मराठा आरक्षण; अंबाजोगाईत उद्यापासून बेमुदत साखळी उपोषण


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी अंबाजोगाईतील सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगाई येथे बेमुदत साखळी उपोषणास बसणार आहेत.तसेच अंबाजोगाई तालुक्यातील गाव व शहरात राजकीय नेत्यांना प्रवेश बंद करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.


जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते हे आंदोलन दडपण्यासाठी तेथील मराठा आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला यात महिला, मुले व मराठा आंदोलन मोठया प्रमाणात जखमी झाले या घटनेनंतर मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली अनेक ठिकाणी उग्र पडसाद उमटले.मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी आखे मंत्रीमंडळ झटले मात्र जरांगे पाटील मागे हटले नाही. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी 30 दिवसाची मुदत मागितली व उपोषण स्थगित करत 14 ऑक्टोबर रोजी जाहीर सभेचे आयोजन केले यापूर्वी त्यांनी अक्खा महाराष्ट्र पिंजून काढला या सभेस कोट्यावधीच्या संख्येने मराठा उपस्थित राहिला सरकारनी मागितलेली मुदत संपली मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याने 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसले असून गावात यायचं असेल तर आरक्षण घेऊन या अन्यथा प्रवेश बंदीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे.
अंबाजोगाईत उद्यापासून साखळी उपोषण; पुढा-यांना असणार प्रवेशबंदी!


अंबाजोगाईतील मराठा समाज आक्रमक झाला असून 25 ऑक्टोबर ला झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमदार खासदार तसेच मंत्र्यांना अंबाजोगाई तालुक्यातील गाव तसेच शहरात प्रवेश बंद करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या 27 ऑक्टोबर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज साखळी उपोषणास बसणार असल्याची माहिती सकल मराठा समाज अंबाजोगाईच्या वतीने देण्यात आली असून या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.