महाराष्ट्र

मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडा

आ. नमिता अक्षय मुंदडा यांची मागणी


धनेगाव, ता. केज, जि. बीड. येथील मांजरा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आ.सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.
या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता मांजरा प्रकल्प लातुर यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, धनेगाव, ता. केज, जि. बीड. येथील मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
सध्या शेतकऱ्यांचा रब्बी पिकांचा हंगाम सुरु असून रब्बी पिकासाठी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून मोठ्याप्रमाणात होत आहे. तरी रब्बी हंगामासाठी धनेगाव, ता. केज, जि. बीड. येथील मांजरा प्रकल्पच्या डाव्या व उजव्या कालव्यातून त्वरित पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker