दिव्यांग शिक्षकास खंडणी मागितल्या प्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल


शिक्षण संस्थेच्या ४ संचालकांसह माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकाराचा समावेश
माहिती अधिकार, ऍट्रॉसिटी कायद्याची धमकी दाखवत एका दिव्यांग शिक्षकास ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शहर पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा एका शिक्षण संस्थेचेच्या ४ संचालकांसह माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकारासह ९ जणांवर खंडणीसह विविध ११ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या बाबतीत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राम भारती शिक्षण संस्थेचे सचिव सुरेंद्र भिमराव खेडगीकर, सदस्य सुहास व्यंकटराव काटे, सदस्य तुकाराम नागोराव बनसोडे, सदस्य नंदकुमार गोपाळराव गोकुळाष्टमी यांच्या सह प्रा. सुधीर गणपतराव फुलारी, आनंद यशवंत गोसावी, विलास नागोराव जोगदंड (माहिती अधिकार कार्यकर्ते), वसंत खंडी दहिवाडे यांच्या सह पत्रकार अब्दुल रहेमान पटेल या नवू जणांवर भादविचे कलम ३८४, ४२०, ४०६, ४६५, ४६८,४७१,५००,५०१,३४ सह अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ कायदा ८९, ९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात तक्रारदार सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षक संभाजी तुकाराम लांडे यांनी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत पुढे असे म्हटले आहे की, मी संभाजी तुकाराम लांडे, वय 62 वर्ष व्यवसाय-निवृत्त . बाबासाहेब परांजपे चौक संत एकनाथ नगर, रिंग रोड अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड मो.नं. 9975208231 (आ.क्रं. 542599466709) समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन तोंडी सांगुन तक्रार देतो कि, मी वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहत असून कै. पू. बाबासाहेब परांजपे निवासी अंपग विद्यालयात शिक्षक म्हणुन काम पाहीलेले आहे सध्या मी सेवानिवृत्त आहे. सध्या कर्तव्य मतिमंद मुलींचे निवासी विद्यालय येथे सचीव म्हणुन कामकाज करतो. त्यावर कुटुंबाची उपजिवीका भागवितोत.
ग्राम भारती शिक्षण संस्थासंचलित कै. पू. बाबासाहेब परांजपे निवासी विद्दायालयात मी प्रभारी मुख्याध्यापक पद 31/05/2016 पर्यंत कार्यरत होतो त्यानंतर कला शिक्षक म्हणुन 30/06/2019 पर्यंत सेवेत होतो. परंतु माझ काम ग्रामभारती शिक्षण संस्थेचे सचिव सुरेंद्र भिमराव खेडगीकर, संचालक तुकाराम नागोराव बनसोडे, निजाम म पठाण यांना विद्यालयातील कर्मचा-याकडुन व माझ्याकडुन वेतनाच्या 10% रक्कम हवी होती. ती रक्कम मी त्यांना देण्यास नकार केला म्हणुन त्यांना माझे काम आवडत नव्हते. म्हणुन त्याचा राग मनात धरुन त्यांनी माझ्या विरुध्द कटकारस्थान करुन 29/11/2015 रोजी सभासदाची वार्षीक सभा बोलावली या बैठकीत ग्रामभारती शिक्षण संस्थेची आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी समीती गठीत करण्याचे ठरले होते. मात्र विद्यालयाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी अशी चर्चाही झाली नव्हती.
सुरेंद्र भिमराव खेडगीकर यांनी चौकशी समीतीच्या अध्यक्षपदी तुकाराम नागोराव बनसोडे यांची नियुक्ती करण्याचे ठरवले व त्या समितीमध्ये त्यांचे मर्जीतील नंदकुमार गोपाळराव गोकुळष्टमी, सुहास व्यंकटराव काटे, प्रा. सुधीर गणपतराव फुलारी व आनंद यशवंत गोसावी यांची निवड करण्यात आली. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग सोपान पवार व सचिव सुरेंद्र भिमराव खेडगीकर यांच्या सहीने ग्रामभारती शिक्षण संस्थेची आर्थिक कारभाराची इत्यंभुत चौकशी करावी असे पत्र निवड समतीचे अध्यक्ष तुकाराम बनसोडे यांना देण्यात आले होते. तरीही समीतीने जाणुबुजुन विद्यालयाची चौकशी केली. सदर समीतीने सुरेंद्र भिमराव खेडगीकर यांच्याच निवासस्थानी बसुनच मला बोलावुन घेवुन माझी चौकशी केली व संस्थेच्या व विद्यालयाच्या बाबतीत प्रश्नावली तयार केली होती. विद्दालयाची जी प्रश्नावली तयार केली होती त्याची मी सविस्तर उत्तरे दिली. तरीही त्यांनी मला जाणुन बुजुन बडतर्फ करण्याचे उदेशाने लेखी नोटीस देवुन खुलाशाची मागणी केली त्यामळे मी सविस्तर लेखी खुलासा सादर केला असतानाही तो अमान्य करुन माझ्याकडुन आर्थीक लाभ मिळवून घेण्यासाठी चौकशी समीतीने व संस्थेच्या सचिवांनी संगणमत करुन मला बडतर्फ केले. व नंतर डॉ. पाडुरंग सोपानाराव पवार अध्यक्ष ग्राम भारती शिक्षण संस्था यांनी आपणास बडतर्फ केल्याची नोटीस ही संस्थेची नसल्यामुळे गृहीत धरु नये आपण कामकाज पहावे असे पत्रक दिले आहे.
चौकशी समीतीने माझ्याकडुन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी जो बनावट व खोटा अहवाल तयार केला होता तो अहवाल माहीती अधिकार देण्या-या व खंडणी उकळणा-या विलास नागोराव जोगदंड, वसंत खंडु दहिवाडे यांच्या मार्फतीने अब्दुल रहेमान पटेल तत्कालीन वार्ताहर पुण्यनगरी यांच्याकडे दिला त्यामुळे ते माहीती अधिकार देवून सदरची माहीती घेवुन पाच लाख रुपयाची मागणी करीत होते जर पैसे नाही दिले तर आम्ही अशा प्रकारची माहीती देवुन तक्रारी देवुन तुम्हास त्रास देवु प्रसंगी ऍट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच वसंत खंडु दहिवाडे यांनी पुर्वी सन 2014 साली माझ्यावर व डॉ. पांडुरंग सोपानराव पवार यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल केली होती त्यामध्ये आम्ही निर्दोश निघालो आहोत.
ग्रामभारती शिक्षण संस्थेची आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी समीती गठीत करण्याचे ठरले होते परंतु मला त्रास देण्याचे उदेशाने 01) सुरेंद्र भिमराव खेडगीकर (सचिव) यांनी चौकशी समीतीच्या अध्यक्षपदी 02) तुकाराम नागोराव बनसोडे यांची नियुक्ती करुन त्या समितीमध्ये त्यांचे मर्जीतील 03) नंदकुमार गोपाळराव गोकुळाष्टमी, 04) सुहास व्यंकटराव काटे, 05) प्रा. सुधीर गणपतराव फुलारी व 06) आनंद यशवंत गोसावी यांच ग्रामभारती शिक्षण संस्थेची आर्थिक कारभाराची इत्यभुत चौकशी करावी असे पत्र निवड समतीचे अध्यक्ष तुकाराम बनसोडे यांना देण्यात आले होते. तरीही समीतीने जाणुबुजुन मला त्रास देण्याचे उद्देशाने व माझ्या कडुन आर्थीक लाभ मिळवण्यासठी विद्यालयाची चौकशी करुन चुकीचा अहवाल तयार करुन तो अहवाल तुकाराम बनसोडे यांनी 07) विलास नागोराव जोगदंड 08) वसंत खंडु दहिवाडे 09) अब्दुल रहेमान पटेल वार्ताहर पुण्यनगरी यांचेकडे दिला त्या अहवालातील बातम्या पेपरमध्ये छापुन तुमची बदनामी करु जर पेपरमध्ये बातमी येवु द्यायची नसेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील असे बोलू लागले सन 2015 मध्ये एक दिवशी मी माझे कर्तव्यावर मुलीचे निवासी विद्यालय येथे असताना विलास नागोराव जोगदंड, वसंत खंडु दहिवाडे व अब्दुल रहेमान पटेल
वार्ताहर पुण्य नगरी हे विद्यालयात आले व माझ्याशी जोरजोरात हुज्जत घालुन बातम्या पेपर मध्ये छापुन तुमची बदनामी करु, जर पेपर मध्ये बातमी येउ द्यायची नसेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील नाही तर आम्ही बातम्या लावु असे बोलु लागले त्यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापीका श्रीमती अनिता श्रीरंग चौधरी व विशेष शिक्षीका श्रीमती मीना मुरलीधर लोमटे हे तेथे आल्याने ते लोक निघुन गेले. ते लोक जास्तीचा त्रास देत असल्याने मी विलास जोगदंड, वसंत खंड दहिवाडे व अब्दुल रहेमान पटेल वार्ताहर पुण्य नगरी यांना 50,000/- रुपये दिले. माझ्या मागे आर्थिक आडचणी आहेत यापेक्षा जास्त मी देवु शकत नाही असे सांगीतले. त्यांनी मला उर्वरीत 4,50,000/- रुपये नंतर द्या असे सांगुन राहलेले पैसे द्या म्हणुन माझ पाठीमागे लागले. मी त्यांना माझी आर्थीक परीस्थीती खराब आहे असे सांगीतले तरीही त्यांनी गोपनिय अहवालाचा मजकुर खरा आहे कि खोटा याची शहानिशा न करता त्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिध्द करुन माझी जनमानसातील प्रतिमा मलीन केली आहे.म्हणुन मी प्रादेशीक उपआयुक्त समाजकल्याण विभाग औरंगाबाद येथे अपिल केले होते तेथे
माझ्यासारखा निकाल लागलेला आहे.
दिनांक 21/08/2023 रोजी मी व रविंद्र शकंर शिंदे असे दुचाकीवरुन विद्यालयात जात असताना शादीखाना अंबाजोगाई येथे दुपारी 02:00 वा. सुमरास विलास जोगदंड, वसंत खंडु दहिवाडे, व अब्दुल रहेमान पटेल पत्रकार यांनी आमची गाडी थांबवुन तुम्ही राहलेले 4,50,000/- रु. द्या असे बोलले. नाही तर आम्ही परत बातम्या लावु खोट्या तक्रारी देवु अशा धमक्या दिलेल्या आहेत.
तरी वरील सर्व व्यक्ती नामे 01) सुरेंद्र भिमराव खेडगीकर (सचिव) 02) तुकाराम नागोराव बनसोडे 03) नंदकुमार गोपाळराव गोकुळाष्टमी, 04) सुहास व्यंकटराव काटे, 05) प्रा. सुधीर गणपतराव फुलारी व 06) आनंद यशवंत गोसावी यांनी संगनमत करुन समीती गठीत करुन बनावट अहवाल तयार करुन मला बडतर्फ केल्याचे चुकीचे आदेश देवुन माझी फसवणुक केली व सदर समीतीच्या अहवालाची व आदेशाची शहानिशा न करताच 07) विलास नागोराव जोगदंड 08) वसंत खंडु दहिवाडे 09) अब्दुल रहेमान पटेल वार्ताहर पुण्य नगरी यांनी माझ्या विरुध्द माहीती अधिकाराची माहीती मागण्याची व खोट्या ऍट्रॉसिटीच्या केसेस व वर्तमान पत्रामध्ये बातम्या प्रकाशित करण्याची भिती घालुन माझ्याकडुन पाच लाख रुपयाची खंडणी वसुल करण्याचे उदेशाने मागणी केली व त्यापैकी पन्नास हजार रुपये घेतले व उर्वरीत साडेचार लाख रुपये न दिल्याने माझ्या विरुध्द दै. पुण्यनगरी वर्तमान पत्रामध्ये बातम्या दिल्या त्यामुळे माझी जनमानसात प्रतिमा मलीन झाली आहे. व उर्वरीत राहीलेल्या रकमेची मागणी करीत आहेत. मी सध्या वयोवृध्द व दिव्यांग असल्याचे माहीत असतांना सुध्दा मला वरील सर्वांकडुन खुप त्रास होत आहे तरी त्यांचेवर कार्यवाही होणेस विनंती आहे. वरील जबाब माझे सांगणे प्रमाणे संगणकावर टंकलिखीत केला प्रिंन्ट काढुन वाचुन पाहीली बरोबर व खरे आहे. असे म्हटले आहे.
संभाजी तुकाराम लांडे यांनी दिलेल्या सदरील फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनला २ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १९:५१ वाजता गुरनं ३७४ अन्वये वरील ९ आरोपींविरुद्ध वरील ११ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चॉंद हमजा मेंडके हे करीत आहेत.