अंबाजोगाई शहरातील मोबाईल व्यावसायिक शरद जयस्वाल यांनी आपल्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दिपावलीच्या पहिल्या दिवशी शहरातील दोन व्यक्तींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शरद जयस्वाल हे मुळ मुंबई येथील रहिवासी असून गेली अनेक वर्षांपासून ते अंबाजोगाईत स्थायीक झाले होते. शहरातील पोलीस स्टेशन समोरील नगर परिषदेच्या गाळ्यात मोरया मोबाईल शॉपी या नावाने त्यांचे मोबाईल विक्री व दुरुस्ती चे दुकान होते. या व्यवसाया सोबतच ते अधिकृत परवाना काढुन ते खाजगी फायनान्स व बीसी चालवत असत. आज दुपारी आपल्या दुकानात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून त्यांचे पार्थिव स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मयत शरद जयस्वाल यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी व इतर परीवार आहे. सदरील आत्महत्येचा तपास पोलीस करीत आहेत.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.