अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रु. ची मदत व भावाचा शासकीय नौकरीत समावेश करा


जाती अंत संघर्ष समितीची मागणी
नांदेड शहरालगत असलेल्या बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत व अक्षय च्या भावाचा शासकीय नोकरीत समावेश करा अशी मागणी जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ अंबाजोगाई शहरात जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी निदर्शने करण्यात आली आणि या निदर्शनानंतर उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बोंढार हवेली, नांदेड शहराला लागून असलेले खेडे जिथे 1 जून 2023 रोजी अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला त्या संबंधी जाती अंत संघर्ष समिती खालील मागण्या करीत आहे, आणि
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दलीत, अल्पसंख्यांक व स्त्रियावर हल्ले अत्याचार वाढलेले आहेत, जातीय तिरस्कारातून अस्पृश्य लोकावर गेल्या पाच हजार वर्षांनी हे अमानुष अत्याचार होताना दिसतात, त्या संबंधी आम्ही खालील मागण्या करीत आहोत.
शहीद अक्षय भालेराव यांच्या आई वडिलांना 50 लाख रु ची मदत करा, अक्षयचा भाऊ आकाश भालेराव यास सरकारी कायम नोकरीवर घेऊन गावातच या कुटुंबाचे पुनर्वसन करा,
या गावचे सर्व प्रकारचे अनुदान, जि. प., प. स. ग्रामपंचायत निधी 20 वर्षासाठी बंद करा. या गावातील सर्व दलीत जनतेच्या जुलूम आणि अत्याचाराची राष्ट्रीय मानव अधिकार आणि मागास वर्गीय आयोगा कडून सहा महिन्याच्या आत चौकशी करा.
या पाषाण युगिन गावास सामूहिक दंड करा, विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवा.


धर्मांध सांप्रदायिक आणि धनदांडग्याचे पाठीराखे सरकार केंद्रात आणि राज्यात असल्याने फार न्यायाची आशा नसताना आम्ही जनतेच्या एकजुटीच्या जोरावर शहीद अक्षय भालेराव व तमाम पिडीत समाजासाठी न्याय मिळवू याची खात्री आहे,
असाच अघोरी आणि नंदनिय प्रकार राजेनगर रेणापूर जि. लातूर येथे ही घडलेला आहे. ती हजार रुपयासाठी सावकाराने मातंग गिरीधारी तपकाल याच्या कुंटुबीयावर हल्ला करुन त्यात गिरीधारी तपकाल याचा खुन पाडला आहे, याही प्रकरणी कठोर शिक्षेची आम्ही मागणी करीत आहोत व त्या कुंटुबाला सर्व प्रकारच्या मदतीचे सरकारला अवाहान करीत आहोत. असे या निवेदनात म्हटले आहे.


या निवेदनावर कॉ. बब्रुवान पोटभरे, महादेव आदमाने, भागवत जाधव, बापु गोमसाळे, विराज धिमधीमे, सुरेश सरवदे, राम वाघमारे, सपना नाईकवाडे, दत्ता काटे, अभिषेक लोंढे, प्रदीप वेडे, शरद बनसोडे, सावित्रा तरकसे, शेख खलील, शुभम बनसोडे, लग्न जोगदंड, शामराव जाधव, फेरोज पठाण, विनोद शिंदे, अशोक ढवारे, सचिन लोंढे, ज्ञानोबा गायकवाड, सय्यद असीफ, अक्षय जोगदंड, अविनाश कु-हाडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.