महात्मा गांधी यांचा देश वाचविण्यासाठी माणूस धर्म वाढवण्याची गरज; हबीब


महात्मा गांधी यांचा देश वाचवण्यासाठी माणूस धर्म वाढवावा असे आवाहन आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी केले. उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर भारतीच्या विभागीय स्नेह मिलन मेळाव्यात ते बोलत होते.
आपल्या विस्तारीत भाषणात ते पुढे म्हणाले की, समाज आणि देशातील वंचित, युवक, महिला, शेतकरी यांच्या समस्या प्राधान्याने दूर करण्यासाठी धडपडणाऱ्यांना, लढणाऱ्यांना ताकद देण्याची आणि सामाजिक सौहार्द जपण्याची भूमिका घेऊन आंतरभारती पुढे जात आहे. देशातील आजची परिस्थिती पाहता, गांधीजींचा हा देश टिकवायचा असेल तर, माणूस धर्म वाढवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
या वेळी उपाध्यक्ष संगीता देशमुख, कोषाध्यक्ष प्राचार्य उमाकांत चनशेट्टी, प्राचार्य दत्ता पाटील, मधुश्री आर्य, मनीषा आर्य, शिवाजीराव मुळे, शिवाजीराव आवटे, संयोजक शिवलिंग मठपती आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
अमर हबीब पुढे म्हणाले की, “आंतरभारतीची चळवळ तळागाळातील माणसांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत. गांधींचा हा देश टिकवायचा असेल तर लहान मोठ्या शहरांमध्ये आंतरभारतीचे संघटन नव्या जोमाने बळकट करावेच लागेल. सद्यस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाला विधायक वळण लावण्याची गरज निर्माण झाली आहे.” असे सांगून सानेगुरुजी यांनी आत्महत्या का केली? याचे समाधान सानेगुरुजींच्या सहवासातील चिमणदादा पाटील (अमळनेर) यांनी स्पष्ट केले. जे स्वप्न स्वातंत्र्यामध्ये महात्मा गांधी यांनी स्वप्न दाखविले. संदेश दिला होता, पण सत्ता हाती आली की ते सारे सगळे विसरु गेले आणि त्यातून सानेगुरुजींची 11 जून 1950 रोजी आत्महत्या झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेगळ्या, पण शेतकऱ्यांसाठी म्हणून झालेली पहिली आत्महत्या ती साने गुरुजींची, असे हबीब म्हणाले. सामजिक गोष्टीना अधिक प्रधान्य दिले जाते पण, आर्थिक गोष्टीना नाही. ही फार मोठी चालाखी आहे. कारण सामाजिक क्षेत्रात काहीही बोलले जरी चालते. वागायची तर गरजच नाही. ही बाब फार गंभीर आहे. सानेगुरुजींच्या, स्मृती दिनाला खरा तो एकचि धर्म, बलसागर भारत होवो ही गीते आठवतात. गातात. आता उठवू सारे रान हे का आठवत नाही असा प्रश्न उपस्थित करून विशेषतः यात समाजवाद्यांची चालाखी दिसून येते, असे अमर हबीब म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांवर चित्रपट काढला त्यात
आंबेडकरांनी शेतीसाठी केलेले मोठे योगदान, ही बाब अजिबात
दाखविले नाही. हे वास्तव कुठपर्यंत स्वीकारात राहायचे. आंतरभारतीची
अधिकाधिक सभासद नोंदणी करण्याचे लक्ष प्रत्येकाने ठेवावे, असे
आवाहन त्यांनी केले. यावेळी सदाविजय आर्य स्मृती ग्रंथ 17 सप्टेंबर
2023 रोजी प्रसिद्ध करण्याबाबत हबीब यांनी माहिती दिली.
या वेळी “महात्मा गांधींची प्रासंगिकता” या विषयावरील राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त जे. आर. कोकंडाकर (नांदेड) यांना प्रथम रोख दहा रुपये, डॉ. सागर शरद कुलकर्णी (अंबाजोगाई), यांना रोख सात हजार रुपये, तर तृतीय जालन्याच्या अंतरा धनश्री रामदास कुलकर्णी यांना रोख तीन हजार रुपयांचे, तसेच सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिवाय धनंजय गुडसूरकर रमेशअण्णा अंबरखाने, व्ही. एस. कुलकर्णी, अनिता जगताप, ऋषीराज आर्य, शिवाजीराव मुळे आदींचा सत्कार करण्यात आला.


आंतरभारती ट्रस्टचा पहिला सदाविजय आर्य पुरस्कार राम पी.माने यांना, तर अंबाजोगाई आंतरभारतीचा कार्यकर्ता पुरस्कार ज्योती शिंदे यांना देण्यात आला. प्रास्ताविक सचिव डी. एस. कोरे यांनी केले. शिवलिंग मठपती यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात कविसंमेलन व विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम रंगला. सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील आंतभारती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️भारत दर्शन यात्रा राजस्थानमध्ये
2023 चा आंतरभारती ट्रस्ट चा वर्धापनदिन 10 मे रोजी अजमेर (राजस्थान) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने 2023 मधील भारत दर्शन यात्रा राजस्थानमध्ये नियोजित आहे. अजमेर, जयपूर, जोधपूर आदी विविध ऐतिहासिक स्थळी भेट देणे येथील संस्कृती जाणून घेणे व सुसंवाद वाढवणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती संयोजक संजयकुमार माचेवार यांनी या वेळी दिली.
▪️10 मई- आंतरभारती दिन इस वर्ष
(2023)
आंतरभारती दिन के अवसर पर आंतरभारती की आम सभा राजस्थान के अजमेर में होगी। देशभर के सभी साथीयोसे अनुरोध है की वह इस सभा में आवश्य उपस्थित रहें।
▪️राजस्थान दर्शन
जो लोग 10 मई को अजमेर पहुंचेंगे उन की राजस्थान दर्शन यात्रा 11 मई से प्रारंभ होगी। यह यात्रा 8 दिन की होगी।
▪️क्या देखेंगे?
अजमेर, पुष्कर, रतनास (राजू जागींड का गाव), जयपूर देशनुक (करनी माता मंदिर), जैसलमेर, सम, स्कुल को भेंट, जोधपूर, उदयपूर, चित्तोडगड, अजमेर
▪️खर्च :
अजमेर से अजमेर तक का खर्चा होगा प्रति व्यक्ती 15 हजार रुपये।
▪️सुविधा
A/C लक्झरी बस, धरमशाला में निवास, साधारण शाकाहारी भोजन, चाय, नाश्ता. 100 रुपये से कम के तिकट
▪️कोण आ सकेगा
यह आंतरभारती की यात्रा है। सभासद के अतिरिक्त लोग भी आ सकते हैं। लेकिन उन्हे सभासद होना होगा।
संयोजक : संजय माचेवर – 9975704211यदी कोई शंका हो तो आप सीधे संजय माचेवर जी से संपर्क कर सकते है। संपर्क का समय सुबह 9 से पाहिले और शाम में 5.30 के बाद.-
अमर हबीब, कार्याध्यक्ष, आंतरभारती ट्रस्ट