मांजरा धरण मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर; शेतकऱ्यांत चिंता!


अंबाजोगाई शहरासह बीड-लातुर-उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी साठा आता मृत साठ्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज २१ आँगस्ट रोजी मांजरा धरण मृत साठ्यावर उभा असल्यामुळे या तीनही जिल्ह्यातील नागरिकांची पाचावर धारण बसली आहे.
डोंगराळ भागातील पीके गेली!
बीड जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यात यावर्षी जून महिन्यापासूनच पावसाने दडी मारली आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य पावूस झाल्यानंतर कशाबशा पेरण्या झाल्या. पेरणीनंतर पीके उगवण्यासाठी आवश्यक असलेला पावूस अधूनमधून पडत गेला असल्यामुळे डोंगराळ भागातील पीके करपून गेली आहेत तर काळ्या सपाट शेत जमिनीतील पीके कशी तरी ती धरुन उभी राहिली आहेत.


धरण-तलाव, विहिरींची पाणी पातळी गेली खाली
यावर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीयोग्य पावूस झाल्यानंतर मोठ्या पावसाने दडी मारली ती आज पर्यंत कायम आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात तुरळक पडलेल्या पावसानंतर या विभागात पाव आने दडी मारली ती अजूनही कायमच आहे.
अनेक हवामान शास्त्रज्ञांनी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात गायब झालेला पाऊस १६ ऑगस्ट पासून पुन्हा सुरु होईल असा अंदाज वर्तवला होता. १६ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत मोठा पाऊस पडेल, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल असे भाकित वर्तवले होते. मात्र आज २१ ऑगस्ट उलटून गेला तरी ना पाऊस पडला ना पावसाचा जोर वाढला. उलट पाऊस न पडल्यामुळे धरणातील आणि पाणी साठवण तलावातील पाण्याची पातळी खाली गेली.
उपयुक्त पाणीसाठा फक्त ४४.४२३ दलघमी!
महाराष्ट्र वगळता इतर राज्यात यावर्षी मोठे पाऊस झाल्याने तेथील जनजीवन विस्कळित झाले. मात्र महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जनतेला पावसाची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
मांजरा धरणाच्या कँचमेंट एरियात अध्यापही समाधानकारक पावूस झाला नसल्यामुळे मांजरा धरणात अध्याप समाधानकारक पाणी साठा जमला नाही. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मृत साठ्याच्या आसपास असलेले मांजरा धरण आज सकाळी ६ वाजता (२१ आँगस्ट ) जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहिती नुसार मांजरा धरणात फक्त ४४.४२३ दलघमी पाणी साठा जमला आहे. मांजरा धरणाच्या पाणी साठवण क्षमता ४७. १३० दलघमी असून आज २१आँगस्ट रोजी मांजरा धरणातील उपयुक्त पाणी साठा मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आला असून धरणातील आजचा उपयुक्त पाणी साठा फक्त ४४.४२३ दलघमी आहे.
मांजरा धरणातील उपयुक्त पाणी साठा साठवण क्षमता १७६.९६३ दलघमी एवढी आहे.


मांजरा धरणात २१ आँगस्ट रोजी सकाळी सहा वाजता करण्यात आलेल्या नोंदी प्रमाणे धरणात फक्त ४४.४२३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून संपुर्ण धरण भरण्यासाठी २२४.०९३ दलघमी पाणीसाठा आवश्यक असतो.
फक्त २५ टक्के पाणी साठा शिल्लक!
सध्या नदी क्षेत्रातील पाण्याच्या प्रवाहातुन मांजरा धरणातील पाणी येण्याचा वेग हा ०.००० दलघमी एवढा असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. मांजरा धरणात सध्या फक्त २५.१० टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.