बारवा संवर्धन मोहीमे अंतर्गत उपक्रम; लाखो दिव्यांनी उजळले नृसिंह बारव!


महाराष्ट्र बारव संवर्धन मोहिमेंतर्गत शनिवारी (ता. १८) सायंकाळी दासोपंत समाधी परिसरातील नृसिंहतीर्थ (बारव) लखख हजारो दिव्यांनी उजळले. महाशिवरात्रीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.


बारव, पुष्करणी चे जनजागृती
पायन्या, विहिरी, कुंड, लोक सहभागातून संवर्धनकरण्यासाठी महाराष्ट्र बारव संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त शनिवारी पासोडीकार सर्वज्ञ दासोपंत स्वामी समाधी परिसरातील बारवची स्वच्छता करून पायऱ्या व वर दिवे ठेवून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
रोटरी व पर्यटन ग्रुप ने घेतला पुढाकार
या उपक्रमात रोटरी क्लब, अंबाजोगाई पर्यटन ग्रुपचा सहभाग होता. बारव मोहिमेचे आकाश कराड, डॉ. नरेंद्र काळे, संतोष मोहिते, रोटरी क्लबचे अध्यक्ष शेख मोईन, भिमाशंकर रिदि] दत्तप्रसाद संदड, निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दराडे, सागरदीक्षित, राहुल देशपांडे, मोरेश्वर देशपांडे, अंगद कराड, कामेश केंद्रे, डॉ. शुभदा लोहिया, सुनील व्यवहारे, संगिता व्यवहारे, गणेश तौर आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी राबवला जाईल हा उपक्रम; आकाश कराड
बारव संवर्धन मोहिमेंतर्गत मागीलवर्षी योगेश्वरी मंदिरासमोर दीपोत्सव झाला होता. यावर्षी दासोपंत परिसरातील नृसिंहतीर्थात हा दीपोत्सव झाला. यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा मानस आकाश कराड यांनी व्यक्त केला.