राजकारणात येण्यास मुली उत्सुक; मात्र निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य !


खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येणा-या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत त्यांच्या मुली श्रेया आणि सुजया या सतत सोबत असल्याच्या दिसून येत होत्या. आता त्या राजकारणात येण्यास उत्सुक असल्याची चर्चा या यात्रेत रंगत आहे. या संदर्भात अशोकराव चव्हाण यांनी व्टीट करुन ” आपल्या मुली राजकारणात येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत असून या संबंधीचा निर्णय त्याच घेतील” असे म्हटले आहे.
अशोक चव्हाण ( Ashok Chavan) भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा एकीकडे सुरु असताना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा दाखल झालीय. या यात्रेत अशोक चव्हाण यांची उपस्थिती तर आहेच. पण अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यादेखील काल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत यात्रेत दिसल्या. त्यानंतर भारत जोडो यात्रेपेक्षा जास्त चर्चा ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस कोण ?याची जास्त चर्चा होताना दिसत आहे.


महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात जेव्हापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली. तेव्हापासून भारत जोडोपेक्षा जास्त चर्चा ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस कोण ?याची जास्त चर्चा होताना दिसतेय. कारण भारत जोडो यात्रेतील काँग्रेसच्या जेष्ठ राजकीय नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिचे झळकलेले बॅनर… तसेच देगलूरपासून राहुल गांधींसोबत या पदयात्रेत श्रीजया चव्हाण चालत होत्या. श्रीजया चव्हाण यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. अलिकडेच पोस्टरवरही त्यांचा फोटो दिसू लागलाय. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
अशोक चव्हाण यांचं ट्वीट
यादरम्यान अशोक चव्हाण यांनी आज केलेलं ट्वीट हे फार बोलकं आहे. ज्यात त्यांनी असं लिहिलं आहे की, “पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार,” असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.


मी निर्णय मुलींवर सोपवलाय : अशोक चव्हाण
याविषयी विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले की, “आमच्या दोन पिढ्या राजकारणात आहेत, तिने स्वतः होऊन भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला आहे. दरम्यान माझं कुटुंब एक राजकीय कुटुंब आहे, शंकरराव चव्हाण यांच्यापासून वर्षानुवर्षे काम केलेले आहे. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. दरम्यान आज माझ्या मुलींना कोणतंही राजकीय पद नाही अथवा त्यांचा थेट सहभाग नाही. त्यांना या यात्रेत सहभागी होणं योग्य वाटलं आणि त्यांची ती आवड आहे. दरम्यान त्यांनी या यात्रेत सहभाग नोंदवत राहुल गांधी यांच्यासोबत चालल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी याचा आनंद घेतला. राजकारणात येण्यास त्या इच्छुक दिसतात. त्यामुळे हा निर्णय मी त्यांच्यावर सोपावला आहे. त्यांना योग्य वाटलं तर त्या निर्णय घेतील. यात माझा कोणताही निर्णय नाही.”
सुजया चव्हाण राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
उद्या 10 नोव्हेंबर रोजी नांदेड इथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत सुजया चव्हाण यांची राजकीय भूमिका आणि आगमन स्पष्ट होईल या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात एका मोठ्या राजकीय घराण्यातील आणि देशाचे माजी गृहमंत्री, जलनायक शंकरराव चव्हाण यांची नात ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राजकीय वारस असेल का? या विषयीची उत्सुकता येत्या काळात संपेल असं चित्र आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून 7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली. आज बिलोली तालुक्यातील कृष्नूर ते नायगाव असा सकाळच्या सत्रातील टप्पा पार करुन नायगाव या ठिकाणावरुन 4:00 वाजता या यात्रेने नांदेडकडे मार्गक्रमण केली.