परळी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतुद!


परळी वैजनाथ येथील संपूर्ण रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार असून भारतीय रेल मंत्रालयाच्या वतीने काही नवीन व काही नुतणीकरण करण्यासाठी ऐकुण 24 कोटी 35 लाख 492 रुपये (24,35,492) बजेट मंजूर केलेले असून या सर्व कामाचे अमृत भारत योजना व अमृत भारत स्टेशन योजना या अंतर्गत हे सर्व काम होणार असल्याची माहिती एडीआरएम अप्पर मंडल प्रबंधक राजीवकुमार गंगेले यांनी परळी येथील रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य (डी.आरयुसीसी) आत्मलिंग शेटे यांनी ही माहिती दिली व स्टेनमध्ये होणार्या इतरही कामाबाबत सविस्तर चर्चा करुन त्यांनी पुढील माहिती दिली आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 वाजता ऑनलाईन (व्हिडीओ कॉन्फरन्स) द्वारे परळी रेल्वे स्टेशनचे भुमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालय, मंडल रेल प्रबंधक (डीआरएम) भरतेशकुमार जैन यांनी पत्रकाद्वारे केले असून विभागीय रेल्वे कार्यालयातून सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.
परवाच एडीआरएम अप्पर मंडल प्रबंधक राजीवकुमार गंगेले व सर्व अधिकारी यांनी परळी येथे येवून पुर्व तयारीची पाहणी करीता आले असताना त्यांनी पत्रकाद्वारे भाजपाच्या शिष्टमंडळाला माहिती दिली. यावेळेस नांदेड-पनवेल या गाडीला नवीन बोगी वाढवून देण्यात याव्यात तसेच बर्थचे (शयनयान) बोगी वाढवुन द्याव्यात, परळी-मुंबई गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी केली असता निश्चित विचार करण्यात येईल असे एआरडीएम यांनी सांगितले.
अमृत भारत योजनेत झाला समावेश
संपूर्ण भारतामध्ये केंद्रीय रेल मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत योजना व अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 13 हजार 539 कोटी रुपयाची योजना असून भारतातील एकुण 126 रेल्वे स्टेशनचे नुतणीकरण व विविध विकास कामे होणार आहेत.जागतिक दर्जाचे ही सर्व कामे होणार असून भारतातील 500 रेल्वे स्टेशन हे पूर्णपणे डिसमेन्टल करुन तेथे अद्ययावत अशी सोयीनियुक्त नवीन रेल्वे स्टेशनचे बांधकाम होणार असून यामध्ये परळी वैद्यनाथ येथील आपल्या रेल्वे स्टेशनची नवीन देखणी अशी भव्य इमारत होणार असल्याची माहिती संचालन भवन विभागीय कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.
सिकंदराबाद विभागामध्ये परळी वैद्यनाथसह बिदर, जहिराबाद, विकाराबाद व इतर 16 स्टेशनचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या अमृत भारत योजनेतून परळी येथील सर्व परिसर हा स्वच्छ करुन येथे अनेक नवीन इमारती होणार आहे. येथे फुडप्लाझा मध्ये मिनी मार्केट देखील होणार असून या फुड प्लाझा मध्ये गोरगरीब व सर्वसामान्य प्रवाशांसाठी “जनसाधारण थाली योजना” सुरू करण्यात येणार असून अत्यल्प दरामध्ये जेवणाची थाळी मिळणार आहे. तसेच परळी येथे अ/ल. सक्षम असा आरक्षण असणारासाठी मोठा वेटींग हॉल बांधकाम होणार आहे. मालधक्का माल साठवण्यासाठी गुडूसशेड तसेच प्लाटफार्म 1 वर पे अॅण्ड युज पद्धतीने टॉयलेट व अशा अनेक नवीन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


रुम मध्ये होणार १०० जणांची सोय
ड्रायव्हर व गार्ड साठी सध्या रणिंग रुम आहे. परंतु तिचे नुतणीकरण करण्यात येवून अंदाजे 100 जणांचे हे रंणिग रुम होणार आहे. रेल्वे प्लाटफार्मवर दुसर्या बाजुस 12 मिटरचा मोठा (फुटओव्हरब्रीज) एफ.ओ.बी. व लिफ्ट होणार आहे. तसेच स्टेशनचा अप्रोच रोड दोन्ही बाजुस भव्य गार्डन, प्रत्येक प्लाटफार्मचे रुंदीकरण, त्यात 1-2-3 नंबरच्या प्लाटफार्मचे रुंदीकरण व सुशोभिकरण होणार आहे.
जुनी इमारत पाडून उभी राहणार भव्य इमारत
परळी रेल्वे स्टेशन मधील पुर्वीचे इमारतीतील बुकींग कार्यालय रिर्झवेशन कार्यालय, स्टेशन मास्तर कॅबिन, टेलीकॉम कार्यालय, एस.एन.टी.कार्यालय हे डिसमेन्टल करुन तेथे भव्य अशा स्वतंत्र इमारती उभ्या राहणार असल्याचे राजीवनकुमार गांगले (ए.आर.डी.एम.) यांनी सांगितले.


नवीन मागण्यांकडे ही लक्ष देण्याची गरज
मछलीपट्टम ते बिदर ही रेल्वे सकाळी 7.30 ला बिदरला पोहंचते व रात्री 7.30 ला बिदर वरुन मछलीपट्टनम निघते ती बिदर येथे 12 घंटे एका जागेवर थांबलेली असते ती गाडीला बिदर-परळी असे एक्सटेंशन द्यावे.
बिदर-परळी अंदाजे 4 तासाचा रस्ता आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाला उत्पन्न ही मिळेल व प्रवाशांची सोयही होईल अशी प्रवाशी संघटनेची मागणी आहे.
तसेच दुसरी रेल्वे नांदेड ते एल.टी.सी.लोकमान्य टिळक ही आठवड्यातून एकदा गुरूवार रोजी होती, परंतु ती ही बंद करण्यात आली आहे. ती पुर्ववत सुरू करावी अशीही मागणी आहे.
सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत योजना व अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ही करोडोची कामे जागतिक दर्जाचे होतील असा विश्वास सर्व प्रवाशांना वाटते. तसेच याबाबत परळी येथील खासदार प्रितमताई मुंडे यांनी देखील वेळोवेळी परळी स्टेशनच्या नुतनणीकरणासाठी निवेदन दिली होती व रेल्वे प्रशासन व रेल्वेमंत्री यांना प्रत्यक्ष भेटीही घेतल्या. त्यामुळे परळी रेल्वे स्टेशनचे या स्कीम मध्ये नाव घेण्यात आले आहे.
तसेच मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी परळी येथील रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी भरीव आर्थिक मदत करावी,प्रवाशांच्या वाढत्या प्रवासामुळे मुंबई व इतर नवीन रेल्वे सुरू कराव्यात यासाठी वेळोवेळी निवेदने दिली आहेत, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री यांचीही भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली व तसे त्यांना लेखी निवेदनेही दिली आहेत.
त्यामुळे आता परळीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या असून परळी वैद्यनाथ रेल्वे स्टेशन 12 ज्योतिर्लिंगाला जोडण्यात येईल व आणखी नवीन रेल्वे गाड्या वाढवण्यात येतील व परळी वैद्यनाथचे रेल्वे स्टेशन हे भारतात वाखाण्याजोगे होईल असे विचार रेल्वे सल्लागार समितीचे मा. सदस्य (डी.आर.यु.सी.सी.) आत्मलिंग शेटे यांनी सांगितले व केंद्र सरकारचे रेल मंत्रालयाचे व मुख्यत्वे करुन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सर्व प्रवाशांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले आहेत.


@: आत्मलिंग प्रभुअप्पा शेटे
संपादक, परळी समाचार
माजी रेल्वे सल्लागार समिती सदस्य
मो.9822400741