अंबाजोगाईत ५ फेब्रुवारी रोजी सत्यपालची सत्यवाणी कार्यक्रम


राष्ट्रीय चर्मकार महासंघ अंबाजोगाई तालुका यांच्या वतीने संत शिरोमणी गुरू रविदास महाराज तसेच वीरशैव ककय्या महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सप्तखंजिरी निर्माते सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर सत्यपालची सत्यवाणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भुईटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .
संत रविदास व वीरशैव ककय्या महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रम


मान्यवरांची लाभणार उपस्थिती
या समाजप्रबोधन पर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रा.च. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, व कार्यक्रमाचे उदघाटक रा.च महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष इंजि. एन डी शिंदे ,तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर , डॉ सिद्धेश्वर बिराजदार, पो नि बाळासाहेब पवार साहेब, डॉ. नितीन चाटे, डॉ. चिन्मय इंगळे, शैलेंष कांबळे,व ऍड. शिवाजी कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.
“मन चंगा तो कटोथी मे गंगा” या उक्तीचे प्रणेते संत शिरोमणी गुरू रविदास तथा जगाला समानतेचा संदेश देणारे संत कक्कय्या महाराज यांची संयुक्त जयंती अंबाजोगाई शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बाराव्या शतकातील संत वीरशैव ककय्या यांचा जन्म कर्नाटक येथील बेळगाव जिल्ह्यातील वसलेल्या कक्केरी या गावी झाला .संत ककय्या हे महात्मा बसवेश्वर यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज परिवर्तनाची चळवळ त्याकाळी त्यांनी निर्माण केली. त्यांच्यावर वीरशैव पंथाची आवड निर्माण झाली होती .
संतशिरोमनी गुरू रविदास यांचा जन्म १३९८ साली वाराणसी येथे झाला. त्यांचा मूळ व्यवसाय हे चामड्यापासून बूट चप्पल तयार करण्याचा असल्याने ते विनामूल्य चप्पल बूट बनवून देत होते. स्वामी रामानंदव संत कबीर हे त्यांचे आध्यात्मिक गुरू होते . रविदास यांनी जातिपातीच्या जोखडातून समाजाला बाहेर काढून एकसंध बांधण्यासाठी आपले आयुष्य वेचले . मन चंगा तो कटोथी मे गंगा ही उक्ती त्यांनी त्याकाळी साऱ्या समाजाला प्रेरित करण्यासाठी प्रचारीत केली . औदिल्ली शासनाने संत रविदास यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.
चर्मकार महासंघाचे आवाहन
अशा या दोन्ही थोर महापुरुषांची जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्याचे ठरविले असून त्यानिमित्ताने सुप्रसिद्ध सप्तखंजिरी निर्माते समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालची सत्यवाणीचा सुश्राव्य असा समाजप्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा या कार्यक्रमाचा आस्वाद मोठ्या प्रमाणावर समाज बांधवानी घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमोल कांबळे तथा सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भुईटे यांनी केले आहे. सदरील कार्यक्रम हा रविवारी दिनांक ०५फेब्रुवारी २०२३रोजी संध्याकाळी ०६ वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे .