मला समजलेले “रावण…!”


आठच दिवसांपुर्वी…
राजकिशोर मोदी यांनी रोजा इफ्तार चा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या दिवशी ची गोष्ट. उपवास सोडण्यासाठी वेळ होता, तेंव्हा आम्ही चार मित्र बाजूला उभे राहून बोलत होतो. चार मित्रांची संख्या वाढत सात-आठ वर गेली. “इफ्तार” या मुळ विषयावरील गप्पा रंगल्या होत्या. तो विषय बाजूला जात जात वेगवेगळ्या धर्म प्रसारावर येवून ठेपला. या गप्पांत वेगवेगळ्या समाज घटकातील मित्र होते, प्रत्येक जण आपापले मत मांडत होता. “ठराविक धर्म जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत असताना हिंदु धर्म इतर देशांत का आढळून येत नाही?” असा एक विचार पुढे आला. यावर माझ्या वाचनात आलेलं कुमार विश्वास यांच “हिंदु धर्मातील ऋषीमुनी जर या धर्माचा प्रसार करण्यासाठी भारत देशाबाहेर गेले असते तर हिंदु धर्माचा ही विचार आज जगातील अनेक देशांमध्ये दिसला असता” असं व्यक्त केलेले मत मी सांगितलं. मतमतांतरे होत होती. हा विषय पुढे रामायणातील एक अविभाज्य पात्र असलेल्या रावणावर येवून ठेपला!
मी रावण हा ब्राह्मण जातीचा आहे असे सांगताच चर्चा रंगली. माझ्या एका मित्राने रावण ब्राह्मण असण्याच्या मी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि पुन्हा चर्चा रंगली. रावण हा ब्राह्मणच असल्याचे मी एक-दोन दाखले दिले. पुन्हा मतमतांतरे झाली. ही चर्चा रंग घेत असतांनाच “इफ्तार” ची वेळ झाली आणि आम्ही सर्वजण मुस्लिम बांधवांसह उपवास सोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या दस्तरखाण्याकडे (बिछायतीकडे) वळालो. “रावण” हा विषय तिथंच थांबला!


दोन दिवसानंतर ही संपुर्ण चर्चा उत्साहाने ऐकणारे आणि रावण हे ब्राम्हण होते हे मी सांगताच आपल्या भुवया ऊंच करणारे माझे सहकारी मित्र दत्तात्रय अंबेकर आणि यांनी या चर्चेला अनुसरुन त्यांच्याच फेसबुक वर “ओळखा पाहू सीतामैय्याचे अपहरण करणारा रावण कोणत्या जातीचा होता” या आशयाची एक पोस्ट टाकली. यावरही अनेकांनी आपली मतं नोंदवली. यात अनेकांनी स्पष्ट तर अनेकांनी संभ्रमावस्थेतील मत प्रगट केली.
ही पोस्ट वाचल्यानंतर वरील पोस्ट आणि त्या ठिकाणी झालेल्या चर्चेचा संदर्भ घेत मला वरील संदर्भात जी “रावणा” बध्दल माहिती आहे ती लिहण्याची इच्छा मनात जागृत झाली, म्हणून हे प्रयोजन…!


मुळात मी रावणाचा, रामायणाचा, रामाचा आणि रामायणातल्या पात्रांचा समर्थक नाही. रामायण या ग्रंथाकडे आणि त्यातील सर्व पात्रांकडे मी एक जीवन जगण्याचे चांगले एक सुत्र म्हणून पाहणारा सामान्य वाचक आहे. आणि म्हणूनच अलिकडे कधी वेळ मिळाला तर रामायणातील पात्रांचा अभ्यास करणारा एक साधारण साधक
ही आहे. रामायणातील अनेक पात्रांबध्दल, त्यांच्या व्यक्ती चारित्र्याबध्दल वाचले ऐकले की जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली एक नवी उर्जा मला मिळते. असा माझा अनुभव आहे.


मुळात रावण हे पात्र एका पोस्ट मध्ये बंदीस्त करता येण्या एवढा सहज आणि सोपा विषय नाही, तो एक चिंतनाचा, प्रदीर्घ लेखणाचा विषय आहे. हे अगोदरच स्पष्ट करतो. हा विषय मी फक्त वरील ठिकाणी झालेल्या चर्चेच्याच अनुषंगाने अभ्यासितो आहे. तेंव्हा रावणाच्या इतर बाबींचा, चांगल्या-वाइट कामांचा संबंध येथे कृपया कोणीही जोडु नये.
रावण हा उत्तम कुलस्थ मुनी नाती आहे. याचा अर्थ उत्तम कुळातील मुनी ऋषींचा नातु आहे. रामायणात आणि इतर धार्मिक ग्रंथात ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो अशा उत्तम कुळातील मुनी ऋषींचा तो नातु आहे. रावण हा एक वैष्णव कुळातील एक जाज्वल्य शीवभक्त आहे. प्रचंड बुध्दीमान असल्यामुळे, दहा माणसांच्या एकत्रित बुध्दी एवढी बुध्दिमत्ता रावणात असल्यामुळे त्याला “दशभुजाधिश” असे म्हटले जाते. नवग्रह रावणाच्या चरणकमलावर बसलेले आहेत तर शनी च्या डोक्यावर रावणाचा पाय आहे. रावण सोन्याची लंका असलेल्या प्रदेशाचा राजा आहे. सर्व सुख, ऐश्वर्य रावणाच्या पायाशी लोळण घेत आहे. रावण याच्याही पेक्षा अधिक शक्तीमान आहे, असा उल्लेख रामायणात आहे.


रावण एवढा शक्तिमान असतांना ही तो रामा सोबत झालेल्या युध्दात का हारला? याची चर्चा सतत होत असते. याची कारणं सांगताना ऋषी वाल्मिकी राम म्हणतात की, राम हा इच्छांपासुन मुक्त आहे तर रावण हा इच्छांमध्ये गुंतलेला आहे. राम हा मनुष्यतेवर राज्य करीत असे तर रावण हा मनुष्यांवर राज्य करणारा राजा होता. मंदोदरी सारखी सुंदर पत्नी असतांनाही रावण रामा सोबत राणावणात फिरणा-या सीतेचे अपहरण करून तिला आपली अर्धांगिनी बनवण्याची सुप्त इच्छा आपल्या मनात बाळगून होता. राम हा नितीन प्रिय होता तर रावण हा अनिती प्रिय होता. म्हणूनच रामाने श्रीलंकेतील रावणाचे अनितीप्रिय राज्य उलथावून लावण्यासाठी युध्द केले होते.या युध्दात विजय मिळवण्यासाठी, युध्द सुरु करण्यापुर्वी रामाने केलेल्या यज्ञाला / पुजलेला ही रामायणात खुप मोठे महत्त्व आहे. यांचे खुप छान विवेचन रामायणात केले आहे. राम वनवासात असतांनाच त्यांनी ब्रम्हाजीं चा नातु जांबुवंत यांचेकडे ही पुजा करण्याची इच्छा व्यक्त केली. जांबुवंत हे रावण परीवाराशी जुने संबंध असलेले गृहस्थ. रामानी जेंव्हा ही पुजा करण्याची इच्छा व्यक्त केली. तेंव्हा जांबुवंत त्यांना म्हणाले, “या वनात तु कशी करणार ही पुजा? तुला या वनात पुरोहित, पुजेचे सामान तर मिळायला पाहिजे ना?” रामाने सांगितले, “बघु प्रयत्न तर करु.” राम जांबुवंत यांना आपल्या पुजेच्या संकल्पा बाबत सांगत होते. “माझे आराध्य दैवत तर शंकर आहे, तेंव्हा मला असा पुरोहित वय पाहीजे जो शैव (शीवभक्त) आहे. आणि मी वैष्णव असल्यामुळे ते पुरोहित ही वैष्णव पाहीजेत.”
जांबुवंत म्हणाले, “असा पुरोहित या वनात कसा सापडेल?” मग पुजा कशी पुर्ण होईल असा प्रश्न रामाने पुन्हा जांबुवंत यास विचारला. तेंव्हा जांबुवंत म्हणाले, “असा एक पुरोहित माझ्या पाहण्यात आहे, पण तो तुझी पुजा करेल का नाही, हे नाही सांगता येणार.” रामाने जांबुवंत यांना विचारले, “कोण आहेत ते पुरोहीत.” जांबुवंत म्हणाले, “कुलस्थ मुनी चा नातु, महारथी रावण!” जो शिवा चा निस्सीम भक्त ही आहे आणि वैष्णव ही आहे.” रामाने सांगितले, मग “विचारुन तर पहा!” ,
रामाने केलेल्या सुचनेप्रमाणे जांबुवंत यांनी श्रीलंकेत, रावणाच्या दरबारात जायची तयारी केली. दरम्यान यांची खबर राजा रावण यास लागली. त्याने आपल्या सर्व सैन्याला सुचना दिल्या, जांबुवंत ऋषी लंकेत मला भेटण्यासाठी येत आहेत. त्यांना कुणीही अडवू नये. सर्वांनी त्यांना आदराची वागणूक द्यावी, त्यांचा सन्मान करावा, त्यांचे दर्शन घ्यावे व माझ्या महालापर्यंत त्यांना सन्मानाने पोहंचवावे.
ठरल्या प्रमाणे जांबुवंत रावणाच्या महालात सन्मानाने पोहोचले. राजा रावणाने ही जांबुवंतांंचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. जांबुवंतांच्या चरणांना स्पर्श करून त्याचे स्वागत करीत त्याना नम्रपणे रावणाने विचारले, ” बोला, असे येणे केले?”
जांबुवंत म्हणाले, ” महाराज माझ्या कडे एक यजमान आहेत, जे युध्द सुरु करण्यापुर्वी पुजा करुन इच्छितात. त्यांना एका अशा पुरोहितांची आवश्यकता आहे जो शीव आहे आणि वैष्णव ही आहे. असे दोन्ही गुण अंगी असलेला तुमच्या शिवाय अधिक चांगला पुरोहित या पृथ्वीतलावर अजून कोण असू शकेल. काय तुम्ही ही पुजा करुन शकाल?”
जांबुवंतांच बोलणं संपल्यावर रावण म्हणाले, ” काय मला मिळालेल्या माहितीप्रमाणे आपले दोन्ही यजमान हे आयोध्याचे निर्वासित राजकुमार राम आणि लक्ष्मण आहेत.” जांबुवंत म्हणाले, ” होय, दशाधिश! ते दोघेच आहेत. काय आपण या पुजेचा स्विकार करणार?” रावणाने होय अथवा नाही असे उत्तर न देता पुढचा प्रश्न विचारला, ” काय लंका विजय हा या पुजेचा उद्देश आहे?” जांबुवंत म्हणाले , ” होय महाराजा, त्यांच्या पुजेचा उद्देश हाच आहे. काय आपण या पुजेचा स्विकार कराल?”
रावण म्हणाले, “मी हे सर्व एक जिज्ञासा म्हणून विचारत होतो, वस्तुतः एखाद्दा पुजेसाठी एखाद्या पुरोहितांना विचारले असता नाही म्हणण्याचा त्याला अधिकारच नाही, तो पुरोहिताचा धर्म ही नाही. चला, मी या पुजेचा स्विकार करतो.”
रावणाचा होकार मिळताच जांबुवंतांनी पंचांग पाहीले आणि लगेचच जवळचा मुहूर्त ही निश्चित केला. ब्रम्हमुहुर्तावर सकाळी ५:३० वाजता पुजेचा वेळ निश्चित केला गेला. रावण म्हणाले,
“मी बरोब्बर ५ वाजता येणार!” जांबुवंतांनी विचारले “आचार्य पुजेसाठी काय काय सामग्री लागेल, ती सांगा, मी यजमानांना घेवून यायला सांगतो.” रावण म्हणाले, ” तुमचे यजमान वनात आहेत, ते कोठुन आणि कशी आणणार ही सामग्री? आणि पुरोहितांचा धर्म बनतो की पुजेची सामग्री आणण्यास यजमान जर असमर्थ असेल तर ती सामग्री आणण्याची जबाबदारी ही पुरोहितांचीच आहे. तेंव्हा पुजेची सर्व सामग्री मी स्वतः: सोबत घेऊन येईल. तुम्ही काळजी करु नका!”
हे सर्व ठरल्यानंतर जांबुवंत तेथुन उठले आणि रामाकडे हा सर्व वृतांत सांगण्यासाठी निघाले. रावणाने आपला पुत्र मेघनाथ यास बोलावून घेतले. आणि अशोकवनात जावून सीतेला मी एका विशेष प्रयोजनासाठी तिला तातडीने भेटायला येत आहे असा निरोप देण्यास सांगितले.
मेघनाथ तातडीने अशोक वनात गेले, त्यांनी सीते ला पिताश्री रावण हे तातडीने आपल्या भेटीला येत आहेत असा निरोप दिला. त्यापाठोपाठ रावण ही तेथे गेले, त्यांनी सीतेला सांगितले,
“हे सीते, तुझा पती राम लंका विजयासाठी उद्या ब्रम्हमुहुर्तावर यज्ञ करणार आहे, त्याच्या जवळ पुरोहीत नाही. म्हणून या यज्ञाच पुरोहित्य मी उद्या सकाळी करणार आहे. एक विवाहीत व्यक्ती जर पुजा करीत असेल आणि त्याची पत्नी जर त्याचे जवळ नसेल तर ती पुजा पुर्ण होत नाही, अपुर्णच राहते. आणि मी अपुर्ण पुजेचे पौराहित्य करीत नाही. म्हणून उद्या सकाळी माझा पुत्र इंद्रजित इथे रथ घेऊन तुझ्याकडे येईल. तु स्नान करुन शुभ्र वस्त्र घालुन या रथात बसुन पुजेसाठी येण्यास तयार रहा. आणि हो तुझी लंका मुक्ती ही केवळ पुजे पुरतीच आहे, पुजा संपताच लागलीच या रथात बसून पुन्हा तुला अशोक वनाकडे प्रस्थान करावे लागेल.”
राम-सीता आणि रावण यांची ही अनोखी कथा जीवन जगण्याचा एक नवा दृष्टिकोन सतत देवून जाते.
दुसरे दिवशी ठरल्याप्रमाणे रावण सकाळीच पुरोहिताच्या वेशात अंगावर शुभ्र पांढरे वस्त्र आणि गो-या दिमाखदार चेह-यावर कुंकुमतिलक लावुन प्रसन्न चेह-याने पुजा स्थळी आले. रावण येताच राम आणि लक्षमणांनी आपल्या पुरोहितांचे चरण स्पर्श केले. राम म्हणाले,” हे आचार्य, मी राजा दशरथ पुत्र राम आपला छोटा भाऊ लक्ष्मण सोबत आपल्याला प्रणाण करतो!”
आचार्य रावणांनी आपल्या दोन्ही यजमानांना आशीर्वाद दिले. पुजेस बसण्याची सुचेना केली. रावणाने रामाला प्रश्न विचारला, “काय माझे यजमान विवाहीत आहेत?” रामाने नम्रपणे सांगितले, “हो आचार्य, मी विवाहीत आहे.” रावणाने पुन्हा प्रश्न केला, “मग आपल्या पत्नीला पुजेसाठी आपल्या शेजारी येऊन बसण्यास सांगा.” राम गडबडले, म्हणाले, “आचार्य, माझी धर्मपत्नी माझ्या सोबत नाही.” जांबुवंत म्हणाले, “मग आता पुजा कशी होणार?”
आचार्य रावण शांतपणे म्हणाले, ” मी पुजेचा स्विकार करण्यापुर्वीच सांगितले होते की, पुजेची सामग्री आणण्यास यजमान असमर्थ असेल तर पुजेची संपुर्ण सामग्री घेऊन येणे हा आचार्यांचा धर्म आहे.” रावणाने आपला मुलगा इंद्रजित यास आदेश सोडला, ” बेटा इंद्रजित, यजमानांच्या पत्नीला त्यांच्या शेजारी आणून बसवा.” अपहरण केलेल्या सीतामाईला इंद्रजित ने रामाच्या शेजारी आणुन बसवले. आणि मग रावणाने आपल्या भारदास्त स्वरात ओम् गण गणपतेय् मह: … म्हणत पुजेची सुरुवात केली. संपुर्ण पुजेचे उत्तम पौराहित्य पुर्ण केले. पुजा लंका विजयासाठी केलेल्या संकल्पालादोन्ही यजमानांना रावणाने आशीर्वाद ही दिले. पुरोहीत बनलेल्या रावणाने रामाच्या लंका विजयाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी आशीर्वाद ही दिला.
पुजा झाल्यानंतर रामाने आचार्य रावणाला विचारले, “आचार्य दक्षिणा काय देवू?” रावण म्हणाले, “त्रैलोक्यातील सर्व संपत्ती तुझ्या आचार्या जवळ आहे, कुबेराचा रथ तुझ्या आचार्या जवळ आहे, अशा ऐश्वर्य संपन्न असलेल्या राजास तुझ्या सारखा वयामध्ये फिरणारा साधा वनवासी काय दक्षिणा देणार?”
राम म्हणाले, ” आचार्य मी रघुवंशी आहे, आणि आचार्यांना दक्षिणा नाही दिली तर माझी पुजा पुर्ण होणार नाही. तेंव्हा आपण दक्षिणा तर सांगा.”
रावण क्षणभर थबकले. विचार करुन म्हणाले, “मी आता नाही मागणार, वेळ आल्यावर निश्चित मागेन.” राम म्हणाले,”आचार्य दक्षिणा तर सांगा, आपण मागाल ती दक्षिणा देण्यास तेंव्हा मी लायक राहील, नाही राहील.” आचार्य रावणाने विचार केला आणि सांगितले, “माझा मृत्यू जेंव्हा माझ्या जवळ येईल तेंव्हा माझे दोन्ही यजमान माझ्या नजरेसमोर असतील!”
दोन्ही यजमान राम आणि लक्ष्मणाने आचार्य रावणाचे चरणस्पर्श करीत वचन पुर्तीचा शब्द दिला. आचार्य रावणांनी पुन्हा दोन्ही यजमानांना आशीर्वाद दिला, आणि ते आपल्या त्यातुन निघुन गेले!
पुजा झाल्यानंतर रामाने लंका विजयाच्या युध्दाची तयारी सुरु केली. इतर राजांची मदत न घेता त्यांनी वनामध्ये असणा-या प्रत्येक सामान्य माणसांना, वानरांना त्यांनी एकत्रित केले. जमेल तेवढे साहित्य जमा केले, आणि युध्द सुरु झाले.


या युध्दात विजय मिळवण्यासाठी, युध्द सुरु करण्यापुर्वी रामाने केलेल्या यज्ञाला / पुजलेला ही रामायणात खुप मोठे महत्त्व आहे. यांचे खुप छान विवेचन रामायणात केले आहे. राम वनवासात असतांनाच त्यांनी ब्रम्हाजीं चा नातु जांबुवंत यांचेकडे ही पुजा करण्याची इच्छा व्यक्त केली. जांबुवंत हे रावण परीवाराशी जुने संबंध असलेले गृहस्थ. रामानी जेंव्हा ही पुजा करण्याची इच्छा व्यक्त केली. तेंव्हा जांबुवंत त्यांना म्हणाले, “या वनात तु कशी करणार ही पुजा? तुला या वनात पुरोहित, पुजेचे सामान तर मिळायला पाहिजे ना?” रामाने सांगितले, “बघु प्रयत्न तर करु.” राम जांबुवंत यांना आपल्या पुजेच्या संकल्पा बाबत सांगत होते. “माझे आराध्य दैवत तर शंकर आहे, तेंव्हा मला असा पुरोहित वय पाहीजे जो शैव (शीवभक्त) आहे. आणि मी वैष्णव असल्यामुळे ते पुरोहित ही वैष्णव पाहीजेत.”


जांबुवंत म्हणाले, “असा पुरोहित या वनात कसा सापडेल?” मग पुजा कशी पुर्ण होईल असा प्रश्न रामाने पुन्हा जांबुवंत यास विचारला. तेंव्हा जांबुवंत म्हणाले, “असा एक पुरोहित माझ्या पाहण्यात आहे, पण तो तुझी पुजा करेल का नाही, हे नाही सांगता येणार.” रामाने जांबुवंत यांना विचारले, “कोण आहेत ते पुरोहीत.” जांबुवंत म्हणाले, “कुलस्थ मुनी चा नातु, महारथी रावण!” जो शिवा चा निस्सीम भक्त ही आहे आणि वैष्णव ही आहे.” रामाने सांगितले, मग “विचारुन तर पहा!” ,
रामाने केलेल्या सुचनेप्रमाणे जांबुवंत यांनी श्रीलंकेत, रावणाच्या दरबारात जायची तयारी केली. दरम्यान यांची खबर राजा रावण यास लागली. त्याने आपल्या सर्व सैन्याला सुचना दिल्या, जांबुवंत ऋषी लंकेत मला भेटण्यासाठी येत आहेत. त्यांना कुणीही अडवू नये. सर्वांनी त्यांना आदराची वागणूक द्यावी, त्यांचा सन्मान करावा, त्यांचे दर्शन घ्यावे व माझ्या महालापर्यंत त्यांना सन्मानाने पोहंचवावे.
ठरल्या प्रमाणे जांबुवंत रावणाच्या महालात सन्मानाने पोहोचले. राजा रावणाने ही जांबुवंतांंचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. जांबुवंतांच्या चरणांना स्पर्श करून त्याचे स्वागत करीत त्याना नम्रपणे रावणाने विचारले, ” बोला, असे येणे केले?”


जांबुवंत म्हणाले, ” महाराज माझ्या कडे एक यजमान आहेत, जे युध्द सुरु करण्यापुर्वी पुजा करुन इच्छितात. त्यांना एका अशा पुरोहितांची आवश्यकता आहे जो शीव आहे आणि वैष्णव ही आहे. असे दोन्ही गुण अंगी असलेला तुमच्या शिवाय अधिक चांगला पुरोहित या पृथ्वीतलावर अजून कोण असू शकेल. काय तुम्ही ही पुजा करुन शकाल?”
जांबुवंतांच बोलणं संपल्यावर रावण म्हणाले, ” काय मला मिळालेल्या माहितीप्रमाणे आपले दोन्ही यजमान हे आयोध्याचे निर्वासित राजकुमार राम आणि लक्ष्मण आहेत.” जांबुवंत म्हणाले, ” होय, दशाधिश! ते दोघेच आहेत. काय आपण या पुजेचा स्विकार करणार?” रावणाने होय अथवा नाही असे उत्तर न देता पुढचा प्रश्न विचारला, ” काय लंका विजय हा या पुजेचा उद्देश आहे?” जांबुवंत म्हणाले , ” होय महाराजा, त्यांच्या पुजेचा उद्देश हाच आहे. काय आपण या पुजेचा स्विकार कराल?”
रावण म्हणाले, “मी हे सर्व एक जिज्ञासा म्हणून विचारत होतो, वस्तुतः एखाद्दा पुजेसाठी एखाद्या पुरोहितांना विचारले असता नाही म्हणण्याचा त्याला अधिकारच नाही, तो पुरोहिताचा धर्म ही नाही. चला, मी या पुजेचा स्विकार करतो.”
रावणाचा होकार मिळताच जांबुवंतांनी पंचांग पाहीले आणि लगेचच जवळचा मुहूर्त ही निश्चित केला. ब्रम्हमुहुर्तावर सकाळी ५:३० वाजता पुजेचा वेळ निश्चित केला गेला. रावण म्हणाले,
“मी बरोब्बर ५ वाजता येणार!” जांबुवंतांनी विचारले “आचार्य पुजेसाठी काय काय सामग्री लागेल, ती सांगा, मी यजमानांना घेवून यायला सांगतो.” रावण म्हणाले, ” तुमचे यजमान वनात आहेत, ते कोठुन आणि कशी आणणार ही सामग्री? आणि पुरोहितांचा धर्म बनतो की पुजेची सामग्री आणण्यास यजमान जर असमर्थ असेल तर ती सामग्री आणण्याची जबाबदारी ही पुरोहितांचीच आहे. तेंव्हा पुजेची सर्व सामग्री मी स्वतः: सोबत घेऊन येईल. तुम्ही काळजी करु नका!


“हे सर्व ठरल्यानंतर जांबुवंत तेथुन उठले आणि रामाकडे हा सर्व वृतांत सांगण्यासाठी निघाले. रावणाने आपला पुत्र मेघनाथ यास बोलावून घेतले. आणि अशोकवनात जावून सीतेला मी एका विशेष प्रयोजनासाठी तिला तातडीने भेटायला येत आहे असा निरोप देण्यास सांगितले.


मेघनाथ तातडीने अशोक वनात गेले, त्यांनी सीते ला पिताश्री रावण हे तातडीने आपल्या भेटीला येत आहेत असा निरोप दिला. त्यापाठोपाठ रावण ही तेथे गेले, त्यांनी सीतेला सांगितले,
“हे सीते, तुझा पती राम लंका विजयासाठी उद्या ब्रम्हमुहुर्तावर यज्ञ करणार आहे, त्याच्या जवळ पुरोहीत नाही. म्हणून या यज्ञाच पुरोहित्य मी उद्या सकाळी करणार आहे. एक विवाहीत व्यक्ती जर पुजा करीत असेल आणि त्याची पत्नी जर त्याचे जवळ नसेल तर ती पुजा पुर्ण होत नाही, अपुर्णच राहते. आणि मी अपुर्ण पुजेचे पौराहित्य करीत नाही. म्हणून उद्या सकाळी माझा पुत्र इंद्रजित इथे रथ घेऊन तुझ्याकडे येईल. तु स्नान करुन शुभ्र वस्त्र घालुन या रथात बसुन पुजेसाठी येण्यास तयार रहा. आणि हो तुझी लंका मुक्ती ही केवळ पुजे पुरतीच आहे, पुजा संपताच लागलीच या रथात बसून पुन्हा तुला अशोक वनाकडे प्रस्थान करावे लागेल.”
राम-सीता आणि रावण यांची ही अनोखी कथा जीवन जगण्याचा एक नवा दृष्टिकोन सतत देवून जाते.


दुसरे दिवशी ठरल्याप्रमाणे रावण सकाळीच पुरोहिताच्या वेशात अंगावर शुभ्र पांढरे वस्त्र आणि गो-या दिमाखदार चेह-यावर कुंकुमतिलक लावुन प्रसन्न चेह-याने पुजा स्थळी आले. रावण येताच राम आणि लक्षमणांनी आपल्या पुरोहितांचे चरण स्पर्श केले. राम म्हणाले,” हे आचार्य, मी राजा दशरथ पुत्र राम आपला छोटा भाऊ लक्ष्मण सोबत आपल्याला प्रणाण करतो!”
आचार्य रावणांनी आपल्या दोन्ही यजमानांना आशीर्वाद दिले. पुजेस बसण्याची सुचेना केली. रावणाने रामाला प्रश्न विचारला, “काय माझे यजमान विवाहीत आहेत?” रामाने नम्रपणे सांगितले, “हो आचार्य, मी विवाहीत आहे.” रावणाने पुन्हा प्रश्न केला, “मग आपल्या पत्नीला पुजेसाठी आपल्या शेजारी येऊन बसण्यास सांगा.” राम गडबडले, म्हणाले, “आचार्य, माझी धर्मपत्नी माझ्या सोबत नाही.” जांबुवंत म्हणाले, “मग आता पुजा कशी होणार?”
आचार्य रावण शांतपणे म्हणाले, ” मी पुजेचा स्विकार करण्यापुर्वीच सांगितले होते की, पुजेची सामग्री आणण्यास यजमान असमर्थ असेल तर पुजेची संपुर्ण सामग्री घेऊन येणे हा आचार्यांचा धर्म आहे.” रावणाने आपला मुलगा इंद्रजित यास आदेश सोडला, ” बेटा इंद्रजित, यजमानांच्या पत्नीला त्यांच्या शेजारी आणून बसवा.” अपहरण केलेल्या सीतामाईला इंद्रजित ने रामाच्या शेजारी आणुन बसवले.


मग रावणाने आपल्या भारदास्त स्वरात ओम् गण गणपतेय् मह: … म्हणत पुजेची सुरुवात केली. संपुर्ण पुजेचे उत्तम पौराहित्य पुर्ण केले. पुजा लंका विजयासाठी केलेल्या संकल्पालादोन्ही यजमानांना रावणाने आशीर्वाद ही दिले. पुरोहीत बनलेल्या रावणाने रामाच्या लंका विजयाचा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी आशीर्वाद ही दिला.
पुजा झाल्यानंतर रामाने आचार्य रावणाला विचारले, “आचार्य दक्षिणा काय देवू?” रावण म्हणाले, “त्रैलोक्यातील सर्व संपत्ती तुझ्या आचार्या जवळ आहे, कुबेराचा रथ तुझ्या आचार्या जवळ आहे, अशा ऐश्वर्य संपन्न असलेल्या राजास तुझ्या सारखा वयामध्ये फिरणारा साधा वनवासी काय दक्षिणा देणार?”
राम म्हणाले, ” आचार्य मी रघुवंशी आहे, आणि आचार्यांना दक्षिणा नाही दिली तर माझी पुजा पुर्ण होणार नाही. तेंव्हा आपण दक्षिणा तर सांगा.”
रावण क्षणभर थबकले. विचार करुन म्हणाले, “मी आता नाही मागणार, वेळ आल्यावर निश्चित मागेन.” राम म्हणाले,”आचार्य दक्षिणा तर सांगा, आपण मागाल ती दक्षिणा देण्यास तेंव्हा मी लायक राहील, नाही राहील.” आचार्य रावणाने विचार केला आणि सांगितले, “माझा मृत्यू जेंव्हा माझ्या जवळ येईल तेंव्हा माझे दोन्ही यजमान माझ्या नजरेसमोर असतील!”
दोन्ही यजमान राम आणि लक्ष्मणाने आचार्य रावणाचे चरणस्पर्श करीत वचन पुर्तीचा शब्द दिला. आचार्य रावणांनी पुन्हा दोन्ही यजमानांना आशीर्वाद दिला, आणि ते आपल्या त्यातुन निघुन गेले!
पुजा झाल्यानंतर रामाने लंका विजयाच्या युध्दाची तयारी सुरु केली. इतर राजांची मदत न घेता त्यांनी वनामध्ये असणा-या प्रत्येक सामान्य माणसांना, वानरांना त्यांनी एकत्रित केले. जमेल तेवढे साहित्य जमा केले, आणि युध्द सुरु झाले.


युध्दात खुप रकृत रक्त पातळ झाला. रावणाने युध्दभुमीवर प्रवेश केला तेंव्हा तर रामाचे अर्धेअधिक सैन्य मारले गेले. दिसेल त्या शत्रुचा नायनाट रावणाने केला. मात्र नंतर परिस्थिती बदलली. रावणाचे सैन्य हतबल झाले, रावण पराजयाच्या छायेखाली आला. युध्दाचा शेवटचा दिवस उजाडला. सुर्य अस्ताला जाण्यासाठी अजून कांही वेळ शिल्लक होता. रावण युध्दभुमीवर निपचित पडला होता. रावण जखमी झाल्याची, मारला गेल्याची बातमी संपुर्ण युध्दभुमीवर पसरली. ही वार्ता रावणाची पत्नी मंदोदरी पर्यंत जावून पोहंचली. अतिशय वेगाने, शोक करीत मंदोदरी रावणाच्या प्रेतापर्यंत येवून पोहंचली. रावणाला निपचित पडलेले पाहुन मंदोदरीचा शोक अनावर झाला. ती खुप रडली.


मंदोदरी ने स्वतः ला सावरले. ती ताडकन उभी राहिली, आणि तीने सैनिकाला विचारले,” तो कुठे आहे, ज्याने माझ्या पतीला मारले?” समुद्राच्या काठी समुद्राकडे एकटक निपचित बसलेल्या रामाकडे सैन्यातील शिपायाने बोट दाखवले. सुमुद्राच्या एका किना-या शेजारी राम अतिशय दुःखी मनस्थितीत, या युध्दात इतका रक्तपात का झाला, हा टाळता आला नसता का, यांचा व्याकुळ होवून विमनस्क परिस्थितीत विचार करीत राम बसले होते. एवढ्यात अस्ताला जाणाऱ्या सुर्यकिरणांनी रामाकडे येत असलेल्या एका स्त्रीची छबी रामासमोर उभी केली. राम ताडकन उठले. स्त्रीच्या छायेचा अंदाज घेत त्यांनी दोन्ही हात जोडले आणि, ” हे माते, मी आपल्याला प्रणाम करतो म्हणून आपले दोन्ही हात जोडले. या निर्जन युध्दभुभीवर आपण का आलात?” असे विचारले. मंदोदरी म्हणाल्या,” मी मंदोदरी, रावणाची दुर्भाग्यशाली पत्नी!”


राम म्हणाले, “माते मी आपली क्षमा मागतो, आपले पती खुप तेजस्वी होते. महाज्ञानी होते, उच्च कुळातील होते, ब्रम्हांजींचे वंशज होते! पण… त्यांनी सतत अनिती केली, म्हणून त्यांना मारावे लागले. मी आपल्याला झालेल्या दु:खाबद्दल क्षमस्वी आहे.”
मंदोदरी म्हणाल्या, “हे राम, मी यासाठी नाही आले की मी तुला रागावू, शिव्या, शाप देवू! ” रामाने विचारले, ” तर कशासाठी आला आहात माते!” मंदोदरी म्हणाल्या, मी हे पाहण्यासाठी आले होते की, ज्याने संपुर्ण जग पराजित करण्याची इच्छा बाळगली होती, जो सोन्याच्या लंकेचा राजा होता, ज्यांच्या चरणी नवग्रहांचे वास्तव्य होतं तर शनी ज्याच्या चरणाखाली होता अशा शक्तीशाली पराक्रमी रावणाचा वध कोणत्या पराक्रमी पुरुषाने केला आणि त्यांच्याजवळ असे काय आहे जे माझ्या पतीजवळ नव्हते, ते पहायला मी आले आहे.”
राम म्हणाले, ” हे माते, मग काय पाहीले तुम्ही,” मंदोदरी म्हणाल्या, ” हां आल्याबरोबर पाहीले.” राम म्हणाले,
“हे माते , मग काय अंतर दिसले तुम्हाला रावणात आणि माझ्यात.” मंदोदरी म्हणाल्या, “रावण जो माझा पती होता तो माझ्या सारखी सुदर्शनी पत्नी असून ही वनामध्ये फिरणा-या तुझ्या पत्नीला अर्धांगिनी बनवू पहात होता, आणि एक तु आहेस की जो पाठीमागून एका स्त्रीची सावली येत असल्याचे दिसताच उठून हात जोडून हे माते म्हणत प्रणाम केलास! हे आहे तुझ्यात आणि रावणा मधले अंतर!”


वास्तविक रामायणातील रावण आणि इतर पात्रे आजही प्रत्यक्ष आपल्या जीवनात सतत आपल्या आजुबाजुला वावरताना आढळतात. यापैकी अनेक पात्रं कधी रामाच्या भुमिकेत तर कधी रावणाच्या भुमिकेत वावरत असल्याचे ही आपण पहातो. आपण या सर्व पात्रांकडे कसे पहातो हा आपला आपला प्रश्न आहे. रामायणातील मला समजलेला, आकलन झालेला, अनुभवलेला रावण मी इथे मांडला आहे. तुम्हाला कसा वाटला!
@: सुदर्शन रापतवार/अंबाजोगाई प्रतिक्रिया कळवा, मला वाचायला निश्चितच आवडतील!