महाराष्ट्र

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरुच!

प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (८२) यांची प्रकृती रात्री उशिरा आणखी खालावली. दरम्यान विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांचे अजूनही शर्थीचे प्रयत्न सुरुच असल्याची माहिती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल घ्या डॉक्टरांनी आज सकाळी दिली.

या संदर्भात विक्रम गोखले यांच्या मुलीने दिलेल्‍या माहितीनुसार, ते अत्यवस्थ असून रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सध्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आज (गुरुवारी) अधिकृत माहिती दिली जाईल, असे त्यांच्या मुलीने सांगितले. विक्रम गोखले यांच्या आरोग्‍यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, असे ही त्‍या म्हणाल्‍या.
खरे तर विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी बुधवारी रात्री उशिरा आली होती. यानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव सुरू ही झाला होता.


दरम्यान विक्रम गोखले यांच निधन ही अफवा असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा खुलासा त्यांच्या पत्नीने केला आहे. “काल सायंकाळी ते कोमामध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, ते प्रतिसाद देत आहेत की नाही यासंदर्भात डॉक्टर आज (गुरुवारी) सकाळी निर्णय घेतील,” असं विक्रम गोखेलेंच्या पत्नी ऋषाली यांनी सांगितलं आहे.
दरम्यान सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनी आणि सामाजिक राजकीय किर्यकर्त्यांनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. याचसंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालवल्याचे वृत्तही समोर आले. बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालवत गेली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती कार्यालयाच अधिकृत ट्विटर हँडलवरुन विक्रम गोखलेंच्या निधनासंदर्भातील ट्वीट मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी करण्यात आलं होतं. हे ट्विटनंंतर डिलीट करण्यात आलं. मात्र त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले असल्याचे समजते.

विक्रम गोखले यांचा अल्प परिचय

विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. ते अत्यंत चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला आहे. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारली. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अग्निहोत्र’ मालीकेत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका चांगली गाजली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका घर करुन आहे. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. विक्रम गोखले यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना ‘अनुमती’ या चित्रपटातील भुमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं.

अनेक गौरव पुरस्काराने सन्मानित!


विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भुमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे या कलाकारांबरोबर भुमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या शुटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शुटिंगला सुरुवात केली होती. विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासाने त्रस्त होते. यामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करायचे.
विक्रम गोखले यांना २०१३ मध्ये ‘अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) मिळाला होता. त्याबरोबरच त्यांना २०१५ मध्ये ‘विष्णूदास भावे जीवनगौरव’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच २०१७ मध्ये ‘हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार’, २०१८ मध्ये ‘पुलोत्सव सन्मानाने’ गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना ‘चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव’ पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते.

राजकीय सामाजिक विषयांवर सतत भाष्य


विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भुमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखले यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

हिंदी चित्रपटात ही उमटवला ठसा!


मराठी रंगभूमी, चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखले यांनी आपल्या चतुरस्र अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विक्रम गोखले यांनी 1990 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत अभिनीत अग्निपथ, तसेच सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 1999 मधील “हम दिल दे चुके सनम” चित्रपटासह अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker