परळी विधानसभा मतदारसंघात काल २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सर्वच मतदान केंद्रावर अतिशय दहशतीच्या वातावरणात सकाळ पासूनच मतदान सुरु झाले होते. यात दिवसभरात मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी हिंसक घटना घडल्या असून मतदार संघातील १२२ अतिसंवेदनशील केंद्रावर फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी पत्रपरिषदेत केली.
अनेक ठिकाणी घडल्या हिंसक घटना
परळी विधानसभा मतदारसंघात काल मतदानाच्या दिवशी धर्मापुरी, जलालपुर, नवाबवाडी, परळी सह इतर मतदान केंद्रावर ज्या हिंसक घटना घडल्या व ऍड. माधव जाधव यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली या सर्व पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्र परीक्षेत राजेसाहेब देशमुख बोलत होते.
गुंडशाहीची पहावयास मिळाली !
परळी विधानसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षांपासून हिंसक प्रवृत्तीचा, गुंडशाही वृत्तीचा आणि दाब दडपशाही करणारा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले असून याची प्रचिती काल विधानसभेसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी पुन्हा प्रत्यक्ष पहायला मिळाली असल्याचे यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.
धर्मापुरी येथे केली शिविगाळ
या मतदारसंघातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर सकाळपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून बोगस मतदान सुरू असल्याची माहिती आपणास मिळाल्यावर उन आपण या मतदान केंद्रावर गेलो असता आपणास शिवीगाळ करण्यात आली, जलालपुर गावात सुदामती गुट्टे ताईंच्या पीए ला तर परळी शहरातील बॅंक कॉलनी भागात ऍड. माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. याशिवाय सर्वच मतदान केंद्रावर कमीअधिक प्रमाणात बोगस मतदान करण्यात आले.
गुंड नाही प्रवृत्तीचा निषेध
मतदार संघातील या झुंड आणि गुंड नाही प्रवृत्तीचा आपण निषेध करीत असून परळी मतदार संघातील १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी केली.
▪️गुंडशाही विरुध्द आवाज
उठवल्याने मारहाण केली
परळी मतदारसंघात गेली अनेक वर्षांपासून गुंडशाही राजरोसपणे सुरू आहे. या गुंडशाही विरोधात आपण सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने गेली अनेक वर्षांपासून लढा उभारला असल्याचा अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या रागामुळे आपल्यावर मारहाण करण्यात आली असल्याचा दावा ऍड. माधव जाधव यांनी केला.
▪️परळी येथील गुंडशाही संपवा!
परळी विधानसभा मतदारसंघ संघातील गुंडशाहीला आता सामान्य जनता कंटाळली आहे. सामान्य जनता ही अतिशय दहशतीच्या नावाखाली दबून चालली आहे. या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठीच आपण सातत्याने प्रयत्न करीत असतो. तेंव्हा पोलीस प्रशासनाने या गुंडशिहीला प्रोत्साहन देण्याऐवजी ही गुंडशाही संपुष्टात आणावी असे आवाहन सुदामती गुट्टे यांनी केले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.