्रांतिची बीज रोवणा-या या दिवशी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शहीद झालेल्या व प्राणपणाने लढलेल्या थोर स्वतंत्र सेनानींना विनम्र अभिवादन!

तीस-पस्तीस वर्षापुर्वीचा काळ असेल! पत्रकारीतेच्या नादाला तसा मी नुकताच लागलो होतो. त्यात “लोकमत” सारख्या मोठ्या वर्तमान पत्राची जबाबदारी माझ्या कडे होती. तेंव्हा हळूहळू सर्वच गोष्टी शिकत होतो. अंबाजोगाई शहराला तसा क्रांतिकारक इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात येथील अनेक स्वातंत्र्य सैनिक मोठ्या हिरहिरिरीने सहभागी झाले होते. त्यामुळे ९ आँगस्ट, क्रांतिदिन आणि १५ आँगस्ट स्वातंत्र्य दिन यासारखे राष्ट्रीय उत्सव या लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांसोबत साजरे करतांना शरीरात एक वेगळेच स्फुरण चढयाचे!

९ आँगस्ट हा क्रांतिदिन त्याकाळी स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीचे केंद्र असलेल्या शहरातील शाही बुरुजाच्या पायथ्याशी नगर परीषदेच्या वतीने साजरा केला जायचा. या कार्यक्रमाला या लढ्यात सहभागी झालेल्या सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांना बोलावून त्यांचा गौरव ही केला जायचा!माझे मित्र कै. शंकर डाके नगराध्यक्ष असतांना त्यांनी क्रांतिदिना निमित्त आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमाह मला प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते.

या वेळी कै. धोंडीराम पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण ठेवून इतर स्वातंत्रसैनिकांचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी शहरातील आणि तालुक्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांना प्रत्यक्ष पहाण्याची, भेटण्याची व त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळालं होतं. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील श्रीनिवास खोत, ए. मा. कुलकर्णी, बेथुजी गुरुजी, साधु गुरुजी, भिकाभाऊ राखे गुरुजी, पंढरीनाथ यादव, चनई येथील नरहरराव कदम यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिक उपस्थित असल्याचे माझ्या अजूनही स्मरणात आहे. आज नवू आँगस्ट, क्रांतिदिन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा आजच्या क्रांतिदिन निमित्ताने या लढ्यात सहभाग घेतलेल्यांना विनम्र अभिवादन…!

भारताच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. 

भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस अनेक घटनांनी लक्षात ठेवला जातो. त्यापैकी 1942 चा ऑगस्ट क्रांती दिवस आणि भारत छोडो आंदोलनाच्या निर्णयाचा दुसरा दिवस सर्वात प्रमुख आहे. या दिवशी भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि महात्मा गांधींनी करा किंवा मरोचा नारा दिला, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 1925 मध्ये या दिवशी क्रांतिकारकांनी कोकोरी कारस्थान करून ब्रिटिश सत्तेला हादरा दिला होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चळवळी झाल्या. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपले शेवटचे स्वातंत्र्य युद्ध भारत छोडो चले जावं आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती.

घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी

1942 मध्ये, 8 ऑगस्ट रोजी मुंबई अधिवेशनात काँग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू करण्याचा ठराव संमत केला. दुसऱ्या दिवशी किंवा 9 ऑगस्टला देशभरातील लोक त्यात सामील झाले आणि आंदोलनाला लगेचच वेग आला. या दिवशी महात्मा गांधींनी करा किंवा मरो ही प्रसिद्ध घोषणा दिली. त्याच दिवशी महात्मा गांधींनाही अटक करण्यात आली होती.

अतुलनीय चळवळ

या चळवळीने संपूर्ण देशातील जनतेला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, ही चळवळ 1944 पर्यंत दडपण्यात आली. मात्र या आंदोलनात देशवासियांनी एकता, कार्यकर्तृत्व, धैर्य, संयम आणि सहिष्णुतेचा अप्रतिम आदर्श घालून दिला होता. असे म्हटले जाते की ही चळवळ होती ज्यानंतर इंग्रजांनी भारत सोडण्याचा खरोखर गंभीरपणे विचार केला, तर या निर्णयामागे अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही हात होता.

९ ऑगस्टचे महत्त्व

या चळवळीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त राम मनोहर लोहिया यांनी 9 ऑगस्टचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की 9 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतीयांसाठी एक महान घटना आहे आणि नेहमीच राहील. 9 ऑगस्ट हा देशातील जनतेच्या इच्छेची अभिव्यक्ती होता ज्यामध्ये त्यांनी ठरवले होते की आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे आणि आम्ही स्वातंत्र्यासाठी जगू.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker